शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

रेती वाहतुकीविरोधात महिलांचा एल्गार

By admin | Updated: November 19, 2016 00:09 IST

तालुक्यातील उंबरखेड येथील रेतीघाटातून भरधाव वाहनांनी गावातून होणारी रेतीची वाहतूक बंद करा, ...

उंबरखेड येथे रास्ता रोको : ५० पेक्षा अधिक ट्रक अडवले, तणावाची स्थितीतिवसा : तालुक्यातील उंबरखेड येथील रेतीघाटातून भरधाव वाहनांनी गावातून होणारी रेतीची वाहतूक बंद करा, यामागणीसाठी शुक्रवारी महिला रस्त्यावर उतरल्या. महिलांसह गावकऱ्यांनी सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत रास्ता रोको आंदोलन करून रेतीचे पन्नासच्यावर ट्रक अडविल्याने परिसरात तब्बल ६ तास तणावजन्य स्थिती निर्माण झाली होती. उंबरखेड येथील नदीतील रेतीघाटाचा १ कोटी ५१ लाख रूपयांमध्ये लिलाव झाला. मात्र, या घाटातून रेतीची दिवसाढवळ्या ‘ओव्हरलोड’ वाहतूक होते. गावातूनच भरधाव ट्रक धावत असल्याने गावातील वहिवाटीच्या रस्त्यांची अक्षरश: वाट लागली आहे. शिवाय या भरधाव वाहनांमुळे परिसरातील ग्रामस्थांच्या जिविताला धोका संभवतो. रेतीच्या जडवाहतुकीला कंटाळलेल्या गावकऱ्यांनी यापूर्वी अनेकदा तक्रारी केल्यात. मात्र, त्याकडे लक्ष देण्यात आले नाहीत. अखेर गावातील महिलांनी आक्रमक होत रस्त्यावर येऊन गावातून होेणाऱ्या रेती वाहतुकीविरोधात एल्गार पुकारला. ही वाहतूक कायमस्वरूपी बंद करा, या मागणीसाठी महिला रस्त्यावर उतरल्या होत्या. आंदोलनामुळे शुक्रवारी दिवसभर रेतीची वाहतूक बंद होती. तहसीलदार राम लंके, नायब तहसीलदार पंधरे, ठाणेदार दिनेश शेळके यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली. मात्र अद्यापही यावर तोडगा निघाला नव्हता. रेतीची वाहतूक उंबरखेड गावातून चालू आहे. नियमानुसार याच रस्त्यावरून वाहतूक केली जात आहे. पर्यायी रस्ता नसल्याने गावकऱ्यांनी सध्या कायदा हातात घेऊ नये. - राम लंके, तहसीलदार, तिवसा