शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

तिवस्यातील महिलांच्या पोळ्यात दारूबंदीचा एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 22:59 IST

पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी दाखविणाºया स्त्रियांनी तिवस्यात सोमवारी आयोजित महिलांच्या पोळ्यात.....

ठळक मुद्देयशोमती ठाकूर यांचे नेतृत्व : स्त्रीशक्तीने हातात घेतल्या काठ्या, ‘आम्ही रडत्या नव्हे, लढत्या’

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात कर्तबगारी दाखविणाºया स्त्रियांनी तिवस्यात सोमवारी आयोजित महिलांच्या पोळ्यात हाती लाठ्या घेऊन दारूबंदीसाठी एल्गार पुकारला. ‘आम्ही रडत्या नव्हे, तर लढत्या आहोत’ हेच त्यांनी त्यांच्या कृतीतून दर्शविले.कार्यक्रमाचे आयोजन आ. यशोमती ठाकूर मित्रमंडळ, महिला काँग्रेस कमेटी व दारूबंदीसाठी लढणाºया महिलांनी केले होते. बैलांच्या मदतीने होणारी पारंपरिक शेती हळूहळू कालबाह्य होऊ लागली आहे. यांत्रिकीकरणाने जोर धरला आहे. महिलाही घरधन्याच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबतात. याची प्रचिती महिला शेतकºयांच्या बैलपोळ्यातून आली. यापोळ्याचे उद्घाटन आमदार यशोमती ठाकूर यांच्या हस्ते जिल्हा परिषद बांधकाम व शिक्षण सभापती जयंत देशमुख, तिवस्याच्या नगराध्यक्ष राजकन्या खाकसे, उपाध्यक्ष वैभव स. वानखडे, जिल्हा परिषद सदस्य पूजा आमले, पंचायत समिती सदस्य उज्ज्वला पांडव, रंजना सतीश पोजगे, हरीश मोरे, वीरेंद्र जाधव, मुकुंद देशमुख, रूपाली काळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.सततची नापिकी, दुष्काळ, शेतमालाला हमीभाव नसणे, वाढत्या शेतकरी आत्महत्या अशा विपरित परिस्थितीसोबत ताकदीने दोन हात करणाºया कर्तबगार महिला शेतकºयांचा सत्कार, प्लास्टिकमुक्त अभियान, दारूबंदीचे आवाहन, शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील महिला शेतकºयांना मदत आदी कार्यक्रम यावेळी घेण्यात आले.महिला शेतकरी पुरस्कार दुर्गा बबनराव गंधे, सुनीता चौधरी, शीतल जाजू यांना प्रदान करण्यात आला. रोजगारनिर्मितीसाठी मोलाची कामगिरी बजावणारे रोहित बजाज, पुरूषोत्तम हरवानी, मंगेश वानखडे, वर्षा देशमुख, यांचाही यावेळी गौरव करण्यात आला.महिलांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथदारूमुक्ती अभियानातून स्त्रीशक्तीचा जागर करण्यात आला. काठ्यांचे वाटप करून परिसरात महिला संरक्षण दलाच्या फलकाचे अनावरण यावेळी आ.यशोमती यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यसनमुक्तीची शपथ देण्यात आली. महिलांनी हाती काठ्या घेऊन दारूबंदीची शपथ घेतली.गृहिणीदेखील आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हाव्यात, रोजगारनिर्मिती व्हावी, अवैध दारूविक्री बंद करून व्यसनाधिनतकडे जाणाºया पुरूषांना व्यसनांपासून परावृत्त करण्याची शपथ दिली. स्त्रीशक्तीचा सन्मान व्हायलाच हवा. शेतीशी निगडित जोडधंदे वाढावेत, यासाठी सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची गरज आहे.- यशोमती ठाकूर, आमदार, तिवसा