शहरं
Join us  
Trending Stories
1
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
2
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
3
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
4
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
5
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
6
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
7
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
8
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
9
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
10
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
11
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
12
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
13
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
14
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
15
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
16
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
17
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
18
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
19
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
20
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर

महाराष्ट्रातील महिला असुरक्षितच; उत्तर प्रदेशनंतर दुसरा क्रमांक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 16:03 IST

महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे.

ठळक मुद्देगुन्ह्यांमध्ये वाढ

प्रदीप भाकरे।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महिलांविषयक गुन्ह्यात झालेली वाढ राज्यातील महिलाशक्ती असुरक्षित असल्याचेच अधोरेखित करणारी आहे. २०१५-१६ व २०१६-१७ च्या तुलनेत २०१७-१८ मध्ये अशा गुन्ह्यांमध्ये ८२५ ने वाढ झाली आहे. राज्य सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या २०१७-१८ च्या आर्थिक पाहणी अहवालाच्या निमित्ताने ही बाब उघड झाली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात महिलाविषयक गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी कडक कायदे आहेत. दिल्लीच्या निर्भया हत्याकांडानंतर तर कायद्यात सुधारणा करून गुन्हेगारांना अधिकाधिक शिक्षा मिळवून देण्यासाठी शासनाने पाऊल उचलले. तरीही कोपर्डी बलात्कारासारखी अश्लाघ्य घटना उघडकीस आलीच. त्यानंतर महिलांविषयक गुन्ह्यांमध्ये घट अपेक्षित असताना गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये झालेली वाढ चिंताजनक आहे.बलात्कार, अपहरण, विनयभंग, लैंगिक अत्याचार, अनैतिक व्यापारासह हुंडाबळी, पती व नातेवाइकांकडून झालेली क्रूर कृत्ये याप्रकरणी २०१५ साली ३१ हजार १२६ गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात २०१६ मध्ये वाढ होऊन ती संख्या ३१ हजार २७५ वर स्थिरावली, तर २०१७ मध्ये ३२ हजार १०० गुन्हे नोंदविण्यात आलेत. २०१७ मध्ये २३४ महिला हुंडाबळी ठरल्या. त्यामुळे २०१६ मध्ये २४८, तर २०१५ मध्ये २६८ महिला हुंडाबळी ठरल्याची नोंद आहे. २०१७ मध्ये बलात्काराची ४,३५६ प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१६ मध्ये तो आकडा ६१६९ होता. २०१७ मध्ये १२ हजार २३४, २०१६ मध्ये ११ हजार ३९६, तर सन २०१५ मध्ये ११ हजार ७१३ विनयभंगाची प्रकरणे नोंदविण्यात आली. २०१५ आणि २०१६ च्या तुलनेत २०१७ मध्ये लैंगिक अत्याचारप्रकरणी नोंदविलेल्या गुन्ह्यात (८६४) घट झाली. २८१ प्रकरणांमध्ये २०१७ साली अनैतिक व्यापाराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पती व नातेवाइकांकडून झालेली क्रूर कृत्ये २०१७ मध्ये ६२४२ राहिली, तर २०१६ मध्ये ७२१५ तर २०१५ मध्ये ७६४० प्रकरणे नोंदविण्यात आली.नऊ राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसराउत्तर प्रदेशात दरवर्षी सर्वाधिक महिला अत्याचार नमूद होतात. उत्तर प्रदेशासह गुजरात, कर्नाटक, केरळ, मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा या राज्यांतील नोंदविलेल्या गुन्ह्यांचा विचार करता, या राज्यांच्या तुलनेत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. गुजरात आणि केरळ राज्यात महिलांविषयक गुन्ह्यांची नोंद १० हजारांच्या आत आहे. उत्तर प्रदेशात तो आकडा ५० हजारांवर गेला आहे.

टॅग्स :Womenमहिला