शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

धारणीत अतिक्रमण निर्मूलन पथकाला महिलांनी हाकलले

By admin | Updated: January 13, 2016 00:15 IST

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकाला महिलांनी परतवून लावले. त्यामुळे महिलाशक्तीसमोर पोलिसांसह प्रशासनही हतबल झाले.

४८ तासांचे अल्टिमेटम : पोलीसही झाले हतबलधारणी : शासकीय जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यास गेलेल्या पथकाला महिलांनी परतवून लावले. त्यामुळे महिलाशक्तीसमोर पोलिसांसह प्रशासनही हतबल झाले. मंगळवारी दुपारी २ वाजतादरम्यान शासकीय भूखंडावर जवळपास ९ अतिक्रमितांनी ताबा घेऊन कच्चे घरे बांधण्याचा समाचार घेण्यासाठी महसूल, पोलीस व नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी व पदाधिकारी गेले होते. मात्र त्यांना महिलांनी हाकलून लावले.अतिक्रमण करून बसलेल्यांनी कर्मचाऱ्यांना हटकले. काहींनी पूर्वी करण्यात आलेली अतिक्रमणे प्रथम काढा नंतर आमच्याकडे या अशा पवित्रा घेतल्याने प्रशासनाची कोंडी झाली. पोलीस बंदोबस्तात एकमात्र महिला शिपायाचे महिला शक्तीसमोर काहीच चालले नाही. त्यामुळे आणखी वाढीव बंदोबस्तात दोन दिवसांनंतर अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही पुन्हा राबविण्यात येणार असल्याचे पथकप्रमुख नायब तहसीलदार जी. ई. राजगडे यांनी जाहीर केले. तोपर्यंत आपापले अतिक्रमण स्वत:हून काढून टाकण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे ४८ तासाचे अल्टिमेटम मिळाल्याने तूर्तास अतिक्रमण धारकांना अभय मिळाले आहे.शासकीय जमिनीवरील वाढत्या अतिक्रमणाबाबत आजच ‘लोकमत’ने सचित्र बातमी प्रकाशित केली होती. त्याची दखल घेत नायब तहसीलदार राजगडे, मंडळ अधिकारी सीताराम कास्देकर, तलाठी रूपेश गिरी, नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा रेखा पटेल, नगर पंचायतीचे कर्मचारी अमीन शेख हे पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्यासाठी प्रभाग क्रमांक २ मध्ये दाखल झाले होते. यावेळी ९ अतिक्रमण करणाऱ्यांनीही महिलाशक्तीसमोर दंड थोपटून उभे होते. दरम्यान तक्रारकर्ते व अतिक्रमणधारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. यावेळी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. (तालुका प्रतिनिधी)