शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

महिलेची विष पाजून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:01 IST

ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली.

ठळक मुद्देसाऊर रामानारायणपूर येथील घटना : ई-क्लास जमिनीवरील पिकांचा वाद

आॅनलाईन लोकमतअमरावती : ई-क्लास जमिनीवरील पिकाच्या वादातून एका महिलेची शेतात जबरीने विषारी औषध पाजून हत्या करण्यात आली. शनिवारी सकाळी ही घटना वलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साऊरजवळील रामा नारायणपूर शिवारात घडली. संगीता प्रल्हाद चव्हाण (३२) असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी रामेश्वर धर्माजी चव्हाण व त्याची पत्नी चंचला यांना अटक केली.रामा साऊर येथील ई-क्लास जमिनीवर काही नागरिकांनी अतिक्रमण करून पिकांचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली. पिकावरून संगीता चव्हाण व आरोपी रामेश्वर चव्हाण यांच्यात वाद होता. शनिवारी सकाळी संगीता ही तिच्या चार वर्षीय वैभवी नामक मुलीसोबत शेतात हरभरा काढण्यासाठी गेली होती. यादरम्यान तेथे रामेश्वर चव्हाण व त्याची पत्नी दाखल झाली. त्यांनी संगीताशी वाद घातला, मारहाण केली आणि जबरीने विष पाजल्याचा आरोप संगीताच्या कुटुंबीयांनी केला. हा प्रकार घडत असतानाच संगीताची सासू रेखा रामदास चव्हाण शेतापर्यंत पोहोचल्या. त्यांनी संगीताला ११.१० वाजता गंभीर अवस्थेत अमरावती येथे जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती केले. अवघ्या १० मिनिटांत तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नातेवाइकांचा रोष उफाळून आला. तणावाची परिस्थिती पाहून वलगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल कुरुळकर, एपीआय महेश नरवणे यांनी जिल्हा सामान्य रुग्णालय गाठले आणि नातेवाइकांचे म्हणणे ऐकून घेतले. सायंकाळी संगीताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. यानंतर तिचे पार्थिव नातेवाइकांनी थेट वलगाव पोलीस ठाण्यात नेण्याची भूमिका घेतली. आरोपींना अटक केल्याशिवाय शव उचलणार नसल्याचा त्यांचा पवित्रा होता. पोलिसांनी त्यांची समजूत काढली. यानंतर संगीताची सासू रेखा चव्हाण यांच्या तक्रारीवरून वलगाव पोलिसांनी रामेश्वर चव्हाण व चंचला चव्हाण यांच्याविरुद्ध भादंविचे कलम ३०२, ३४ अन्वये गुन्हा नोंदविला. दोघांनाही रात्री अटक करण्यात आली. घटनेमुळे गावात तणाव असल्याने पोलिसांनी बंदोबस्त लावला होता.पोलीस आयुक्तांपर्यंत गेला होता वादअनेक वर्षांपासून या दोन कुटुंबीयांत ई-क्लास जमिनीच्या पिकावरून वाद सुरू आहे. मध्यंतरी हे दोन्ही कुटुंबीय एकमेकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी वलगाव ठाण्यापर्यंत पोहोचले. वाद चिघळत असल्याचे पाहून पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. यातील एक कुटुंब वलगाव पोलिसांविरोधात पोलीस आयुक्ताकडे गेले. मंत्रालयातील पदाधिकाºयांकडून पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. यासंबंधाने वलगाव पोलिसांनी दोन्ही कुटुंबीयांना पोलीस आयुक्तांसमोर हजर केले होते.ई-क्लास जमिनीवरील पिकांचा वाद अनेक वर्षांपासून सुरू होता. यासंदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आल्या आहेत. शनिवारी महिलेच्या मृत्यूप्रकरणी तक्रार प्राप्त झाल्यानंतर आरोपींविरुद्ध हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.- अनिल कुरुळकर, पोलीस निरीक्षक वलगाव ठाणे