शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

दलालांच्या मदतीशिवाय परवाना मिळणे कठीणच !

By admin | Updated: March 14, 2015 00:40 IST

नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने तालुका ठिकाणी महिन्यातून एकदा परवाना देण्यासाठी शिबिर सुरु केले आहे.

सुमित हरकुट चांदूरबाजार नागरिकांच्या सोयीसाठी वाहतूक विभागाने तालुका ठिकाणी महिन्यातून एकदा परवाना देण्यासाठी शिबिर सुरु केले आहे. या शिबिरात फक्त १०० वाहनचालकांनाच परवाना देण्यात येतो. यामुळे ग्रामीण भागातील दलालांनाही सुगीचे दिवस आले आहे.वाहतूक विभागाचा नवीन निर्णयानुसार तालुकास्थळी महिन्यातून एकदाच वाहन परवाना शिबिराचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार तालुक्यातील शेकडो विनापरवाना वाहन चालक या शिबिराची वाट पाहत ताटकाळत बसतात. मात्र पहिल्या ६० दुचाकी चालकांना तर ४० चारचाकी वाहन चालकानाच परवाना देण्यात येतो. वाहतूक विभागाचा या तुघलिकी निर्णयामुळे अनेक इच्छुकांना रात्रीपासूनच शिबिराच्या ठिकाणी तळ ठोकून बसावे लागते. अनेक इच्छुक दलालांना भेटून आधीच आपले वाहन परवाना मिळविण्याबाबत ‘सेटींग’ करतात.वाहतूक विभाग आयुक्त महेश झगडे यांच्या निर्णयानुसार जिल्हा वाहतूक विभागाचे कार्यालय काही प्रमाणात दलालमुक्त झाले असले तरी परवाना काढणाऱ्याची संख्या ही शहरापेक्षा ग्रामीण भागात अधिक आहे. त्यामुळे मोजक्या १०० वाहनचालकांना परवाना वाटप करणे म्हणजे दलालांचा तसेच ड्रायव्हींग शाळांच्या माध्यमातून गेल्याशिवाय परवाना मिळणे कठीणच आहे. शहरात दिवसेंदिवस दुचाकी, चारचाकी वाहनांची वाढ होत आहे. अशातच ७२ ते ७५ टक्के वाहनचालकांकडे वाहन चालवायचा परवानासुध्दा नाही. अनेक युवा वर्ग विनापरवाना सर्रास वाहने फिरवित आहेत. मात्र या विनापरवाना वाहनचालकांना कोणतीही अडवणूक केली जात नसल्याने अवैध दुचाकी, चारचाकी वाहनचालक तीन सीट, चार सिट बसवून सर्रास ‘धूम’ स्टाईल धावताना आढळतात.शहरातील जिल्हा परिषद विश्रामगृहावर महिन्याकाठी एका शिबिराचे आयोजन केले होते. येथे परवाना घेण्याकरिता वाहनधारक ग्रामीण भागातून रात्रीपासूनच येत असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र रांगेत लागूनसुध्दा अनेकांना आल्या पावली परतावे लागले. आयुक्तांचा आदेशाला तिलांजली देत दलालांचा माध्यमातून आलेल्या इच्छुकांना निश्चित परवाना मिळतोच. मात्र भर उन्हात रांगेत उभे राहूनही परवाना न मिळत असल्यानेही तालुक्यात विनापरवाना वाहनचालकांची संख्या वाढल्याचे स्पष्ट होत आहे.