शहरं
Join us  
Trending Stories
1
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
2
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
3
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
4
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
5
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
6
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
7
केवळ लठ्ठपणाच नव्हे, तर मुलांच्या यकृतातील चरबी ठरतेय गंभीर आजारांसाठी आमंत्रण!
8
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
9
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
10
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
11
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
12
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
13
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
14
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
15
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
16
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
17
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
18
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
19
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
20
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा

जन-धनमधील खात्यात कधी येणार ‘धन’?

By admin | Updated: December 8, 2014 22:29 IST

सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या

विम्याचा लाभ गुलदस्त्यात : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकांना मार्गदर्शक सूचना नाहीअमरावती : सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या प्रक्रियेबाबत बँकांना कोणत्याच मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शून्य बॅलेन्सवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अपघाती विमा संरक्षणाचे आमिष दाखविण्यात आले होते. अद्याप तरी कुण्याच खातेदाराला अपघाती विम्याचा लाभ मिळालेला नाही. अद्यापही नॅशनल पेमेंट कार्पोरेशनकडून बँकांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. अपघाती विम्याचा हप्ता शासनाच्यावतीने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन भरणार आहे. बँकांनी किंवा विमा कंपन्यांना अद्यापही विम्याच्या अदायगीबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जन-धन योजनेच्या खातेधारकांचा अपघात झाल्यास तूर्तास तरी त्याला जन-धन योजनेचा लाभ मिळणार नाही. जन-धन योजना १५ आॅगस्ट २०१४ पासून सुरू करण्यात आली. शून्य बॅलेन्सवर खाती उघडण्याची प्रक्रिया देशभर राबविण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लिड बँकेच्या अखत्यारीतील सर्व बँकेत नोव्हेंबर अखेर १ लाखावर खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी ६५ हजार खातेधारक ग्रामीण भागातील आहेत. यावर्षीच्या सरकारनेही बँकेच्या प्रवाहात सर्व नागरिकांना आणण्यासाठी आर्थिक समावेशन योजना गेल्या चार वर्षांपासून राबविल्या आहेत. जन-धन योजनेचा उद्देशही तोच आहे. एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचा जीवन विमा, पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्रॉफ्ट, हे लाभ या योजनेत समाविष्ट आहेत. खातेदारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मात्र त्याला जन-धन योजनेतील ३० हजार रुपये विमा रक्कम मिळणार आहे. या विम्याची रक्कम एलआयसी भरणार आहे. त्यासाठी एलआयसीने राखीव ठेवलेल्या १०० कोटी रुपयांचा राखीव निधी वापरणार आहे. यासाठी शासनाने एलआयसीला मार्गदर्शक सूचना मागील महिन्यात जारी केल्या आहेत. (प्रतिनिधी)