शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

जन-धनमधील खात्यात कधी येणार ‘धन’?

By admin | Updated: December 8, 2014 22:29 IST

सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या

विम्याचा लाभ गुलदस्त्यात : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशनकडून बँकांना मार्गदर्शक सूचना नाहीअमरावती : सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग कक्षेत आणण्यासाठी मोठा गाजावाजा करीत सुरू केलेल्या ‘पंतप्रधान जन-धन योजने’ंतर्गत उघडण्यात आलेल्या बँक खात्यात चार महिने होऊनही अपघाती विम्याच्या प्रक्रियेबाबत बँकांना कोणत्याच मार्गदर्शक सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. शून्य बॅलेन्सवर सुरू करण्यात आलेल्या या योजनेत अपघाती विमा संरक्षणाचे आमिष दाखविण्यात आले होते. अद्याप तरी कुण्याच खातेदाराला अपघाती विम्याचा लाभ मिळालेला नाही. अद्यापही नॅशनल पेमेंट कार्पोरेशनकडून बँकांना मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या नाहीत. अपघाती विम्याचा हप्ता शासनाच्यावतीने नॅशनल पेमेंट कार्पोरेशन भरणार आहे. बँकांनी किंवा विमा कंपन्यांना अद्यापही विम्याच्या अदायगीबाबत कोणत्याही सूचना मिळालेल्या नाहीत. त्यामुळे जन-धन योजनेच्या खातेधारकांचा अपघात झाल्यास तूर्तास तरी त्याला जन-धन योजनेचा लाभ मिळणार नाही. जन-धन योजना १५ आॅगस्ट २०१४ पासून सुरू करण्यात आली. शून्य बॅलेन्सवर खाती उघडण्याची प्रक्रिया देशभर राबविण्यात आली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील लिड बँकेच्या अखत्यारीतील सर्व बँकेत नोव्हेंबर अखेर १ लाखावर खाती उघडण्यात आली आहेत. यापैकी ६५ हजार खातेधारक ग्रामीण भागातील आहेत. यावर्षीच्या सरकारनेही बँकेच्या प्रवाहात सर्व नागरिकांना आणण्यासाठी आर्थिक समावेशन योजना गेल्या चार वर्षांपासून राबविल्या आहेत. जन-धन योजनेचा उद्देशही तोच आहे. एक लाख रुपयांचे अपघाती विमा संरक्षण, तीस हजार रुपयांचा जीवन विमा, पाच हजार रुपयांचा ओव्हर ड्रॉफ्ट, हे लाभ या योजनेत समाविष्ट आहेत. खातेदारांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास मात्र त्याला जन-धन योजनेतील ३० हजार रुपये विमा रक्कम मिळणार आहे. या विम्याची रक्कम एलआयसी भरणार आहे. त्यासाठी एलआयसीने राखीव ठेवलेल्या १०० कोटी रुपयांचा राखीव निधी वापरणार आहे. यासाठी शासनाने एलआयसीला मार्गदर्शक सूचना मागील महिन्यात जारी केल्या आहेत. (प्रतिनिधी)