शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मिळणार तरी कधी कृषिपंपांची जोडणी ?

By admin | Updated: July 19, 2015 00:18 IST

तालुक्यातील कृषी क्षेत्रात हल्ली एक हजाराचेवर कनेक्शनसाठी मागणी अर्ज पडून आहेत.

आक्रोशाचा अंत केव्हा ? : शेतकऱ्यांनाच जोडावे लागतात डीबीचे फ्यूज, कितीदा घ्यायचे शेतकऱ्यांनी विष ? अंजनगाव सुर्जी : तालुक्यातील कृषी क्षेत्रात हल्ली एक हजाराचेवर कनेक्शनसाठी मागणी अर्ज पडून आहेत. ह्या प्रतीक्षेत असलेल्या एक हजारपेक्षाही जास्त शेतकऱ्यांनी ज्यांचे कडे सध्या कृषी पंपाची जोडणी आहे त्याचे हाल वाईट आहे. ओव्हरलोड झालेल्या डी.बी. आणि त्याची देखभाल व दुरुस्ती वीज वितरण कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांकडून पैसे उकळल्याशिवाय अजिबात करीत नाहीत. याकरिता गतवर्षी सातेगाव येथे शेतकऱ्यांनी मोठे आंदोलन केले होते. पोलिसांचे संरक्षण घेऊन वीज वितरण अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या; पण महिनाभरातच परिस्थिती जैसे थे झाली. मुख्यालयी वितरण कंपनीचे कर्मचारी राहत नाहीत. वीज पुरवठा अखंड होत नाही, कोणतीही पूर्वी सूचना न देता कनेक्शन तोडले जाते. गरजे पोटी अनाधिकृत आर्थिक व्यवहार केले जातात. तक्रार निवारण केन्द्रात सेवा मिळत नाही, सर्वात महत्त्वाचे हे की, पुरेसा विद्युत दाब मिळत नाही. वीज वितरण कंपनीचा त्रास शेतकरी वर्गाला आता अंगवळणी पडला आहे. ग्रामीण भागात कागदोपत्री मुक्कामी राहणारे वायरमन डी.बी.चा फ्युज गेल्यावर कामात पडला तर शेतकऱ्याचे नशीब. पण बहुकरून एखादा खासगी माणूस हाती धरुन अथवा स्वत:च शेतकरी आपला जीव धोक्यात घालून हे काम करतो. ओव्हरलोड झालेल्या डी.बी. हा सिंचन क्षेत्रात डोके दुखीचा विषय आहे. क्षमतेपेक्षा जास्त कनेक्शन आणि क्षमतेपेक्षा जास्त हॉर्सपॉवरचे पम्प जोडल्याने डी.बी. ओव्हरलोड होतात. ओलित प्रभावित होते. या त्रासाला कंटाळून तालुक्यातील हिरापूरच्या एका शेतकऱ्याने थेट अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात विष घेतले होते. वीज कंपनीचा कारभार अधिकृत वायरमनऐवजी नेमलेला मदतनीस चालवतात. शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करतात. वर्षानुवर्षे विजेच्या जोडण्या कृषी क्षेत्रात मिळत नाहीत, पायऱ्या झिजवत राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा बांध फुटल्यावर अप्रिय घटना घडतात, वेळेवर वीज जोडण्या दिल्या आणि कृषी क्षेत्रातील शेतकऱ्यांच्या समस्या वेळेवर सोडविल्या, असे कधी झाले नाही. सहा महिन्यांत जोडणी करण्याचे आश्वासनतालुक्यातील प्रलंबित कृषि जोडण्यापैकी ज्या जोडण्या फक्त पोलद्वारे होवू शकतात त्या या सहा महिन्यांतच वर्षाच्या शेवटपर्यंत पूर्ण करण्यात येतील. ज्या जोडप्यांना डि.पी. आवश्यक आहे त्यांना पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत जोडण्या देण्याचा प्रयत्न राहील व हे काम खाजगी एजन्सी मार्फत तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे अंजनगाव येथील सहाय्यक अभियंता विनय तायडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.