शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

येलकीचा क्षतिग्रस्त बंधारा के व्हा काढणार ?

By admin | Updated: August 30, 2016 00:03 IST

अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील पूर्णा नदीवर असलेला 'पूल वजा बंधारा' २०१४ मधील पुराने क्षतिग्रस्त झाला आहे.

पूर्णेच्या पुरामुळे गावाला धोका : जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे दुर्लक्षअमरावती : अचलपूर तालुक्यातील येलकी पूर्णा येथील पूर्णा नदीवर असलेला 'पूल वजा बंधारा' २०१४ मधील पुराने क्षतिग्रस्त झाला आहे. मात्र या बंधाऱ्याची दुरुस्ती अद्याप नाही व नदीपात्रातील पुलाचे अवशेष देखील जि.प. लघु सिंचन विभागाने काढले नसल्याने काठा लगतचे शिव मंदिर व गावाला सतत पुराचा धोका निर्माण झाला आहे.येलकी पूर्णा येथील शंकर प्रतिष्ठानद्वारा लघु सिंचन जलसंधारण मंडळाचे अधीक्षक अभियंता जिल्हाधिकारी अमरावती व जलसंधान विभागाचे राज्यमंत्री तसेच पालकमंत्री प्रवीण पोटे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. येलकी येथे लघु सचिंन, जलसंधारण विभागाने २००० मध्ये पूर्णा नदीवर 'पूल वजा बंधारा' बांधला मात्र हा बंधारा २०१४ मध्ये पूर्णा नदीला आलेल्या महापुरामुळे क्षतिग्रस्त झाला व अवशेष तेथेच पडले आहेत.हा बंधारा १०० हेक्टर सिंचन क्षमतेचा असल्यामुळे जिल्हा परिषदेच्यो कार्यक्षेत्रात येतो. हा बंधारा ३० जून ते १ आॅगस्ट २००७ या दिवशी झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे क्षतिग्रस्त झाला व या बंधाऱ्यावर खर्च केलेले लाखो रुपये वाया गेले. या बंधाऱ्याच्या गाळामध्ये मोठमोठी झाडे व कचरा अडकल्याने गाळ्यांमधून पाण्याची वहन क्षमता कमी झाली व उजव्या बाजूकडून पाण्याचा प्रवाह अधिक वळता झाल्याने नदीपात्रातील बंधाऱ्याचे प्रस्तंभ खाली दबून कोसळले व हा बंधारा निकामी झाला. या बंधाऱ्याची दुरुस्ती करणे अव्यवहार्य असल्याने नदीपात्रातील उर्वरित भाग अजून तसाच आहे. त्यामुळे नदीच्या प्रवाहाला अडसर व पुराच्या वेळी फुगवटा निर्माण होतो. यामुळे नदीपात्रात मोठा खड्डा पडला आहे. येथील शिव मंदिरास व गावास पुराचा कायम धोका आहे. त्यामुळे नदीपात्रात असलेल्या बंधाऱ्याचे अवशेष, कमाणी व स्लॅब काढून टाकणे महत्वाचे आहे. (प्रतिनिधी)जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपलीयेलकी पूर्णा परिसर हा खारपान पट्टा आहे. त्यामुळे नदीकाठची जमीन भुसभुशीत आहे व चुकीच्या ठिकाणी बंधारा बांधण्यात आल्यामुळेच हा बंधारा क्षतिग्रस्त झाला. त्यामुळे शासनाचे लाखो रुपये वाया गेले. याप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली व मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी २७ जुलै २०१५ रोजी चौकसी व कारवाईसाठी लघु सिंचन व जलसंधारण मंडळाला पत्र दिले. मात्र यावर अद्याप कार्यवाही नाही.मेकॅनिकल युनिटच्या उपअभियत्यांना चौकशी करण्याचे पत्र दिले आहे व अचलपूर उपविभागाला मलबा हटविण्यासाठी अंदाजपत्रक मागविले आहेत.- प्रमोद तलवारे,कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, जि.प.बंधाऱ्याची दुरुस्तीही नाही व नदीपात्रातील अवशेषदेखील काढण्यात आलेले नाही. त्यामुळे येलकी शिवमंदिरास धोका व गावात पुराचे पाणी शिरण्याची भीती निर्माण झाली आहे.- कैलास राऊत, अध्यक्ष, शिवसंस्थान प्रतिष्ठान