शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

यशोमती ठाकूर होणार कॅबिनेट मंत्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्यामुळे तिवस्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद प्राप्त होणार आहे. महिला मंत्री हीदेखील आगळी नोंद यशोमती ठाकूर यांच्या रूपाने होईल.

ठळक मुद्दे'फायरब्रँड' नेतृत्व : तिवसा मतदारसंघाला पहिल्यांदाच मिळणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेले महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बुधवारी सिद्धता होणार आहे. काँग्रेसच्या 'फायरब्रँड’ नेतृत्व अशी ओळख असलेल्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना नव्या सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळण्याचे जवळजवळ निश्चित आहे. या शक्यतेने काँग्रेसजनांमध्ये आनंदाला उधाण आले आहे.आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्यामुळे तिवस्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद प्राप्त होणार आहे. महिला मंत्री हीदेखील आगळी नोंद यशोमती ठाकूर यांच्या रूपाने होईल.‘मोदी लाटे’तही मतदारसंघ शाबूत राखणाऱ्या, तिसऱ्यांदा आमदार झालेल्या यशोमती ठाकूर यांनी राज्याच्या विधिमंडळात त्यांच्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षसंघटनेत दिली. कर्नाटक राज्यातील पेचप्रसंगांच्या वेळीही आमदार यशोमती ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. दिल्लीच्या राजकारणात महत्त्व निर्माण करू शकलेल्या यशोमती ठाकूर राज्यस्तरावरही दखलनीय नेतृत्व ठरल्या आहेत. त्यांच्या मंत्रिपदानंतर जिल्ह्याच्या विकासातही लक्षवेधी भर पडेल, अशी अपेक्षा त्याचमुळे व्यक्त होत आहे. पक्ष अडचणीत असताना प्रलोभनांना न भुलणाºया पक्षनिष्ठ नेत्या अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.राष्ट्रीय पातळीवरील अनुभव१९९९ ते २००४, २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिकमध्ये भाजपक्षाचे साहेबराव तट्टे आमदार होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. २००९ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर विजयी झाल्या. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती; पण मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर यांना संधी मिळाली नाही. २०१४ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर दुसºयांदा विधानसभेत पोहोचल्या. पक्षाने त्यांना मेघालय व कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रभारीपदाची जबाबदारी बहाल केली. पक्षसंघटनेत राष्ट्रीय स्तरावर सचिपवदही सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले. पुढे त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या यशोमती यांचे दिल्लीच्या राजकारणातही महत्त्व आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरShiv Senaशिवसेना