शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

यशोमती ठाकूर होणार कॅबिनेट मंत्री?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 06:00 IST

आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्यामुळे तिवस्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद प्राप्त होणार आहे. महिला मंत्री हीदेखील आगळी नोंद यशोमती ठाकूर यांच्या रूपाने होईल.

ठळक मुद्दे'फायरब्रँड' नेतृत्व : तिवसा मतदारसंघाला पहिल्यांदाच मिळणार सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती/तिवसा : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा सहभाग असलेले महाराष्ट्र विकास आघाडी सरकारची बुधवारी सिद्धता होणार आहे. काँग्रेसच्या 'फायरब्रँड’ नेतृत्व अशी ओळख असलेल्या तिवसा मतदारसंघाच्या आमदार यशोमती ठाकूर यांना नव्या सरकारमध्ये कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद मिळण्याचे जवळजवळ निश्चित आहे. या शक्यतेने काँग्रेसजनांमध्ये आनंदाला उधाण आले आहे.आमदार काँग्रेसचा, तर सत्ता भाजपची किंवा आमदार भाजपचा, तर सत्ता काँग्रेसची; अशा स्थितीमुळे तिवसा मतदारसंघातील अनेक आमदारांना अनेक वर्षे विरोधी बाकावर बसावे लागले. मात्र, आता शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी या तीन पक्षांनी मिळून सरकार स्थापनेचा निर्णय घेतल्यामुळे तिवस्याच्या इतिहासात पहिल्यांदाच कॅबिनेट दर्जाचे मंत्रिपद प्राप्त होणार आहे. महिला मंत्री हीदेखील आगळी नोंद यशोमती ठाकूर यांच्या रूपाने होईल.‘मोदी लाटे’तही मतदारसंघ शाबूत राखणाऱ्या, तिसऱ्यांदा आमदार झालेल्या यशोमती ठाकूर यांनी राज्याच्या विधिमंडळात त्यांच्या कार्यशैलीचा ठसा उमटविला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना काँग्रेसने प्रदेश कार्याध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पक्षसंघटनेत दिली. कर्नाटक राज्यातील पेचप्रसंगांच्या वेळीही आमदार यशोमती ठाकूर यांनी महत्त्वपूर्ण भूमिका निभावली. दिल्लीच्या राजकारणात महत्त्व निर्माण करू शकलेल्या यशोमती ठाकूर राज्यस्तरावरही दखलनीय नेतृत्व ठरल्या आहेत. त्यांच्या मंत्रिपदानंतर जिल्ह्याच्या विकासातही लक्षवेधी भर पडेल, अशी अपेक्षा त्याचमुळे व्यक्त होत आहे. पक्ष अडचणीत असताना प्रलोभनांना न भुलणाºया पक्षनिष्ठ नेत्या अशीही त्यांची ओळख निर्माण झाली आहे.राष्ट्रीय पातळीवरील अनुभव१९९९ ते २००४, २००४ ते २००९ या दोन पंचवार्षिकमध्ये भाजपक्षाचे साहेबराव तट्टे आमदार होते. त्यावेळी राज्यात काँग्रेसचे सरकार होते. २००९ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर विजयी झाल्या. त्यावेळी राज्यात काँग्रेसची सत्ता होती; पण मंत्रिमंडळात यशोमती ठाकूर यांना संधी मिळाली नाही. २०१४ च्या निवडणुकीत यशोमती ठाकूर दुसºयांदा विधानसभेत पोहोचल्या. पक्षाने त्यांना मेघालय व कर्नाटक राज्याच्या विधानसभा निवडणुकांच्या प्रभारीपदाची जबाबदारी बहाल केली. पक्षसंघटनेत राष्ट्रीय स्तरावर सचिपवदही सन्मानपूर्वक बहाल करण्यात आले. पुढे त्यांना प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. इंग्रजी भाषेवर प्रभुत्व असलेल्या यशोमती यांचे दिल्लीच्या राजकारणातही महत्त्व आहे.

टॅग्स :Yashomati Thakurयशोमती ठाकूरShiv Senaशिवसेना