शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अनेकांशी बोलत होतो, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील'; राज ठाकरेंचा पहलगाम हल्ल्यावर मोठं विधान
2
ऐकत नाही भाऊ! टी-२० क्रिकेटमध्ये विराटचा नवा पराक्रम, 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच
3
'जेव्हा मी फोटो पाहिला, मला पहिला प्रश्न पडला की, भाजप...', 'त्या' फोटोवर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले
4
राज्यात रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, मुंबईतील कुख्यात ठाकूर गँगचेही कनेक्शन
5
IPL 2025: चांगल्या सुरुवातीनंतरही आरसीबीच्या पदरात निराशा, हैदराबादचा ४२ धावांनी विजय!
6
सोलापुरात भयंकर घटना! पोटच्या ७ वर्षाच्या मुलीला संपवलं अन् घराशेजारीच पुरलं; पोलिसांनी मृतदेह काढला बाहेर
7
बाप-लेक ज्या गाडीतून झाले फरार, ती थार पोलिसांनी केली जप्त; आणखी दोन गाड्या कोणत्या? 
8
Matthew Forde: गोलंदाजाची आक्रमक फलंदाजी, अवघ्या १६ चेंडूत अर्धशतक झळकावलं, डिव्हिलियर्सच्या विक्रमाशी बरोबरी
9
'निश्चितच, ठाकरे-पवार ब्रॅण्ड संपवण्याचा प्रयत्न चाललाय', राज ठाकरेंचं मोठं विधान
10
गडचिरोली: बिबट्या शिकारीसाठी आला अन् एका घरात घुसला, त्यानंतर दहा तास...
11
आमदार प्रवीण दटकेंच्या नावाने पैसे उकळण्याचा प्रयत्न, प्रकरण काय?
12
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण नव्या वळणावर; पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांचीही चौकशी होणार?
13
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
14
Abhishek Sharma: अभिषेक शर्मानं षटकार मारून मैदानातील गाडीची फोडली काच, पाहा व्हिडीओ
15
रूपाली चाकणकर, रोहिणी खडसेंकडून कस्पटे कुटुबीयांची भेट अन् दोघीत शाब्दिक चकमक
16
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
17
पोलिस महानिरीक्षक सुपेकर यांच्यामुळेच हगवणे कुटुंबीयांची हिंमत वाढली; अंजली दमानिया यांचा दावा
18
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
19
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
20
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी

‘स्मार्ट सिटी’साठी जमिनी देणार नाही!

By admin | Updated: November 24, 2015 00:20 IST

आधीच चार मोठ्या प्रकल्पांसाठी येथील सुपीक जमिनी शासनाने अधिग्रहित केल्या आहेत.

शेतकऱ्यांचा उघड विरोध : आधीच चार प्रकल्पांसाठी जमिनींचे अधिग्रहण, आर्थिक नुकसान सोसणार नाही बडनेरा : आधीच चार मोठ्या प्रकल्पांसाठी येथील सुपीक जमिनी शासनाने अधिग्रहित केल्या आहेत. आता पुन्हा स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी बडनेऱ्यात उपलब्ध असलेल्या जमिनीबाबत चर्चा सुरू झाली आहे. परंतु स्मार्ट सिटीसाठी आपल्या जमिनी देण्याच्या मुद्याला येथील शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ‘आता आम्ही आमच्या जमिनी देणार नाही’, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. बडनेरा शहराच्या सभोवताल असलेली सुपीक जमीन आतापर्यंत रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखाना, विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे कॉर्डलाईन तसेच टाकळी कन्हान प्रकल्पासाठी शासनाने शेतकऱ्यांकडून अधिग्रहित केली आहे. त्यात बहुतांश शेतकऱ्यांना शासकीय दरानुसार मोबदला देखील मिळाला आहे. मात्र, तरीही यात बडनेरातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची ओरड सुरूच आहे. मागील दोन वर्षांच्या कालावधीत जेव्हा या जमिनी शासनाद्वारे अधिग्रहित करण्यात आल्यात त्यावेळी जमिनीचे दर प्रचंड वधारलेले होते. त्यामुळे या प्रकल्पांसाठी आम्ही आमच्या सुपीक जमिनी देणार नाहीत, अशी भूमिका शेतकऱ्यांनी घेतली होती. शासन, प्रशासनाच्या आग्रही भूमिकेतून आम्हाला आमच्या जमिनी द्याव्या लागल्या, असे मत आता हे शेतकरी व्यक्त करीत आहेत. कवडीमोल भावात प्रकल्पांसाठी शेतजमिनी दिल्यानंतर बडनेरातील शेतकऱ्यांना शहरापासून २५ ते ३० किलोमिटर अंतरावरील जमिनी विकत घेऊन काहींना तेथेच स्थलांतरित व्हावे लागले. अशा व्यथा अनेक शेतकरी आजही मांडत आहेत. विशेष म्हणजे अनेक अल्पभूधारक शेतकऱ्यांना अधिग्रहित जमिनींच्या मिळालेल्या मोबदल्यात दुसरी शेतीदेखील घेता आली नाही. या चार प्रकल्पांसाठी शासनाने बडनेरा व परिसरातील शेतकऱ्यांची सुमारे १५०० एकर जमीन अधिग्रहित केली आहे. शेती कमी होत असल्याने परिसरातील शेतमजूर व शेतकऱ्यांच्या रोजगारांचा प्रश्न ऐरणीवर येत आहे. बडनेरालगतची जमीन दर्जेदार आहे. आता शासनाने अमरावती शहराचा स्मार्ट सिटी प्रकल्पात समावेश केला असून बडनेऱ्यातीलच ५५० एकर जमीन या ्प्रकल्पासाठी घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र, ही कुणकुण लागताच शेतकऱ्यांनी विरोध दर्शविण्यास सुरूवात केली आहे. या नव्या प्रकल्पासाठी शेती देणार नाही, अशी भूमिकाच त्यांनी जाहीर केली आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी यासंदर्भात नुकतीच महापौर तसेच महापालिका आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळीही शेतकऱ्यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जमिनी देणार नसल्याचे ठणकावून सांगितले. विमानतळ विस्तारीकरण, रेल्वे वॅगन दुरूस्ती कारखाना हे प्रकल्प शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहित केल्यानंतरही अद्याप पूर्णत्वास आलेले नाहीत. रेल्वेच्या कॉर्डलाईनमुळे अमरवतीहून निघालेली प्रवासी गाडी सरळ नागपूरकडे रवाना होत आहे. मात्र, त्याचाही कोणताच फायदा बडनेराला झालेला नाही. त्यामुळे ‘तेल गेले तूप गेले, हाती धुपाटणे आले’ अशी शेतकऱ्यांची गत होऊ नये, अशी भीती शेतकऱ्यांना वाटते आहे. म्हणूनच शेतकरी स्मार्ट सिटीसाठी जमिनी देण्यास इच्छूक नसल्याचे दिसते. दुसरीकडे प्रशासन मात्र स्मार्ट सिटीसाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्यास त्यांना कसा फायदा होईल, हे सांगत आहे. त्यामुळेच या मुद्यावर सध्या बडनेऱ्यात चर्चा रंगत आहेत. शासनाच्या वेगवेगळ्या प्रकल्पांसाठी जमिनी देणारे शेतकरी आजच्या स्थितीत प्रचंड अडचणीत आहेत. त्यांना त्यांच्या जमिनींचा पुरेसा मोबदलाही मिळालेला नाही. जमीन तर हातची गेली पण पुरेसा पैसाही मिळाला नाही. त्यामुळे आता स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी जमिनी देण्याची या शेतकऱ्यांची अजिबात मानसिकता नसल्याचे एकूणच चित्र आहे.