शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू
2
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
3
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
4
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
5
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
6
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
7
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
8
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
9
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
10
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
11
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
12
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
13
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
14
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
15
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
16
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
17
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
18
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'
19
निळ्या ड्रमातील मर्डर मिस्ट्रीचा खुलासा; पहिल्यांदाच प्रियकरासोबत समोर आली आरोपी पत्नी लक्ष्मी
20
Chipi Airport: चिपी विमानतळ सेवा पुन्हा सुरू होणार; राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

जिल्हाधिकाऱ्यांअभावी कारवाई होणार नाही का?

By admin | Updated: May 18, 2017 00:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध पार्किंगची समस्या कायमच आहे. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर हे दोन दिवसांपासून शासकीय बैठकीकरिता मुंबईला आहेत.

वाहने हटविण्याची नोटीस : कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार कोण?लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध पार्किंगची समस्या कायमच आहे. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर हे दोन दिवसांपासून शासकीय बैठकीकरिता मुंबईला आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत जिल्हाकचेरीतील महत्त्वाच्या कामांची संपूर्ण जबाबदारी ही अपर जिल्हाधिकाऱ्यांची असते. मात्र, तेदेखील रजेवर असल्याने बुधवारीसुद्धा नो- पार्किंगमध्ये वाहने लावणाऱ्यांविरूद्ध कुठलीही ठोस कारवाई करण्यात आलेली नव्हती. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीत कारवाई होणार नाही का? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी रामदास सिद्दभट्टी हे सुद्धा काही दिवसापासून रजेवर असल्याने त्याचा प्रभार निवासी उपजिल्हाधिकारी म्हणून विनोद शिरभाते यांच्याकडे आहे. सोमवारी वृत्त प्रकाशित होताच शिरभाते यांनी कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याने कर्मचाऱ्यांकरिता नोटीस काढून परिसरातील विविध विभागाच्या प्रवेशव्दाराजवळ व नो- पार्किंगमध्ये वाहने न ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु नियमबाह्य वाहने लावणाऱ्या नागरिकांवर वाहतूक विभागाला सांगून काही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे जर जिल्हाधिकारी कार्यालयात अनुपस्थित असतील तर निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना कारवार्इंचे अधिकार नाहीत का? व जर असेल तर त्यांनी का कारवाई करू नये? असा प्रश्न चर्चेला काही जागृत नागरिकांच्यावतीने विचारल्या जात आहे. काही कर्मचाऱ्यांनी वाहने काढलीविविध विभागाच्या प्रवेशव्दारनजीक नियमबाह्य वाहने पार्किंग केली जात आहे. हा प्रकार गंभीर आहे. पण काही अपंग कर्मचाऱ्यांना मुभा आहे. पण इतर अनेक कर्मचारी राजरोेसपणे कुठेही वाहने पार्किंग करतात, काही कर्मचाऱ्यांनी आरडीसींकडून बजावण्यात आलेल्या नोटीसमधील सूचनांचे पालन करून दालनाजवळ वाहने लावणे टाळले. तर काहींनी या आदेशाला न जुमानता प्रशासनाचे आदेश झुगारून वाहने लावण्याचा प्रकार सुरूच आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष जिल्हाकचेरीतून संपुर्ण जिल्ह्याच्या कामकाजाचे नियोजन ठरते. याच ठिकाणी जर नियम पाळल्या जात नसतील, तर नागरिकांनी व अन्य कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी काय आदर्श घ्यावा? लोकमतने हा प्रश्न लोकदरबारात मांडला आहे. पण तीन दिवसानंतरही कारवाई करण्यासंदर्भात जिल्हा प्रशासन गंभीर नाही. केवळ जिल्हाधिकारी नाहीत, म्हणून कारवाई न झाल्याचे स्पष्ट आहे. नो- पार्किंगमध्ये कुणीही वाहने लाऊ नये, विभागाच्या प्रवेशव्दाजवळ वाहने लावणे नियमबाह्य आहे. पुन्हा कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत व पोलिसांना सुद्धा कळविण्यात आले आहे. - विनोद शिरभाते, निवासी उपजिल्हाधिकारी