शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

हा तर राष्ट्रसंतांच्या इच्छाहेतूचाच सफाया!

By admin | Updated: February 21, 2016 00:09 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो राष्ट्रधर्म मांडला तो राष्ट्रभर प्रचारित व्हावा, या महत्त्वपूर्ण उद्देशाने खुद्द महाराजांनीच आश्रमाची स्थापना राष्ट्रीय महामार्गालगत केली होती.

गावकऱ्यांचा विरोध : गुरुकुंज मोझरीच्या अस्तित्वावर घालाराष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जो राष्ट्रधर्म मांडला तो राष्ट्रभर प्रचारित व्हावा, या महत्त्वपूर्ण उद्देशाने खुद्द महाराजांनीच आश्रमाची स्थापना राष्ट्रीय महामार्गालगत केली होती. वळणरस्त्याच्या निर्णयाआडून आता महाराजांच्या मूळ हेतुचाच सफाया केला जाणार आहे. महाराजांच्या इच्छेचा अनादर करणारे हे कृत्य असणार आहे. काही विघ्नसंतोषी लोकांच्या कारवायांमुळे हे घडू शकले. गुरुकुंज मोझरी गावातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ तडकाफडकी गावाबाहेरून काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कोलकाता-मुंबई या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण होत असल्याने अनेक गावांमधून जाणाऱ्या या महामार्गावर गावोगावी उड्डाण पूल उभारले गेले आहेत. तसाच उड्डाणपूल गुरुकुंज-मोझरी गावातदेखील नियोजित आहे. तथापि, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा आश्रम आणि समाधी या पवित्र स्थळांचा आडोसा घेत प्रस्तावित उड्डाणपुलाला काही विघ्नसंतोषींनी विरोध केला. हा सारा विषय राष्ट्रसंतांशी आणि परिणामी लोकभावनेशी निगडित असल्याने अवघे प्रशासन आणि कंत्राटदारही चार पावले मागे येत असल्याचे जाणवते.गावातून जाणाऱ्या उड्डाण पुलाऐवजी गावाबाहेरून जाणाऱ्या सहा किमी लांबीच्या वळण रस्त्याचा पर्याय पुढे आला आहे. यदाकदाचित हा वळण रस्ता अस्तित्वात आला तर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरळीत होईल, वेगवान होईल, काही लोक जे वळण रस्त्याचा आग्रह धरत आहेत, ते खूश होतील. कदाचित आपले राजकारण यशस्वी झाल्याचा आनंददेखील ते काही काळ साजरा करतील. पण, गुरुकुंज मोझरीच्या गळ्याभोवती आवळल्या जाणाऱ्या फासाच्या वेदनांवर हा आनंद अंकुरीत झालेला असेल. आज गुरुकुंज मोझरी हे गाव राष्ट्रीय महामार्गावर वसलेले गाव आहे. त्याचमुळे या गावात जिवंतपणा आहे. वाहनांची-लोकांची वर्दळ आहे. राष्ट्रसंतांचा आश्रम आणि समाधीस्थळ महामार्गालगत असल्याने सर्वसामान्यांना महासमाधीचे दर्शन सहज उपलब्ध आहे. या महामार्गामुळेच मोझरीशिवाय पंचक्रोशीतील पाच-पन्नास गावचे लोक परिसराशी जुळलेले आहेत. महामार्गावरील प्रवासी, देश-विदेशातून या परिसरात येणारे पर्यटक यांना राष्ट्रसंत आणि त्यांच्या कार्याबद्दल आस्था, जिव्हाळा आहे. काही वर्षांत या गावात जी विकासकामे उभी झालीत, त्यामुळे हे गाव आता ग्रामीण आपुलकी जपलेल्या छोट्याशा शहरात रुपांतरित झाले आहे. गावातून जाणाऱ्या महामार्गामुळेच हे सारे शक्य झाले आहे. -तर मोझरीचे अस्तित्त्वच संपणार!हा महामार्ग गावाबाहेरुन वळण रस्त्याच्या स्वरुपाने अस्तित्वात आला तर काय होईल? या प्रकरणाचे गंभीर आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक दुष्परिणाम होणार आहेत. आज गावात वर्दळ असल्याने येथील व्यापार वाढला आहे. गाव महामार्गावर असल्याने आणि अमरावती शहराला जवळ असल्याने येथे उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महामार्ग नसेल तर आर्थिक विकासाच्या या साऱ्या संधी संपुष्टात येतील. राष्ट्रसंतांच्या राष्ट्रधर्माच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या केंद्रांच्या अभ्यागतांवर विपरीत परिणाम होईल. राष्ट्रधर्माची शिकवण देणारी ही केंद्रे ओस पडतील. राष्ट्रसंतांच्या कार्यालयाला खीळ बसेल. या गावात राष्ट्रसंतांनी महत्प्रयासाने उभे केलेले सामाजिक, सांस्कृतिक वैभव नष्ट होईल. अर्थात् राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरून गुरुकुंज मोझरीचे अस्तित्त्वच पुसले जाईल. आज विकासाची आस बाळगून असणारे छोटेखानी गाव पुन्हा एकदा मागासलेपणाच्या गर्तेत लोटले जाईल. कसदार शेतीही जाणार!नवीन वळण रस्त्यासाठी भूसंपादन करावे लागते. त्यात कसदार जमिनी जातील. शेतकरी विरुद्ध प्रशासन, असा संघर्ष उभा ठाकेल. आजचे शांततेचे वातावरण बिघडेल. सलोखा समाप्त होईल. सारे वातावरण असंतोषाचे अविश्वासाचे आणि तणावाचे होऊन बसेल. हे सारे टाळण्यासाठी गुरुकुंज-मोझरीच्या जीवनात येऊ पाहणारे हे नवे विध्वंसक वळण गर्भावस्थेतच उखडून फेकण्याची गरज आहे.गुरुकुंज मोझरीच्या अस्तित्त्वावर घाला घालणाऱ्या या संकटाचा सामना आता गुरुकुंज-मोझरीवासीयांनाच करावा लागणार आहे. ४भय्यासाहेब ठाकूरमाजी आमदार, तिवसा.