शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
3
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
4
दहा कोटीचे बक्षीस, चार तास चकमक ! दबा धरून बसलेल्या माओवाद्यांचा जवानांनी केला खात्मा
5
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
6
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
7
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
8
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
9
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
10
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
11
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
12
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
13
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
14
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
15
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
16
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
17
Maharashtra Rain Alert: नवरात्रोत्सवात पावसाचाच 'गरबा', जाता जाता तडाखा देणार; IMD कडून सतर्कतेचा इशारा
18
Viral Video : घर नव्हे हा तर अजूबा! अवघ्या ५२ इंचांच्या दोन मजली घरात डोकावून बघाल, तर हादरून जाल!
19
नवरात्री २०२५: अखंड ज्योत संकल्प केला, अचानक दिवा विझला तर...; देवी कोप-अशुभ-अवकृपा होईल का?
20
Maharashtra Rain: संपूर्ण आठवडा पावसाचा, शुक्रवारनंतर मुसळधार पावसाची शक्यता, बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

अतिरिक्त तुकड्या सुरू होणार ?

By admin | Updated: July 21, 2015 00:23 IST

राज्यातील एकही विद्यार्थी प्रथम वर्ष स्रातक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही,

प्रवेशाचा गोंधळ : मोर्शी-वरूड तालुका वंचितमोर्शी : राज्यातील एकही विद्यार्थी प्रथम वर्ष स्रातक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश शिक्षण विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी कुलगुरुंना दिले. त्यामुळे मोर्शी - वरूड तालुक्यातील प्रवेशापासून वंचित राहिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला असला तरी महाविद्यालये कायम विनाअनुदान तत्त्वावर अतिरिक्त तुकड्या सुरु करतील का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.यावर्षी १२ वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मोर्शी उपविभागातील महाविद्यालयांनी त्यांच्या प्रवेशसंख्येएवढ्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला असला तरी उपविभागातील वरूड आणि मोर्शी तालुक्यातील शेकडो विद्यार्थी प्रथम वर्ष स्रातक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहिले. दुसरीकडे २९ एप्रिल २०१५ रोजी उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सत्र २०१५-१६ करिता नवीन महाविद्यालये, अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांना अतिरिक्त तुकड्या, अभ्यासक्रम, विषय न देण्याचे शासनाचे धोरण असल्याचे घोषित केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी प्रवेशापासून वंचित असल्याची बातमी ‘लोकमत’ने प्रकाशित करुन याप्रकरणी वाचा फोडली होती.दरम्यान आ. अनिल बोंडे यांनी थेट मंत्रालय गाठून मोर्शी उपविभागातील दोन्ही तालुक्यांतील विद्यार्थ्यांच्या व्यथा मांडून याप्रकरणी तोडगा काढण्याची विनंती केली होती. त्यास अनुसरुन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने १३ जुलै रोजी राज्यातील सर्व कुलगुरुंना पत्र पाठवून विद्यापीठ अधिनियमाच्या तरतुदीअंतर्गत विद्यापीठांना प्राप्त अधिकारानुसार राज्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहे; तथापि अतिरिक्त तुकड्या देण्याची कार्यवाहीदेखील फक्त सत्र २०१५-१६ पूरतीच मर्यादित राहणार असून या अतिरिक्त तुकड्यांचा कोणताही आर्थिक भार शासन उचलणार नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे तुकड्यांचा प्रश्न अधांतरीच आहे. (तालुका प्रतिनिधी)महाविद्यालये आर्थिक भार उचलतील का ?शासनाच्या या पत्राच्या आधारे मोर्शी आणि वरूड तालुक्यातील महाविद्यालयांनी अतिरिक्त तुकड्यांची मागणी केली आणि विद्यापीठाने ती दिली तर विद्यार्र्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न सुटणार जरी असला तरी या विद्यार्थ्यांकरिता लागणाऱ्या शिक्षकांच्या वेतनासह इतर आर्थिक भार स्वत:वर ओढवून घेऊन अतिरिक्त तुकड्या सुरु करतील का, हा खरा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.