शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
3
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
4
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
5
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
6
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
7
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
8
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
9
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
10
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
11
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
12
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
13
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
14
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
15
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
16
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
17
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
18
IND vs PAK Asia Cup 2025 Final Live Streaming : भारत-पाक 'महायुद्ध'! कुठं अन् कशी पाहता येईल ऐतिहासिक फायनल?
19
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
20
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना

जिल्हा सामान्य रुग्णालय कधी होणार अद्ययावत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:33 IST

सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकाळात निर्मिती : वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुविधा तोकडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीत असताना इंग्रज सरकारने सामान्य नागरिकांना आरोग्यच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता सन १९२८ मध्ये इर्विन चौक स्थित जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यावेळची लोकसंख्या कमी असताना रुग्णालयाची इमारत त्यात १६ वार्ड, अतिदक्षता विभाग, पेर्इंग वार्ड, अपघात कक्ष होते. ही स्थिती लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आजघडीला विविध आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता यात काहीच बदल करण्यात आलेले नाही. खाटांची संख्या तेवढीच आहे. तेथे नर्सचा स्टाफ तेवढा आहे. प्रत्येक वार्डात ५ नर्सेस व वार्ड बॉयची व्यवस्था केलेली आहे. मात्र वार्ड बॉय निमित कर्तव्यावर राहत नसल्याने आर्थोपेडिक कक्षातील रुग्णांना औषधोपचार करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रपाळीत दोन नर्स राहत असताना वार्ड बॉय अनुपस्थित असतो. त्यामुळे ड्रेसिंगपासून विविध कामे कार्य नर्सेसनाच पार पाडावी लागतात. निधारित पदेदेखील पूर्णत: भरण्यात आली नसल्याने मनुष्यबळाअभावी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. परिणामी रुग्णांना सुरळीत सेवा मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक वार्डात ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रुग्णांची संख्या प्रत्येक वार्डात ६० च्या वर राहत असल्याचा आजतागायतचा अनुभव तेथील अधिसेविका मंदा गाढवे यांनी व्यक्त केला. १९२८ पासून आजपर्यंत १९१ वर्षांनंतरही आहे त्याच व्यवस्थेत रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्यामुळे एकाच खाटावर दोन तर कधी खालीसुद्धा रुग्णांवर औषधोपचार करावा लागत आहे. या समस्येकडे आरोग्य प्रशासनाचे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात सीएस आणि आरएमओंशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.आर्थोपेडिकमध्ये ३० खाटा, ४३ रुग्णइर्विन रुग्णालयातील आर्थोपेडिक कक्षा ३० खाटा असताना ४३ रुग्ण सोमवारी उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे सर्वच वार्डांत खाटांच्या संख्येपेक्षा रुग्णसंख्या दुप्पटच राहत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. ब्रिटिश काळात निर्माण झालेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटांची व्यवस्था स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली असताना व वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटांची ही संख्या तोकडी पडत आहे.