शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

जिल्हा सामान्य रुग्णालय कधी होणार अद्ययावत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2019 22:33 IST

सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

ठळक मुद्देब्रिटिशकाळात निर्मिती : वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत सुविधा तोकडी

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : सामान्य रुग्णांच्या सोयीसाठी ब्रिटिशकाळात निर्मित झालेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थिती आजही जैसे थेच आहे. त्यामुळे वाढत्या रुग्णसंख्येच्या अनुषंगाने तेथे खाटांची व्यवस्था कधी केली जाणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.भारत देश ब्रिटिशांच्या गुलामीत असताना इंग्रज सरकारने सामान्य नागरिकांना आरोग्यच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, याकरिता सन १९२८ मध्ये इर्विन चौक स्थित जिल्हा सामान्य रुग्णालयाची स्थापना केली. त्यावेळची लोकसंख्या कमी असताना रुग्णालयाची इमारत त्यात १६ वार्ड, अतिदक्षता विभाग, पेर्इंग वार्ड, अपघात कक्ष होते. ही स्थिती लक्षात घेऊन जिल्हा सामान्य रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली होती. मात्र आजघडीला विविध आजारांच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता यात काहीच बदल करण्यात आलेले नाही. खाटांची संख्या तेवढीच आहे. तेथे नर्सचा स्टाफ तेवढा आहे. प्रत्येक वार्डात ५ नर्सेस व वार्ड बॉयची व्यवस्था केलेली आहे. मात्र वार्ड बॉय निमित कर्तव्यावर राहत नसल्याने आर्थोपेडिक कक्षातील रुग्णांना औषधोपचार करताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. रात्रपाळीत दोन नर्स राहत असताना वार्ड बॉय अनुपस्थित असतो. त्यामुळे ड्रेसिंगपासून विविध कामे कार्य नर्सेसनाच पार पाडावी लागतात. निधारित पदेदेखील पूर्णत: भरण्यात आली नसल्याने मनुष्यबळाअभावी कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. परिणामी रुग्णांना सुरळीत सेवा मिळणे कठीण झाले आहे. प्रत्येक वार्डात ३० खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, रुग्णांची संख्या प्रत्येक वार्डात ६० च्या वर राहत असल्याचा आजतागायतचा अनुभव तेथील अधिसेविका मंदा गाढवे यांनी व्यक्त केला. १९२८ पासून आजपर्यंत १९१ वर्षांनंतरही आहे त्याच व्यवस्थेत रुग्णांना सेवा दिली जात आहे. त्यामुळे एकाच खाटावर दोन तर कधी खालीसुद्धा रुग्णांवर औषधोपचार करावा लागत आहे. या समस्येकडे आरोग्य प्रशासनाचे लक्ष वेधणे गरजेचे झाले आहे. यासंदर्भात सीएस आणि आरएमओंशी संपर्क केला असता प्रतिसाद मिळू शकला नाही.आर्थोपेडिकमध्ये ३० खाटा, ४३ रुग्णइर्विन रुग्णालयातील आर्थोपेडिक कक्षा ३० खाटा असताना ४३ रुग्ण सोमवारी उपचार घेत असल्याचे निदर्शनास आले. अशाप्रकारे सर्वच वार्डांत खाटांच्या संख्येपेक्षा रुग्णसंख्या दुप्पटच राहत असल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. ब्रिटिश काळात निर्माण झालेल्या येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील खाटांची व्यवस्था स्वातंत्र्य मिळून ७१ वर्षे झाली असताना व वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत खाटांची ही संख्या तोकडी पडत आहे.