शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मजुरांची वानवा, मनसूनपूर्व शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

पूणे, मुंबईहून आलेली कुटुंब वळले शेतीकडे, भावा-भावात शेतीसाठी रस्सीखेच, नवीन सामाजिक समस्येने शेतकरी हतबल प्रशांत काळबेंडे जरूड : ...

पूणे, मुंबईहून आलेली कुटुंब वळले शेतीकडे, भावा-भावात शेतीसाठी रस्सीखेच, नवीन सामाजिक समस्येने शेतकरी हतबल

प्रशांत काळबेंडे

जरूड : कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना मान्सूनपूर्व पेरणी मशागतीच्या कामांकरिता मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. शेतीत यापूर्वी पिकविलेला पीक अद्यापही घरात पडून असल्याने व शेती करण्यासाठी हातात पैसे नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे मजूर व महिला वर्ग कामावरच जात नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांची नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुणे, मुंबई सारख्या शहरात कंपनीमध्ये कामावर असलेले शेतकरी पुत्र गावाकडे परत असल्याने व त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे पैशाअभावी घरात भांडणे होत असून, घरच्या स्त्रियांमध्ये घरकामावरून खटके उडत आहे. शहरात असलेली नोकरी गेल्याने कौटुंबिक कलह वाढला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात भावा-भावांमध्ये शेतीच्या हिस्से वाटणीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याने नवीन सामाजिक समस्येला शेतकरी कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीत माणसा-माणसांतील प्रेम कमी झाले असून, बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कोरोना संशयित म्हणून पाहिले जात असल्याने आजूबाजूचे शेजारीसुद्धा या कुटुंबासोबत वाळीत टाकल्यासारखा व्यवहार करीत असल्याने शेजाऱ्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर कोणत्याही आजारी व्यक्तीला दवाखान्यात पोहचविण्याचे सौजन्यही दाखवत नसल्याने या कोरोनाह्या भीतीने माणसातील माणुसकी नष्ट होत चालल्याचे विदारक चित्र पुढे येऊ लागले आहे.