शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

मजुरांची वानवा, मनसूनपूर्व शेतीची कामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:11 IST

पूणे, मुंबईहून आलेली कुटुंब वळले शेतीकडे, भावा-भावात शेतीसाठी रस्सीखेच, नवीन सामाजिक समस्येने शेतकरी हतबल प्रशांत काळबेंडे जरूड : ...

पूणे, मुंबईहून आलेली कुटुंब वळले शेतीकडे, भावा-भावात शेतीसाठी रस्सीखेच, नवीन सामाजिक समस्येने शेतकरी हतबल

प्रशांत काळबेंडे

जरूड : कोरोनाचे संकट आणखी गडद होत असताना मान्सूनपूर्व पेरणी मशागतीच्या कामांकरिता मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अधिकच भर पडली आहे. शेतीत यापूर्वी पिकविलेला पीक अद्यापही घरात पडून असल्याने व शेती करण्यासाठी हातात पैसे नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे.

दरवर्षी उन्हाळ्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग येतो. परंतु, यावर्षी कोरोनाच्या भीतीमुळे मजूर व महिला वर्ग कामावरच जात नसल्याने शेतकऱ्यांना मजुरांची नवीन समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुणे, मुंबई सारख्या शहरात कंपनीमध्ये कामावर असलेले शेतकरी पुत्र गावाकडे परत असल्याने व त्यांच्या हाताला काम नसल्यामुळे पैशाअभावी घरात भांडणे होत असून, घरच्या स्त्रियांमध्ये घरकामावरून खटके उडत आहे. शहरात असलेली नोकरी गेल्याने कौटुंबिक कलह वाढला. ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबात भावा-भावांमध्ये शेतीच्या हिस्से वाटणीसाठी रस्सीखेच सुरू झाल्याने नवीन सामाजिक समस्येला शेतकरी कुटुंबाला सामोरे जावे लागत आहे.

कोरोनाच्या जागतिक महामारीत माणसा-माणसांतील प्रेम कमी झाले असून, बाहेरून आलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे कोरोना संशयित म्हणून पाहिले जात असल्याने आजूबाजूचे शेजारीसुद्धा या कुटुंबासोबत वाळीत टाकल्यासारखा व्यवहार करीत असल्याने शेजाऱ्यांमध्ये कटुता निर्माण झाली आहे. इतकेच नव्हे तर कोणत्याही आजारी व्यक्तीला दवाखान्यात पोहचविण्याचे सौजन्यही दाखवत नसल्याने या कोरोनाह्या भीतीने माणसातील माणुसकी नष्ट होत चालल्याचे विदारक चित्र पुढे येऊ लागले आहे.