शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:33 IST

पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बाब शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा अधोरेखित करणारी असून, या गंभीर प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहे.

ठळक मुद्देशिक्षण खाते करणार का कारवाई? : पडक्या भिंतीबाबत शाळा प्रशासनाला केले होते अवगत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बाब शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा अधोरेखित करणारी असून, या गंभीर प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहे.आ. बच्चू कडू यांच्या शिक्षण संस्थेतील आष्टी येथील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालय परिसरातील जीर्ण खोल्यांची भिंत कोसळून वैभव गावंडेचा मृत्यू झाला, तर त्याचे तीन वर्गमित्र गंभीर जखमी झालेत. पन्नास वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात टिनाच्या दोन खोल्या बांधण्यात आल्या होत्या. प्रथम त्या जागेचा उपयोग शाळेचे संस्थापक अध्यक्ष मनसुखलाल देसाई यांनी गायींच्या गोठ्यासाठी केला होता. त्यानंतर शालेय साहित्य ठेवण्यासाठी गोदाम म्हणूनही त्या खोल्यांचा वापर झाला. कालांतराने या शाळेच्या संचालकाची जबाबदारी आ. बच्चू कडू यांच्याकडे आली. वसु महाराज या शाळेचे अध्यक्ष बनले. यादरम्यान या खोल्यांचे टिन गायब झाले अन् राहिल्या केवळ भिंती.गेल्या कित्येक वर्षांपासून या पडक्या भिंतीच्या आतील जागा ही लघुशंकेकरिता उपयोगात आणली गेली. इतक्या जुन्या बांधकामातील या भिंती केव्हाही कोसळेल, याची जाणीव प्रत्येकालाच होती. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जीर्ण भिंतीचा विषय प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळाला. या शिकस्त, पडक्या खोल्यांबद्दल शाळा व्यवस्थापन व व्यवस्थापन समिती अनभिज्ञ कशी राहू शकते, असा प्रश्न यानिमित्त निर्माण झाला. काही महिन्यांपूर्वीच शाळेत पालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळीसुद्धा पालकांनी जीर्ण खोल्यांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. एक तर या भिंती पाडून टाका किंवा दुरुस्ती करा, अशी मागणी केली होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाला जीर्ण खोल्यांचा मुद्दा क्षुल्लक वाटला. त्यांनी दुर्लक्षच केले. त्याची परिणती एका शाळकरी मुलाच्या अकाली मृत्यूत झाली आहे.शुक्रवारी दुपारी याच पडक्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठविले होते. भिंती जीर्ण झाल्याचे मुख्याध्यापकांसह शिक्षकांना माहिती असतानाही, त्यांनी विद्यार्थ्यांना तेथे का पाठविले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाºया शाळा व्यवस्थापनातील दोषींवर खरे तर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवायला हवा, असा सूर विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांच्या आक्रोशामध्ये दिसून येत होता. शाळेच्या हलगर्जीपणाची दखल शिक्षणाधिकारी घेतील का, दोषींविरुद्ध कारवाई करतील का, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.