शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
2
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
3
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
4
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
5
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
6
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
7
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
8
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
9
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
10
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
11
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
12
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
13
'भारताने दहशतवाद्यांविरोधात कारवाई करावी, पण युद्धाची परिस्थिती...'; पहलगाम हल्ल्यावर जेडी व्हान्स यांनी सोडलं मौन
14
PPF मध्ये काय असतो ५ तारखेचा फंडा, एक दिवस उशिर आणि होऊ शकतं १० हजारांपर्यंतचं नुकसान; समजून घ्या गणित
15
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
16
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
17
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."
18
सर्व दहशतवाद्यांचा शोध घेऊ, पहलगाम हल्ल्यानंतर अमित शहांचा मोठा इशारा; दहशतवादाविरोधात कठोर कारवाई
19
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
20
वैदिक मंत्रोच्चाराने उघडले केदारनाथ मंदिराचे दार; सर्वत्र 'बम बम भोले'चा जयजयकार

सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2019 23:33 IST

पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बाब शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा अधोरेखित करणारी असून, या गंभीर प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहे.

ठळक मुद्देशिक्षण खाते करणार का कारवाई? : पडक्या भिंतीबाबत शाळा प्रशासनाला केले होते अवगत

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : पन्नास वर्षांपूर्वीचे बांधकाम असलेल्या शाळेच्या आवारातील पडक्या व जीर्ण खोल्यांच्या दुरुस्तीचा मुद्दा पालकांनी काही दिवसांपूर्वी शाळेत झालेल्या बैठकीत मांडला होता. त्याची शाळा व्यवस्थापनाने दखल घेतली नाही. अखेर शुक्रवारी तीच जीर्ण भिंत अंगावर कोसळून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर तिघे जखमी झाले. ही बाब शाळा व्यवस्थापनाचा हलगर्जीपणा अधोरेखित करणारी असून, या गंभीर प्रकारासाठी शाळा व्यवस्थापनातील अधिकारी व पदाधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही, असा प्रश्न उपस्थित करीत आहे.आ. बच्चू कडू यांच्या शिक्षण संस्थेतील आष्टी येथील मणीबाई छगनलाल देसाई विद्यालय परिसरातील जीर्ण खोल्यांची भिंत कोसळून वैभव गावंडेचा मृत्यू झाला, तर त्याचे तीन वर्गमित्र गंभीर जखमी झालेत. पन्नास वर्षांपूर्वी शाळेच्या आवारात टिनाच्या दोन खोल्या बांधण्यात आल्या होत्या. प्रथम त्या जागेचा उपयोग शाळेचे संस्थापक अध्यक्ष मनसुखलाल देसाई यांनी गायींच्या गोठ्यासाठी केला होता. त्यानंतर शालेय साहित्य ठेवण्यासाठी गोदाम म्हणूनही त्या खोल्यांचा वापर झाला. कालांतराने या शाळेच्या संचालकाची जबाबदारी आ. बच्चू कडू यांच्याकडे आली. वसु महाराज या शाळेचे अध्यक्ष बनले. यादरम्यान या खोल्यांचे टिन गायब झाले अन् राहिल्या केवळ भिंती.गेल्या कित्येक वर्षांपासून या पडक्या भिंतीच्या आतील जागा ही लघुशंकेकरिता उपयोगात आणली गेली. इतक्या जुन्या बांधकामातील या भिंती केव्हाही कोसळेल, याची जाणीव प्रत्येकालाच होती. विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर जीर्ण भिंतीचा विषय प्रत्येकाच्या तोंडून ऐकायला मिळाला. या शिकस्त, पडक्या खोल्यांबद्दल शाळा व्यवस्थापन व व्यवस्थापन समिती अनभिज्ञ कशी राहू शकते, असा प्रश्न यानिमित्त निर्माण झाला. काही महिन्यांपूर्वीच शाळेत पालकांची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळीसुद्धा पालकांनी जीर्ण खोल्यांचा मुद्दा प्रकर्षाने मांडला होता. एक तर या भिंती पाडून टाका किंवा दुरुस्ती करा, अशी मागणी केली होती. मात्र, शाळा व्यवस्थापनाला जीर्ण खोल्यांचा मुद्दा क्षुल्लक वाटला. त्यांनी दुर्लक्षच केले. त्याची परिणती एका शाळकरी मुलाच्या अकाली मृत्यूत झाली आहे.शुक्रवारी दुपारी याच पडक्या खोलीची स्वच्छता करण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना पाठविले होते. भिंती जीर्ण झाल्याचे मुख्याध्यापकांसह शिक्षकांना माहिती असतानाही, त्यांनी विद्यार्थ्यांना तेथे का पाठविले, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे. या गंभीर प्रकाराकडे दुर्लक्ष करणाºया शाळा व्यवस्थापनातील दोषींवर खरे तर सदोष मनुष्यवधाचाच गुन्हा नोंदवायला हवा, असा सूर विद्यार्थ्यांच्या नातेवाइकांच्या आक्रोशामध्ये दिसून येत होता. शाळेच्या हलगर्जीपणाची दखल शिक्षणाधिकारी घेतील का, दोषींविरुद्ध कारवाई करतील का, असा प्रश्न यानिमीत्ताने उपस्थित झाला आहे.