शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या हल्ल्यात ११ नाही तर अनेक पाकिस्तानी सैनिक ठार; पाक लष्कराने केले मान्य
2
Operation Sindoor: पाकिस्तानच्या आण्विक सुविधा केंद्रामधून किरणोत्सर्ग झालाय का, IAEA ने काय सांगितले?
3
Boycott Turkey: एकनाथ शिंदेंनी भारतीय व्यापारी आणि पर्यटकांची थोपाटली पाठ, तुर्की-अझरबैजानला फटका!
4
पहलगामचा बदला; आता स्थानिक दहशतवादी भारतीय सैन्याच्या निशाण्यावर, आतापर्यंत 6 ठार
5
Viral Video : आईस्क्रीममध्ये सापडली पालीची शेपूट; व्हिडीओ पाहून तुम्हालाही किळस येईल
6
निफ्टीने ७ महिन्यांनंतर ओलांडला २५,००० चा टप्पा; डिफेन्समधील तेजी कायम, हे शेअर्स घसरले
7
IND vs ENG: तब्बल ५०५५ दिवसांनंतर टीम इंडियाच्या बाबतीत घडून येणार 'असा' योगायोग
8
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
9
'तो' वाद पिझ्झाच्या क्वालिटीवरून, मराठी न बोलण्यावरून नाही; महिलेने सांगितली खरी स्टोरी
10
उल्हासनगरात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! पत्नी व मुलीची हत्या करून पवन पाहुजा यांनी घेतला गळफास
11
Video - दहशतवाद्याच्या हातात बंदूक, चेहऱ्यावर भीती...; त्राल चकमकीचं ड्रोन फुटेज आलं समोर
12
WTC Finalच्या विजेत्याला मिळणार मोठ्ठी रक्कम, टीम इंडियाही मालामाल, पाकिस्तानला किती बक्षीस?
13
आमिर खान-राजकुमार हिरानी पुन्हा एकत्र, महाराष्ट्राच्या 'या' सुपुत्रावर घेऊन येणार बायोपिक!
14
पाकिस्तानातून गाढवांची खरेदी का करतो भारताचा शेजारी देश? काय आहे चिनी कनेक्शन?
15
इंग्लंड दौऱ्याआधी टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरने पत्नीसह घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन
16
सोशल मीडियावर लाईव्ह होती प्रसिद्ध इन्फ्लुएंसर, भेटवस्तू देण्याच्या बहाण्याने आलेल्या इसमाने झाडल्या गोळ्या!
17
Swami Samartha: स्वामी कृपा व्हावी वाटत असेल तर त्यांना नावडणारी 'ही' गोष्ट ताबडतोब सोडा!
18
कहाणी १९६५ च्या युद्धाची! आदमपूर एअरबेसवर कब्जा करण्यासाठी उतरले ५५ पाकिस्तानी कमांडो, १२ ठार तर बाकी...
19
मुकेश अंबानी यांनी घेतली डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; आखाती देशात किती पसरलाय व्यवसाय?
20
IAS-IPS बनण्याची सूवर्णसंधी; UPSC ने जारी केले परीक्षांचे वेळापत्रक, जाणून घ्या संपूर्ण माहिती...

‘मनभरी’विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

By admin | Updated: September 30, 2016 00:23 IST

चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता.

सब चलता है... : अमरावतीत एफडीएची गरज तरी काय ? अमरावती : चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अन्न, औषधी प्रशासनाला तशी फौजदारी तक्रार नोंदविण्याचे अधिकार आहेत. परंतु संबंधित विभागाने ते का टाळले, हे गूढ आहे. एखाद्या खाद्यपदार्थात पाल किंवा कुठलाही हानीकारक पदार्थ आढळल्यास फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. मानवी शरीराला अपाय पोहोचविणारा कुठलाही पदार्थ खाद्यान्नात आढळल्यास, तो खाल्ल्यामुळे उलट्या झाल्यास तो शरीराला अपायकारक आहे, असे संकेत मिळतात. अन्न औषधी प्रशासन विभागाने या मुद्याची तातडीने दखल घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त करवून घेणे महत्त्वाचे ठरते. संबंधित ग्राहकही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्यांनी घेतलेली 'ट्रीटमेंट' अधिकृत पुरावा ठरते. मुळात ज्या ग्राहकाने बाधित अन्नाचे सेवन केले त्या ग्राहकाला झालेला आरोग्याविषयीचा त्रास हादेखील पुरावाच ठरतो. त्याने तक्रार केली असल्यास त्यानुसार प्रक्रिया करून वा तक्रार केली नसल्यास संबंधित ग्राहकाचे बयाण नोंदवून अन्न औषधी प्रशासनाने फौजदारी प्रक्रियेची तयारी आरंभायला हवी. मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळलेली पाल शरीराला घातक ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पालीच्या सेवनाने विषबाधा होऊ शकते. पालीने सेवन केलेले कीटक मानवी शरीराला घातक असणाऱ्या श्रेणीतील असतील तर त्यामुळेदखील शारीरिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते. पाल ज्या भागात फिरते, त्या भागात असलेले जिवाणू मानवी शरीरात आजार निर्माण करणारे असू शकतात. तसे जिवाणू पूर्ण खाद्यान्नात वाढीस लागले आणि ते अन्न सेवन केले गेले तर मानवी आरोग्याला अपाय निर्माण होऊ शकतो. या सर्वच शक्यता मनभरी चिवड्यात आढळलेल्या पालिच्या अनुषंगाने निर्माण झाल्या आहेत. तरीही बळ मनभरीच्याच पारड्यात आहे. (प्रतिनिधी)