शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

‘मनभरी’विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का नाही?

By admin | Updated: September 30, 2016 00:23 IST

चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता.

सब चलता है... : अमरावतीत एफडीएची गरज तरी काय ? अमरावती : चिवड्यात आढळलेल्या पालीच्या मुद्यावरून कायद्याच्या नियमांनुसार मनभिरीविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला हवा होता. अन्न, औषधी प्रशासनाला तशी फौजदारी तक्रार नोंदविण्याचे अधिकार आहेत. परंतु संबंधित विभागाने ते का टाळले, हे गूढ आहे. एखाद्या खाद्यपदार्थात पाल किंवा कुठलाही हानीकारक पदार्थ आढळल्यास फौजदारी गुन्ह्याच्या अनुषंगाने त्याची दखल घेतली जाणे आवश्यक आहे. मानवी शरीराला अपाय पोहोचविणारा कुठलाही पदार्थ खाद्यान्नात आढळल्यास, तो खाल्ल्यामुळे उलट्या झाल्यास तो शरीराला अपायकारक आहे, असे संकेत मिळतात. अन्न औषधी प्रशासन विभागाने या मुद्याची तातडीने दखल घेऊन वैद्यकीय तज्ज्ञांचा अहवाल प्राप्त करवून घेणे महत्त्वाचे ठरते. संबंधित ग्राहकही वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे गेल्यास त्यांनी घेतलेली 'ट्रीटमेंट' अधिकृत पुरावा ठरते. मुळात ज्या ग्राहकाने बाधित अन्नाचे सेवन केले त्या ग्राहकाला झालेला आरोग्याविषयीचा त्रास हादेखील पुरावाच ठरतो. त्याने तक्रार केली असल्यास त्यानुसार प्रक्रिया करून वा तक्रार केली नसल्यास संबंधित ग्राहकाचे बयाण नोंदवून अन्न औषधी प्रशासनाने फौजदारी प्रक्रियेची तयारी आरंभायला हवी. मनभरी उत्पादनाच्या चिवड्यात आढळलेली पाल शरीराला घातक ठरू शकते, असे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. पालीच्या सेवनाने विषबाधा होऊ शकते. पालीने सेवन केलेले कीटक मानवी शरीराला घातक असणाऱ्या श्रेणीतील असतील तर त्यामुळेदखील शारीरिक अस्वास्थ्य निर्माण होऊ शकते. पाल ज्या भागात फिरते, त्या भागात असलेले जिवाणू मानवी शरीरात आजार निर्माण करणारे असू शकतात. तसे जिवाणू पूर्ण खाद्यान्नात वाढीस लागले आणि ते अन्न सेवन केले गेले तर मानवी आरोग्याला अपाय निर्माण होऊ शकतो. या सर्वच शक्यता मनभरी चिवड्यात आढळलेल्या पालिच्या अनुषंगाने निर्माण झाल्या आहेत. तरीही बळ मनभरीच्याच पारड्यात आहे. (प्रतिनिधी)