शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

-तर कशासाठी निवडले थेट जनतेतून सरपंच?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 23:20 IST

जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला?

ठळक मुद्देटेंब्रुसोंडा येथील सरपंचांचा सवाल : ही तर अधिकारावर गदा

आॅनलाईन लोकमतचिखलदरा : जनतेमधून थेट सरपंच निवडीचा कायदा करताना केलेल्या चुकांशी आमचा संबंध काय, आमच्या अधिकारावर गदा आणून पदापासून वंचित ठेवण्याचे घटनाबाह्य कार्य करण्याचा शासनाला कुणी अधिकार दिला? आयोगाने पूर्वीच का नाही लक्ष दिले? सरपंचपदी निवडून आल्याचे प्रमाणपत्र दिल्यावर पदभार सांभाळण्यापासून वंचित ठेवून थेट प्रशासकाची निवड करता, तर मग हे प्रमाणपत्रच परत घ्या, असा संतप्त सवाल टेंब्रुसोंडा येथे थेट जनतेमधून निवडून आलेल्या आदिवासी महिला सरपंच उर्मीला दहीकर यांनी प्रशासनाला केला आहे.जिल्ह्यातील सात सरपंचांना पदभार न देता शनिवारी प्रशासक नेमणुकीचे आदेश जिल्हाधिकाºयांनी जि.प.सीईओंना दिले. पं.स. प्रशासनाने चिखलदरा तालुक्यातील टेंब्रुसोंडा, सोनापूर, मेहरीआम, धारणी तालुक्यातील बोबदो, जामपाणी, भातकुलीच्या बैलमारखेडा व चांदूर बाजार तालुक्यातील मिर्झापूर ग्रामपंचायतींवर सरपंचाऐवजी प्रशासकाची नेमणूक केली. ५० टक्के पेक्षा अधिक जागा रिक्त असल्याने येथे रविवारची उपसरपंचपदाची निवडणूक रद्द केली आहे. सरपंचपदाच्या अधिकारावर गदा आणणाºया ठरल्या.मग प्रमाणपत्रच परत घ्या ना !आपण आदिवासी महिला सरपंच आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार थेट जनतेतून निवडून आले. प्रशासक निवडण्यापेक्षा सरपंचपदाचे दिलेले प्रमाणपत्रच परत घ्या. अगोदर कायद्यात योग्य तरतुदी करा आणि मग आम्हाला सरपंच बनवा, आयोगाच्या चुकीचा फटका आमच्या कार्यकाळाला का? कुठल्या अधिकाराने, असा संतप्त सवाल टेंब्रुसोंडा येथील सरपंच उर्मीला दहीकर यांनी प्रशासनाला केला आहे. रिक्त जागा वर्षभर उमेदवार न भेटले तर आम्हाला पदापासून वंचित ठेवणार का, असा खडा सवाल त्यांनी केला.जनतेमधून थेट सरपंचपदी निवडून आल्यानंतरही पदापासून वंचित ठेवणे हे घटनाबाह्य आहे. आम्ही जनतेमधून थेट निवडून आल्यावर प्रशासनाची चूक अधिकारावर गदा आणणारी आहे. मग प्रमाणपत्रच पर घ्या.- उर्मीला दहीकर, सरपंच,टेंब्रुसोंडा, ता. चिखलदरा