शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

लसीकरणानंतर अँटीबॉडी तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

अमरावती : यापूर्वी झालेला कोरोनाचा संसर्ग किंवा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार ...

अमरावती : यापूर्वी झालेला कोरोनाचा संसर्ग किंवा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार झालेत आहेत का, याची तपासणी करीत आहेत. विविध लॅबमध्ये दिवसाला २० ते २५ जण अशाप्रकारच्या तपासण्या करीत आहेत. या प्रकारामुळे त्यांच्या वावरण्यात काहीसा बिनधास्तपणा दिसून येत आहे.

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यात प्रतिपिंड तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात प्रतिपिंड तयार होतात, हे एक प्रकारच कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली. त्तमध्ये ज्या नागरिकांना संसर्ग झालेला नाही, अश व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना तर होऊन गेलेला नाही, या शंकेने अँटीबॉडीजची तपासणी करताना आढळून येत आहे. शहरातील खासगी पॅथाॅलॉजीत अलीकडे अशा तपासणीसाठी नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारच्या चाचण्यांची काहीच आवश्यकता नसते व लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना विषाणूत बदल होत असल्याने तयार प्रतिपिंड किती सामना करू शकतील. याविषयी अद्याप संशोधन सुरू असल्याने प्रत्येकाने पंचसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे असल्त्चेने डॉक्टरांनी सांगितले.

पाईंटर

एकूण लसीकरण : ७,३८,९९६

पहिला डोस : ५,४९,६२२

दुसरा डोस : १,८९,३७४

लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण : २४.६३ टक्के

बॉक्स

अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ

शहरात अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाली का, यासंदर्भात येथील रामार्पण पॅथाॅलॉजीचे विजय देवळे यांच्याशी संपर्क साधला असता, लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यासाठी रोज किंवा एक दिवसाआड एक-दोन व्यक्ती येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शहरात रोज किमान २५ तरी चाचण्या होत असण्याची शक्यता डॉ. काळे यांनी वर्तविली.

बॉक्स

तरुणांईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता

लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यात शरीरातील प्रतिपिंडे वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काहीजण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही आढळून येत आहेत. लसीकरणानंतर संसर्ग जरी झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉ. मंगेश काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोट

कोरोना होऊन गेला काय किंवा झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात का, याच्या तपासणीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. याशिवाय लसीकरणा नंतर ॲन्टीबॉडी वाढल्या काय, यासाठी काही जण तपासणी करतात. वास्तविक पाहता ही तपासणी करण्याची गरज नाही. किंवा या तपासणीत अँटीबॉडी पकडल्या जातील, असेही नाही.

- डॉ श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक