शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

लसीकरणानंतर अँटीबॉडी तपासणी करायची कशासाठी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:10 IST

अमरावती : यापूर्वी झालेला कोरोनाचा संसर्ग किंवा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार ...

अमरावती : यापूर्वी झालेला कोरोनाचा संसर्ग किंवा लसींचे दोन्ही डोस घेतल्यानंतर काही नागरिक आपल्या शरीरामध्ये कोरोना विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी प्रतिपिंड (अँटीबॉडी) तयार झालेत आहेत का, याची तपासणी करीत आहेत. विविध लॅबमध्ये दिवसाला २० ते २५ जण अशाप्रकारच्या तपासण्या करीत आहेत. या प्रकारामुळे त्यांच्या वावरण्यात काहीसा बिनधास्तपणा दिसून येत आहे.

कोरोनातून मुक्त झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या शरीरात काही प्रमाणात कोरोना विषाणूविरुद्ध लढण्यात प्रतिपिंड तयार होतात. याशिवाय लसीकरणाच्या दोन्ही डोसनंतर शरीरात प्रतिपिंड तयार होतात, हे एक प्रकारच कवच आहे. मात्र, कोरोना प्रतिबंधक उपाययोजना व नियमांचे पालन करणेदेखील तेवढेच महत्त्वाचे आहे.

कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली. त्तमध्ये ज्या नागरिकांना संसर्ग झालेला नाही, अश व्यक्तींद्वारा त्यांना कोरोना तर होऊन गेलेला नाही, या शंकेने अँटीबॉडीजची तपासणी करताना आढळून येत आहे. शहरातील खासगी पॅथाॅलॉजीत अलीकडे अशा तपासणीसाठी नागरिकांचा कल वाढल्याचे दिसून येते. मात्र, प्रत्येक नागरिकांनी अशा प्रकारच्या चाचण्यांची काहीच आवश्यकता नसते व लसीकरणानंतर कोरोनाचा संसर्ग झाल्यास यामध्ये गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कोरोना विषाणूत बदल होत असल्याने तयार प्रतिपिंड किती सामना करू शकतील. याविषयी अद्याप संशोधन सुरू असल्याने प्रत्येकाने पंचसूत्रीचे पालन करणे महत्त्वाचे असल्त्चेने डॉक्टरांनी सांगितले.

पाईंटर

एकूण लसीकरण : ७,३८,९९६

पहिला डोस : ५,४९,६२२

दुसरा डोस : १,८९,३७४

लोकसंख्येच्या तुलनेत प्रमाण : २४.६३ टक्के

बॉक्स

अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ

शहरात अँटीबॉडी तपासणीच्या प्रमाणात वाढ झाली का, यासंदर्भात येथील रामार्पण पॅथाॅलॉजीचे विजय देवळे यांच्याशी संपर्क साधला असता, लसीकरणानंतर दोन आठवड्यांनी शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत का, याची तपासणी करण्यासाठी रोज किंवा एक दिवसाआड एक-दोन व्यक्ती येत असल्याचे ते म्हणाले. त्यामुळे शहरात रोज किमान २५ तरी चाचण्या होत असण्याची शक्यता डॉ. काळे यांनी वर्तविली.

बॉक्स

तरुणांईसह ज्येष्ठांनाही उत्सुकता

लसीचा दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यात शरीरातील प्रतिपिंडे वाढतात. त्यामुळे अशा प्रकारच्या तपासण्यांची काहीच आवश्यकता नाही. काहीजण तर केवळ उत्सुकतेपोटी या चाचण्या करीत आहेत. यामध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिकही आढळून येत आहेत. लसीकरणानंतर संसर्ग जरी झाला तरी गंभीर होण्याची शक्यता कमी असल्याचे डॉ. मंगेश काळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कोट

कोरोना होऊन गेला काय किंवा झाल्यानंतर शरीरात अँटीबॉडी तयार झाल्यात का, याच्या तपासणीचे प्रमाण अलीकडे वाढले आहे. याशिवाय लसीकरणा नंतर ॲन्टीबॉडी वाढल्या काय, यासाठी काही जण तपासणी करतात. वास्तविक पाहता ही तपासणी करण्याची गरज नाही. किंवा या तपासणीत अँटीबॉडी पकडल्या जातील, असेही नाही.

- डॉ श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्य चिकित्सक