शहरं
Join us  
Trending Stories
1
"कमी बोला, जास्त काम करा"; पक्षातील नेत्यांना एकनाथ शिंदेंच्या कानपिचक्या, म्हणाले...
2
जगातील सर्वात वृद्ध धावपटू फौजा सिंग यांचे वयाच्या ११४ व्या वर्षी निधन; महामार्गावर झाला होता अपघात
3
हुंड्यासाठी छळ केल्याचा आरोप, विवाहितेचे कापले केस; दीड वर्षाच्या चिमुकलीसह महिलेनं संपवलं आयुष्य
4
हे तर भयंकरच! मुंबई लोकल की, मृत्यूचे कारण?; 8 वर्षात 8 हजार 273 प्रवाशांचा मृत्यू
5
इराणची भीती संपेना! इस्राइलवर आता विश्वासच नाही; पुन्हा करतायत युद्धाची तयारी
6
पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला पाकिस्तानी नेत्यांनी घडवून आणला होता, अहवालात मोठा दावा
7
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
8
ओला इलेक्ट्रीक स्कूटरवर महाराष्ट्रात गंडांतर; ३८५ शोरूम पडले बंद
9
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
10
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
11
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
12
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
13
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
14
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
15
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
16
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
17
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
18
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
19
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
20
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय

पॅसेंजर रेल्वे अद्याप ‘लॉक’ का? सामान्य प्रवाशांचा सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:17 IST

विशेष गाड्यांच्या प्रवास भाड्यांनी कंबरडे मोडले, भुसावळ- नागपूर, अमरावती- नागपूर सवारी गाडी सुरू करण्याची मागणी अमरावती : कोरोनाच्या ...

विशेष गाड्यांच्या प्रवास भाड्यांनी कंबरडे मोडले, भुसावळ- नागपूर, अमरावती- नागपूर सवारी गाडी सुरू करण्याची मागणी

अमरावती : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल होऊन अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे बंद का, याबाबत प्रवाशांकडून विचारणा केली जात असून, त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल १० महिने रेल्वे वाहतूक ठप्प आहे. आता शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही मोजक्याच विशेष रेल्वे सुरू आहेत. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरी पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे.

बॉक्स

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच

१) बडनेरा, अमरावती रेल्वे स्थानकावरून नागपूर- अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा - भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरू होत्या. अमरावती- नागपूर इंटरसिटी एक्स्प्रेस, नागपूर- जबलपूर, नागपूर-अमरावती, भुसावळ पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू होत्या. मात्र, कोरोनामुळे या सर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

-------------

सुरू असलेल्या विशेष रेल्वे

१) सध्या अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावरून २४ रेल्वेगाड्या धावतात. दरदिवशी धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई - गाेंदिया विदर्भ एक्सप्रेस, अहमदाबाद -चेन्नई नवजीवन, मुंबई - हावडा स्पेशल, कोल्हापूर - गाेंदिया महाराष्ट्र स्पेशल, अहमदाबाद - हावडा, पुणे- हावडा विशेष, मुंबई - नागपूर, अमरावती- मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-तिरूपती, अमरावती-पुणे विशेष यांचा समावेश आहे.

------------------

रेल्वेचा प्रवास परवडेना!

कोरोनापूर्वी रेल्वेने नागपूर येथून अपडाऊन करायचो. मात्र, पॅसेंजर रेल्वे बंद झाल्याने मोठे हाल झाले. सध्या केवळ स्पेशल रेल्वेगाड्या धावत असून त्यातही आरक्षणाची अट असल्याने दुप्पट पैसे मोजावे लागत असल्याने खासगी वाहनाने किंवा एसटीने ये-जा करावे आहे. पॅसेंजर गाड्या कधी सुुरू होईल, याकडे लक्ष लागले आहे.

- मुंकूद जोशी, रेल्वे प्रवासी

-----------------

पॅसेंजर बंद असल्याने प्रवासासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहे. विना आरक्षण प्रवास करण्यास प्रतिबंध असल्याने अवघ्या कमी अंतरावर जाण्यासाठीही आगाऊ पैसे मोजावे लागत आहे. आता तर हॉटेल्स, मॉल्स यांनादेखील परवानगी मिळाली आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या सुरू करून प्रवाशांना दिलासा मिळावा.

- प्रवीण कस्तुरे, रेल्वे प्रवासी