शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

भुजबळांना तुरुंगात डांबले अजित पवारांना का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:30 IST

राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.

ठळक मुद्देअसदुद्दीन ओवैसी यांचा सवाल : सिंचन घोटाळ्यावर भाजपकडून पडदा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.अमरावती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारार्थ खासदार ओवैसी यांची येथे जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. भाजप-सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सर्व पक्षांचा एक क्लब असून, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्ही गरीब, सामान्य, शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी आता वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र क्लब बनवित असल्याची ग्वाही त्यांनी दिली.अजित पवार यांना सिंचन प्रकल्पाच्या घोटाळ्यातून पुरेपूर वाचवण्यात आले. त्याऐवजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. हैद्राबादी म्हणीनुसार ‘चोरा चोरा करके गावां बाट लिया’ असे भाजप आणि शरद पवार यांचे राजकीय सख्य आहे. त्यामुळे आता ‘चौकीदार’, ‘साहेबां’ना सोडा अन् प्रकाश आंबेडकरांना साथ द्या, अशी हाक ओवैसी यांनी मतदारांना दिली.मोदींमुळे राज्यघटना असुरक्षितपाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने केंद्रात सत्ता स्थापन केली. आता जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा निवडणुकीत मोदी यांनी हिंदू-मुस्लिम वाद प्रचारात आणल्याने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही धोक्यात आली असून, राज्यघटना असुरक्षित आहे, असे ओवैसी म्हणाले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मार्गदर्शन केले.उद्धव ठाकरे ‘भिगी बिल्ली’शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुद्ध रान पेटविले. ‘चौकीदार चोर है’ म्हणत मोदींना लक्ष्य केले. मात्र, लोकसभा निवडणूक लागताच आता ‘चौकीदार जिंदाबाद’चे नारे लावले जात आहे. असे काय घडले, मोदी, शहांच्या डरकाळीने ठाकरे हे १०० मीटरच्या गतीने धावत गेले आणि भाजपसोबत युती केली, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला.