शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळला
2
अल-फलाह विद्यापीठ संशयाच्या कचाट्यात, वेबसाइटवरील खोट्या मान्यतेच्या दाव्याबद्दल चौकशी सुरू; NAAC कडून नोटीस जारी
3
"प्रत्येक काश्मीरी दहशतवादी नाही", दिल्ली स्फोटावर मुख्यमंत्री उमर अब्दुल्लांची प्रतिक्रिया
4
जगात सर्वात शक्तिशाली सैन्य असणाऱ्या देशांची यादी जारी; अमेरिका टॉपवर, भारताचा कितवा नंबर?
5
Delhi Blast: दिल्लीत बॉम्बस्फोट घडवणाऱ्यांना धडा शिकवला जाणार, अमित शहांची गुप्तचर अधिकाऱ्यांसोबत बैठक
6
रस्त्यावर फक्त माणसाचा पायच दिसला, पण तो व्यक्ती कोण?; इंदापूरला हादरवून टाकणारी घटना
7
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
8
रुपाली ठोंबरेंना दुसरा धक्का, स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान नाही; पक्षाने साइडलाइन केले?
9
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
10
बॉलिवूडच्या या अभिनेत्रीच्या घरी हलला पाळणा, छोट्या परीला घेतलं दत्तक, फोटो शेअर करून दिली खुशखबर
11
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
12
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
13
कोणत्या देवाची उपासना ठरते शीघ्र फलदायी? प्रेमानंद महाराजांनी दिले चपखल उत्तर!
14
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
15
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
16
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
17
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
18
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
19
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
20
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली

भुजबळांना तुरुंगात डांबले अजित पवारांना का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 23:30 IST

राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.

ठळक मुद्देअसदुद्दीन ओवैसी यांचा सवाल : सिंचन घोटाळ्यावर भाजपकडून पडदा

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : राज्यात सिंचन घोटाळा झाला. माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांना ‘क्लीन चिट’ देण्यात आली. कमजोर असलेल्या छगन भुजबळांना तुरुंगात डांबण्यात आले. हा सर्व प्रकार ‘साहेबां’च्या आदेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला, असा घणाघात एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी सोमवारी येथे केला.अमरावती लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गुणवंत देवपारे यांच्या प्रचारार्थ खासदार ओवैसी यांची येथे जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. भाजप-सेना, काँग्रेस-राष्ट्रवादी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. या सर्व पक्षांचा एक क्लब असून, त्याचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे आम्ही गरीब, सामान्य, शेतकरी, कष्टकरी, वंचितांसाठी आता वंचित बहुजन आघाडी हा स्वतंत्र क्लब बनवित असल्याची ग्वाही त्यांनी दिली.अजित पवार यांना सिंचन प्रकल्पाच्या घोटाळ्यातून पुरेपूर वाचवण्यात आले. त्याऐवजी ओबीसी नेते छगन भुजबळ यांना बळीचा बकरा बनविण्यात आले. हैद्राबादी म्हणीनुसार ‘चोरा चोरा करके गावां बाट लिया’ असे भाजप आणि शरद पवार यांचे राजकीय सख्य आहे. त्यामुळे आता ‘चौकीदार’, ‘साहेबां’ना सोडा अन् प्रकाश आंबेडकरांना साथ द्या, अशी हाक ओवैसी यांनी मतदारांना दिली.मोदींमुळे राज्यघटना असुरक्षितपाच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठी आश्वासने केंद्रात सत्ता स्थापन केली. आता जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. यंदा निवडणुकीत मोदी यांनी हिंदू-मुस्लिम वाद प्रचारात आणल्याने देशात अस्थिरतेचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकशाही धोक्यात आली असून, राज्यघटना असुरक्षित आहे, असे ओवैसी म्हणाले. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही मार्गदर्शन केले.उद्धव ठाकरे ‘भिगी बिल्ली’शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी आणि भाजपाविरुद्ध रान पेटविले. ‘चौकीदार चोर है’ म्हणत मोदींना लक्ष्य केले. मात्र, लोकसभा निवडणूक लागताच आता ‘चौकीदार जिंदाबाद’चे नारे लावले जात आहे. असे काय घडले, मोदी, शहांच्या डरकाळीने ठाकरे हे १०० मीटरच्या गतीने धावत गेले आणि भाजपसोबत युती केली, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला.