शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

तुम्ही कुणाला मत दिले ते सात सेकंदात दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:45 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (मतदान यंत्र) सोबत व्हीव्हीपॅट (मतदान झाल्याचे दर्शविणारी चिठ्ठी) चा वापर होणार आहे. यामुळे मतदान यंत्राबाबत शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून ‘जनविश्वास अभियान’ या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सर्व मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिके दाखविण्याकरिता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम तयार करण्यात आ आहे. जनविश्वास अभियान अंतर्गत तालुकानिहाय पथकांची निवड केली आहे. एकूण १५ पथके यासाठी आहेत. या पथकांमध्ये प्रत्येकी पाच कर्मचारी राहतील. सोबतच या यंत्राच्या सुरक्षेकरिता पोलीस कर्मचारीही राहणार आहे. सदर पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाद्वारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार करतील. सोबतच मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (मॉक पोल) करून घेतील. याकरिता १५ वाहने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण ३४ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राहतील, असे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले.सदर अभियान सर्व विधानसभा मतदारसंघांतील गावांमध्ये मतदार केंद्रे तसेच आठवडी बाजार, शहरातील मुख्य चौक, ग्रामपंचायत कार्यालय आदी मोक्याच्या ठिकाणी राबविले जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार नीता लबडे उपस्थित होत्या.-तरच पुन्हा मतमोजणीआपण कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीद्वारे दिसेल. ती चिठ्ठी त्याच सीलबंद पेटीत पडेल. दरम्यान, कमी मतफरकाने उमेदवार विजयी होत असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराने पुन्हा मतमोजणीची लेखी स्वरूपात मागणी केली, तरच निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.