शहरं
Join us  
Trending Stories
1
"एनडीए जोरदार आघाडीवर...": बिहार निकालांवर शशी थरूर यांचे मोठे विधान; काँग्रेसला दिला सल्ला
2
"नितीश कुमार मुख्यमंत्री होते, आहेत अन् राहतील..."; JDU नं केलेली पोस्ट काही मिनिटांतच डिलीट
3
Bihar Election 2025 Result: धीरेंद्र शास्त्रींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “राष्ट्रवाद...”
4
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
5
बिहारमध्ये खेळ कोणी पालटला...? ७१.६ टक्के महिलांनी मतदान केलेले, पुरुष बरेच मागे राहिले...
6
ना कंपनी बनवली, ना माल विकला; तरीही रिफंडच्या नावावर सरकारकडून वसूल केले ६४५ कोटी, कसा लावला चुना?
7
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
8
"बिहारमध्ये जो 'गेम' झालाय, तो..."; विधानसभा निवडणुकीच्या निकालावर अखिलेश यादव यांचा टोला
9
Mumbai: बीकॉम विद्यार्थ्याची जबरदस्तीने लिंग बदल शस्त्रक्रिया; ट्रान्सजेंडर टोळीकडून ब्लॅकमेलिंग आणि खंडणी!
10
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
11
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
12
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
13
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
14
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
15
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
16
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
17
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
18
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
19
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
20
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कुणाला मत दिले ते सात सेकंदात दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:45 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (मतदान यंत्र) सोबत व्हीव्हीपॅट (मतदान झाल्याचे दर्शविणारी चिठ्ठी) चा वापर होणार आहे. यामुळे मतदान यंत्राबाबत शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून ‘जनविश्वास अभियान’ या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सर्व मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिके दाखविण्याकरिता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम तयार करण्यात आ आहे. जनविश्वास अभियान अंतर्गत तालुकानिहाय पथकांची निवड केली आहे. एकूण १५ पथके यासाठी आहेत. या पथकांमध्ये प्रत्येकी पाच कर्मचारी राहतील. सोबतच या यंत्राच्या सुरक्षेकरिता पोलीस कर्मचारीही राहणार आहे. सदर पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाद्वारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार करतील. सोबतच मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (मॉक पोल) करून घेतील. याकरिता १५ वाहने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण ३४ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राहतील, असे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले.सदर अभियान सर्व विधानसभा मतदारसंघांतील गावांमध्ये मतदार केंद्रे तसेच आठवडी बाजार, शहरातील मुख्य चौक, ग्रामपंचायत कार्यालय आदी मोक्याच्या ठिकाणी राबविले जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार नीता लबडे उपस्थित होत्या.-तरच पुन्हा मतमोजणीआपण कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीद्वारे दिसेल. ती चिठ्ठी त्याच सीलबंद पेटीत पडेल. दरम्यान, कमी मतफरकाने उमेदवार विजयी होत असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराने पुन्हा मतमोजणीची लेखी स्वरूपात मागणी केली, तरच निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.