शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Best Bus Accident: भांडुपमध्ये भीषण अपघात! रिव्हर्स घेताना 'बेस्ट' बसनं प्रवाशांना चिरडलं; ४ जण ठार, ९ जखमी
2
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
3
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
4
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
5
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
6
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
7
Municipal Election: भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
8
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
9
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
10
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
11
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
12
BMC Elections: किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
13
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
14
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
15
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
16
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
17
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
18
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
19
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
20
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही कुणाला मत दिले ते सात सेकंदात दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:45 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (मतदान यंत्र) सोबत व्हीव्हीपॅट (मतदान झाल्याचे दर्शविणारी चिठ्ठी) चा वापर होणार आहे. यामुळे मतदान यंत्राबाबत शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून ‘जनविश्वास अभियान’ या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सर्व मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिके दाखविण्याकरिता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम तयार करण्यात आ आहे. जनविश्वास अभियान अंतर्गत तालुकानिहाय पथकांची निवड केली आहे. एकूण १५ पथके यासाठी आहेत. या पथकांमध्ये प्रत्येकी पाच कर्मचारी राहतील. सोबतच या यंत्राच्या सुरक्षेकरिता पोलीस कर्मचारीही राहणार आहे. सदर पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाद्वारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार करतील. सोबतच मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (मॉक पोल) करून घेतील. याकरिता १५ वाहने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण ३४ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राहतील, असे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले.सदर अभियान सर्व विधानसभा मतदारसंघांतील गावांमध्ये मतदार केंद्रे तसेच आठवडी बाजार, शहरातील मुख्य चौक, ग्रामपंचायत कार्यालय आदी मोक्याच्या ठिकाणी राबविले जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार नीता लबडे उपस्थित होत्या.-तरच पुन्हा मतमोजणीआपण कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीद्वारे दिसेल. ती चिठ्ठी त्याच सीलबंद पेटीत पडेल. दरम्यान, कमी मतफरकाने उमेदवार विजयी होत असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराने पुन्हा मतमोजणीची लेखी स्वरूपात मागणी केली, तरच निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.