शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

तुम्ही कुणाला मत दिले ते सात सेकंदात दिसेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 22:45 IST

२०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

ठळक मुद्देपत्रपरिषद : जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : २०१९ मध्ये होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा वापर होणार आहे. यावेळी प्रत्येक मतदारास त्याचे मत योग्य उमेदवारासच पडले आहे, याची खात्री सात सेकंदात करून घेता येणार आहे. नागरिकांनी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट जनजागृती डेमो कार्यक्रमात सक्रिय सहभाग घेऊन या नव्या पद्धतीची माहिती घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येत्या लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (मतदान यंत्र) सोबत व्हीव्हीपॅट (मतदान झाल्याचे दर्शविणारी चिठ्ठी) चा वापर होणार आहे. यामुळे मतदान यंत्राबाबत शंकांचे निरसन करण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात २६ डिसेंबरपासून ‘जनविश्वास अभियान’ या जनजागृती मोहिमेला प्रारंभ होत आहे.ईव्हीएम व व्हीव्हीपॅटची सर्व मतदान केंद्रनिहाय प्रात्यक्षिके दाखविण्याकरिता जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यक्रम तयार करण्यात आ आहे. जनविश्वास अभियान अंतर्गत तालुकानिहाय पथकांची निवड केली आहे. एकूण १५ पथके यासाठी आहेत. या पथकांमध्ये प्रत्येकी पाच कर्मचारी राहतील. सोबतच या यंत्राच्या सुरक्षेकरिता पोलीस कर्मचारीही राहणार आहे. सदर पथकातील कर्मचारी फिरत्या वाहनाद्वारे प्रत्यक्ष मतदारांमध्ये जाऊन ईव्हीएम व व्हीव्हीपॅटचा प्रचार करतील. सोबतच मतदारांकडून प्रत्यक्ष चाचणी मतदान (मॉक पोल) करून घेतील. याकरिता १५ वाहने तयार करण्यात आली आहेत. त्यामध्ये एकूण ३४ ईव्हीएम व व्हीव्हीपॅट यंत्रे राहतील, असे जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी स्पष्ट केले.सदर अभियान सर्व विधानसभा मतदारसंघांतील गावांमध्ये मतदार केंद्रे तसेच आठवडी बाजार, शहरातील मुख्य चौक, ग्रामपंचायत कार्यालय आदी मोक्याच्या ठिकाणी राबविले जाणार असल्याचे निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी शरद पाटील यांनी सांगितले. यावेळी नायब तहसीलदार नीता लबडे उपस्थित होत्या.-तरच पुन्हा मतमोजणीआपण कोणाला मतदान केले, हे चिठ्ठीद्वारे दिसेल. ती चिठ्ठी त्याच सीलबंद पेटीत पडेल. दरम्यान, कमी मतफरकाने उमेदवार विजयी होत असताना, प्रतिस्पर्धी उमेदवाराने पुन्हा मतमोजणीची लेखी स्वरूपात मागणी केली, तरच निवडणूक निर्णय अधिकारी त्याबाबत निर्णय घेईल, अशी माहिती जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांनी पत्रपरिषदेत दिली.