शहरं
Join us  
Trending Stories
1
संतापजनक...! IAS अधिकाऱ्याची गाडी तपासली; गोव्याच्या एसपींनी पोलिसांनाच दिली उठाबशांची शिक्षा...
2
१९ तारखेला अत्यंत स्फोटक माहिती उघड होणार, ज्यानं भाजपा नेत्यांची फजिती होईल; संजय राऊतांचा दावा
3
महायुतीत एकनाथ शिंदेंची कोंडी; मुंबईत भाजपानं शिंदेसेनेला केवळ ५२ जागांचा दिला प्रस्ताव?
4
टीम इंडियाला मल्टीप्लेक्समध्ये पाहून सगळचे चकीत झाले...; मैदानातील सगळेच धुरंधर 'धुरंधर' पहायला गेलेले...
5
Crime: बुरखा न घातल्यानं पती संतापला, पत्नीसह पोटच्या २ मुलींना संपवलं; मृतदेह पुरले खड्ड्यात!
6
कोण आहे डोनाल्ड ट्रम्प यांची होणारी सून...! मंगळवारीच उरकला साखरपुडा, दोघे भारतातही येऊन गेलेले...
7
उद्धव-राज विरुद्ध भाजप-शिंदेसेना असाच सामना; १३८ मराठी बहुल मतदारसंघ या निवडणुकीत ठरणार निर्णायक
8
सरकार आणखी एका बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत; खात्यात येणार २१०० कोटी, सध्या आहे ९५% हिस्सा
9
'उद्याच्या तेजस्वी पहाटेसाठी!' रितेश देशमुखचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेतील पहिला लूक समोर
10
"महापालिका निवडणूक लुटण्याचे वाटे केले गेले"; अंजली दमानियांचा निशाणा, महायुतीवर भडकल्या
11
प्रसिद्ध दिग्दर्शक आणि पत्नीच्या हत्या प्रकरणाला नवं वळण, पोलिसांनी लेकालाच केली अटक
12
निवडणुका जाहीर होताच तापले युती अन् आघाडीचे राजकारण; महाराष्ट्रात काही ठिकाणी गणित बिघडणार
13
अमेरिकन शेअर बाजारात मोठा बदल! नॅस्डॅक २४ तास ट्रेडिंग सुरू करण्याच्या तयारीत; भारतीय गुंतवणूकदारांवर काय होणार परिणाम?
14
अमेरिकेत पॅलेस्टिनसह इतर ७ देशांतील नागरिकांना प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
15
Stock Market Today: सुस्त सुरुवातीनंतर सेन्सेक्स-निफ्टीमध्ये किंचित वाढ; ICICI Bank, Nestle, HDFC Bank मध्ये घसरण
16
महालक्ष्मी व्रत उद्यापन: ४ गुरुवार नेटाने केलेल्या महालक्ष्मी व्रताचे १८ डिसेंबर रोजी उद्यापन कसे करावे? वाचा विधी
17
'१२ लाख सैनिकांची गरज काय? त्यांना दुसरे काम लावा'; पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्टच सांगितलं
18
आई मंदिराबाहेर फुले विकायची...! आयपीएलने मुलाला बनविले 'करोडपती', वडील मैदानावर...
19
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
20
अंबरनाथमध्ये भाजपाचे उमेदवार पवन वाळेकर यांच्या कार्यालयावर गोळीबार; घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Daily Top 2Weekly Top 5

वरूड तालुक्यातील मृताचा आकडा सांगणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, ...

वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागपूर, अमरावती किंवा इतर जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासन माहितीच देत नसल्याने तो आकडा आम्हाला सांगता येणार नाही, असा तालुका आरोग्य प्रशासनाचा दावा आहे.

तालुक्यात दिवसागणिक ७० ते ८० रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. जिल्हास्तरावर बेड मिळत नाही, तर गरिबांना घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने वरूडमध्ये ५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करणे सुरू झाले असून, यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वरूड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांच्या वर गेला असून, दिवसागणिक ३०० ते ३५० आरटी-पीसीआर कोरोना चाचण्या केल्या जातात तसेच शेकडो अँटिजेन चाचण्या होत आहेत. यामध्ये ७० ते ८० पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेचा विषय आहे. तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत असून, खासगी कोरोना रुग्णालयात दाखल झाल्यास हजारो रुपयांचा खर्च आणि औषधी घ्यावी लागते. ती सर्वसामान्यांची ऐपत राहिली नाही. यामुळे वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय तयार केल्यास एकाच ठिकाणी सुविधा मिळू शकते, असे बोलले जात आहे. ग्रामीण रुग्णालयानेसुद्धा समर्थता दर्शविली असल्याचे सांगण्यात येते.

बॉक्स

पाठीराख्यांची ससेेहोलपट

वरूड हा सीमावर्ती भागातील तालुका असून, येथून अमरावती, नागपूर ९० ते १०० किमी अंतरावर असल्याने रुग्णांना नेण्याकरिता एक ते दीड तास लागतो. यातच कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे भाडे झेपत नसल्याने साध्या ॲम्ब्युलन्सने न्यावे लागते आणि तेथे गेल्यावर बेडसुद्धा उपलब्ध होत नाही. रुग्णांसह नातेवाइकांचीही ससेहोलपट सुरू असते. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात असल्याने नातेवाईकसुद्धा पाठ फिरवित आहेत. वरूड तालुक्यातील मृतांची संख्या वाढत असली तरी त्याच्या नोंदी स्थानिक प्रशासनाला येत नसल्याने नेमका कोणाचा कशाने मृत्यू झाला, त्याच्या परिवारातील लोकांची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत दाखल घेऊन स्थानिक प्रशासनाला नोंदी कळवाव्या, अशी मागणी जोर धरत आहे.