शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

वरूड तालुक्यातील मृताचा आकडा सांगणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, ...

वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागपूर, अमरावती किंवा इतर जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासन माहितीच देत नसल्याने तो आकडा आम्हाला सांगता येणार नाही, असा तालुका आरोग्य प्रशासनाचा दावा आहे.

तालुक्यात दिवसागणिक ७० ते ८० रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. जिल्हास्तरावर बेड मिळत नाही, तर गरिबांना घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने वरूडमध्ये ५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करणे सुरू झाले असून, यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वरूड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांच्या वर गेला असून, दिवसागणिक ३०० ते ३५० आरटी-पीसीआर कोरोना चाचण्या केल्या जातात तसेच शेकडो अँटिजेन चाचण्या होत आहेत. यामध्ये ७० ते ८० पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेचा विषय आहे. तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत असून, खासगी कोरोना रुग्णालयात दाखल झाल्यास हजारो रुपयांचा खर्च आणि औषधी घ्यावी लागते. ती सर्वसामान्यांची ऐपत राहिली नाही. यामुळे वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय तयार केल्यास एकाच ठिकाणी सुविधा मिळू शकते, असे बोलले जात आहे. ग्रामीण रुग्णालयानेसुद्धा समर्थता दर्शविली असल्याचे सांगण्यात येते.

बॉक्स

पाठीराख्यांची ससेेहोलपट

वरूड हा सीमावर्ती भागातील तालुका असून, येथून अमरावती, नागपूर ९० ते १०० किमी अंतरावर असल्याने रुग्णांना नेण्याकरिता एक ते दीड तास लागतो. यातच कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे भाडे झेपत नसल्याने साध्या ॲम्ब्युलन्सने न्यावे लागते आणि तेथे गेल्यावर बेडसुद्धा उपलब्ध होत नाही. रुग्णांसह नातेवाइकांचीही ससेहोलपट सुरू असते. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात असल्याने नातेवाईकसुद्धा पाठ फिरवित आहेत. वरूड तालुक्यातील मृतांची संख्या वाढत असली तरी त्याच्या नोंदी स्थानिक प्रशासनाला येत नसल्याने नेमका कोणाचा कशाने मृत्यू झाला, त्याच्या परिवारातील लोकांची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत दाखल घेऊन स्थानिक प्रशासनाला नोंदी कळवाव्या, अशी मागणी जोर धरत आहे.