शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
4
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
5
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
6
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टूक बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
7
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
8
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
9
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
10
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
11
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
12
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
13
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
14
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
15
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
16
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!
17
Viral Video: हत्तीला पाहून सिंह मंडळींची 'हवा टाइट'... झाडाखाली बसले असताना काय घडलं, पाहा
18
थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
19
Powai Hostage: रोहित आर्या प्रकरणातील नवी माहिती, मुलांसोबत ऑडिशनसाठी गेलेले पालक म्हणाले...
20
Abhishek Sharma Record Breaking Fifty : जिथं सगळ्यांनी नांगी टाकली, तिथं अभिषेक शर्माची विक्रमी खेळी

वरूड तालुक्यातील मृताचा आकडा सांगणार तरी कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:13 IST

वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, ...

वरूड : तालुक्यात कोरोनामुळे आजपर्यंत शेकडो लोकांचा मृत्यू झाला. परंतु, स्थानिक प्रशासनाजवळ ती आकडेवारीच नसल्याने मृतांचा नेमका आकडा किती, हा प्रश्न अनुत्तरित आहे. नागपूर, अमरावती किंवा इतर जिल्हा प्रशासन किंवा रुग्णालय प्रशासन माहितीच देत नसल्याने तो आकडा आम्हाला सांगता येणार नाही, असा तालुका आरोग्य प्रशासनाचा दावा आहे.

तालुक्यात दिवसागणिक ७० ते ८० रुग्ण कोरोनाग्रस्त होत आहेत. जिल्हास्तरावर बेड मिळत नाही, तर गरिबांना घरीच मृत्यूला कवटाळण्याची वेळ आली आहे. त्याअनुषंगाने वरूडमध्ये ५० खाटांचे कोविड रुग्णालय तयार करणे सुरू झाले असून, यामुळे रुग्णांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

वरूड तालुक्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दीड हजारांच्या वर गेला असून, दिवसागणिक ३०० ते ३५० आरटी-पीसीआर कोरोना चाचण्या केल्या जातात तसेच शेकडो अँटिजेन चाचण्या होत आहेत. यामध्ये ७० ते ८० पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेचा विषय आहे. तालुक्यासाठी ही धोक्याची घंटा असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. लॉकडाऊनच्या काळात गोरगरिबांना दोन वेळच्या जेवणाची चिंता भेडसावत असून, खासगी कोरोना रुग्णालयात दाखल झाल्यास हजारो रुपयांचा खर्च आणि औषधी घ्यावी लागते. ती सर्वसामान्यांची ऐपत राहिली नाही. यामुळे वरूडच्या ग्रामीण रुग्णालयात कोविड रुग्णालय तयार केल्यास एकाच ठिकाणी सुविधा मिळू शकते, असे बोलले जात आहे. ग्रामीण रुग्णालयानेसुद्धा समर्थता दर्शविली असल्याचे सांगण्यात येते.

बॉक्स

पाठीराख्यांची ससेेहोलपट

वरूड हा सीमावर्ती भागातील तालुका असून, येथून अमरावती, नागपूर ९० ते १०० किमी अंतरावर असल्याने रुग्णांना नेण्याकरिता एक ते दीड तास लागतो. यातच कार्डियाक ॲम्ब्युलन्सचे भाडे झेपत नसल्याने साध्या ॲम्ब्युलन्सने न्यावे लागते आणि तेथे गेल्यावर बेडसुद्धा उपलब्ध होत नाही. रुग्णांसह नातेवाइकांचीही ससेहोलपट सुरू असते. कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात असल्याने नातेवाईकसुद्धा पाठ फिरवित आहेत. वरूड तालुक्यातील मृतांची संख्या वाढत असली तरी त्याच्या नोंदी स्थानिक प्रशासनाला येत नसल्याने नेमका कोणाचा कशाने मृत्यू झाला, त्याच्या परिवारातील लोकांची काळजी कशी घ्यायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने याबाबत दाखल घेऊन स्थानिक प्रशासनाला नोंदी कळवाव्या, अशी मागणी जोर धरत आहे.