शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

रेतीचोरी थांबविणार कोण ?

By admin | Updated: October 10, 2015 00:34 IST

प्रशासन रेतीची चोरी थांबवू शकत नसेल तर, अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झालेले शेतीचे रस्ते तरी या तस्करांच्या माध्यमातून प्रशासनाने दुरुस्त करून घ्यावेत,...

मोर्शीत माफिया सक्रिय : तस्करी रोखता येत नसेल तर खोदलेले रस्ते तरी दुरूस्त करा मोर्शी : प्रशासन रेतीची चोरी थांबवू शकत नसेल तर, अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झालेले शेतीचे रस्ते तरी या तस्करांच्या माध्यमातून प्रशासनाने दुरुस्त करून घ्यावेत, अशी आगळी वेगळी मागणी शेतकऱ्यांव्दारे केली जात आहे. तालुक्यातील कोपरा, तरोडा, धानोरा आणि सावरखेडा या क्षेत्रातून नळा नदी वाहते. संबंधित क्षेत्र हे वन विभागात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या क्षेत्राचा लिलाव महसूल विभागातर्फे केला जात नाही. या संधीचा फायदा घेत तस्करी करणारे या वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून महसूल क्षेत्रातून वाहतूक करतात. सतत अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्यामुळे, शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते खराब झाले आहे. टॅ्रक्टरच्या चाकांमुळे या रस्त्यांवर खोल चाकोऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची औजारे, बैलबंडी या मार्गावरून नेणे कठीण झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)संबंधित विभागाची डोळेझाक नळा नदीपात्रात रेतीचे उत्खनन करून दिवसा ढवळ्या चाळणीव्दारे रेती छानून ठेवली जाते आणि रात्रीला रेतीची टॅ्र्रक्टरव्दारे वाहतूक केली जाते. नदी पात्राचे काठसुध्दा खोदले जात असल्याचे दिसून आले आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. वास्तविक पाहता वन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून संबंधित टॅ्र्रक्टर जप्त केल्यावर निकाल लागेपर्यंत टॅ्र्रक्टरची सुटका होण्याची शक्यता नसते. तथापि या कायद्याची भीतीही तस्करांना नाही. दुसरीकडे वन क्षेत्रातून रेतीचे उत्खनन करुन मोर्शी, पाळा आणि अंबाडा मार्गाने रेतीची वाहतूक महसूल विभागातून होत असताना, महसूल विभागातर्फेही अटकाव केली जात नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. काही रेती माफियांना राजाश्रय रेती तस्करीत गुंतलेल्यांना राजाश्रय प्राप्त असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या पाठीशी राजाश्रय आहे, अशा रेती तस्करीत गुंतलेल्यांवर कारवाई होत नाही. मात्र ज्यांच्या पाठीशी राजाश्रय नाही, अशांवर कारवाई केली जात असल्याचीही ओरड आहे. ही चर्चा जर खरी असेल तर त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेती तस्करांकडून रस्ते दुरुस्त करून घ्यावेत प्रशासन जर रेती तस्करांवर अंकुश लावू शकत नसेल तर कमीत कमी अवैध रेती वाहतुकीमुळे शेतकऱ्यांचे खराब झालेले रस्ते तरी या रेती तस्करांकडून दुरुस्त करवून घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.