शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

रेतीचोरी थांबविणार कोण ?

By admin | Updated: October 10, 2015 00:34 IST

प्रशासन रेतीची चोरी थांबवू शकत नसेल तर, अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झालेले शेतीचे रस्ते तरी या तस्करांच्या माध्यमातून प्रशासनाने दुरुस्त करून घ्यावेत,...

मोर्शीत माफिया सक्रिय : तस्करी रोखता येत नसेल तर खोदलेले रस्ते तरी दुरूस्त करा मोर्शी : प्रशासन रेतीची चोरी थांबवू शकत नसेल तर, अवैध रेती वाहतुकीमुळे खराब झालेले शेतीचे रस्ते तरी या तस्करांच्या माध्यमातून प्रशासनाने दुरुस्त करून घ्यावेत, अशी आगळी वेगळी मागणी शेतकऱ्यांव्दारे केली जात आहे. तालुक्यातील कोपरा, तरोडा, धानोरा आणि सावरखेडा या क्षेत्रातून नळा नदी वाहते. संबंधित क्षेत्र हे वन विभागात येत असल्याचे बोलले जात आहे. मात्र या क्षेत्राचा लिलाव महसूल विभागातर्फे केला जात नाही. या संधीचा फायदा घेत तस्करी करणारे या वन विभागाच्या अखत्यारित असलेल्या क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात रेतीचे उत्खनन करून महसूल क्षेत्रातून वाहतूक करतात. सतत अवैधरीत्या रेतीची वाहतूक होत असल्यामुळे, शेतकऱ्यांचे पाणंद रस्ते खराब झाले आहे. टॅ्रक्टरच्या चाकांमुळे या रस्त्यांवर खोल चाकोऱ्या पडलेल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीची औजारे, बैलबंडी या मार्गावरून नेणे कठीण झालेले आहे. (तालुका प्रतिनिधी)संबंधित विभागाची डोळेझाक नळा नदीपात्रात रेतीचे उत्खनन करून दिवसा ढवळ्या चाळणीव्दारे रेती छानून ठेवली जाते आणि रात्रीला रेतीची टॅ्र्रक्टरव्दारे वाहतूक केली जाते. नदी पात्राचे काठसुध्दा खोदले जात असल्याचे दिसून आले आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होताना दिसत आहे. वास्तविक पाहता वन कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून संबंधित टॅ्र्रक्टर जप्त केल्यावर निकाल लागेपर्यंत टॅ्र्रक्टरची सुटका होण्याची शक्यता नसते. तथापि या कायद्याची भीतीही तस्करांना नाही. दुसरीकडे वन क्षेत्रातून रेतीचे उत्खनन करुन मोर्शी, पाळा आणि अंबाडा मार्गाने रेतीची वाहतूक महसूल विभागातून होत असताना, महसूल विभागातर्फेही अटकाव केली जात नाही, याविषयी आश्चर्य व्यक्त होत आहे. काही रेती माफियांना राजाश्रय रेती तस्करीत गुंतलेल्यांना राजाश्रय प्राप्त असल्याची चर्चा आहे. ज्यांच्या पाठीशी राजाश्रय आहे, अशा रेती तस्करीत गुंतलेल्यांवर कारवाई होत नाही. मात्र ज्यांच्या पाठीशी राजाश्रय नाही, अशांवर कारवाई केली जात असल्याचीही ओरड आहे. ही चर्चा जर खरी असेल तर त्यातून वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.रेती तस्करांकडून रस्ते दुरुस्त करून घ्यावेत प्रशासन जर रेती तस्करांवर अंकुश लावू शकत नसेल तर कमीत कमी अवैध रेती वाहतुकीमुळे शेतकऱ्यांचे खराब झालेले रस्ते तरी या रेती तस्करांकडून दुरुस्त करवून घ्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.