शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
3
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
4
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
5
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
6
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
7
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
8
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
9
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
10
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
11
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
12
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
13
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
14
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
15
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
16
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
17
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
18
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
19
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
20
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
Daily Top 2Weekly Top 5

टॉवर उभारणाऱ्या ‘इंडस’च्या मुसक्या कोण आवळणार?

By admin | Updated: December 1, 2015 01:48 IST

राज्य शासनाने मोबाईल टॉवर उभारणीबाबत धोरण निश्चित केले आहे. मात्र महानगरात इंडस् इन्फ्रास्ट्रक्चर ही

तीन अनधिकृत टॉवर हटविले : अगोदर काम, नंतर परवानगीचा प्रकारअमरावती : राज्य शासनाने मोबाईल टॉवर उभारणीबाबत धोरण निश्चित केले आहे. मात्र महानगरात इंडस् इन्फ्रास्ट्रक्चर ही मोबाईल टॉवर उभारणारी कंपनी परस्पर टॉवर उभारून त्यानंतर परवानगीसाठी अर्ज सादर करते, ही बाब नियमबाह्य असताना प्रशासनाक डून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे ‘इंडस्’च्या मुसक्या कोण आवळणार, असा सवाल महापालिका सदस्य करू लागले आहे. आतापर्यंत ‘इंडस्’चे अनधिकृत तीन मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.शहरात मोबाईल टॉवरचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. ४ जी सेवेसाठी रिलायन्स कंपनीच्या मोबाईल टॉवरची यात भर पडणार आहे. हे टॉवर रस्त्याच्या दुर्तफा आणि आयलँन्डमध्ये उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात रिलायन्सचे आठ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. मात्र टॉवर उभारणीबाबत मतभिन्नता असून महापौर चरणजितकौर नंदा यांनीच आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन मोबाईल टॉवर उभारणीच्या बाजूने आहेत. मोबाईल टॉवर उभारणीतून प्रशासनाला उत्पन्न तर शहरवासियांना ४ जी सेवा मिळणार आहे. असे असले तरी शहरात अनधिकृतरित्या ‘इंडस्’ कंपनीतर्फे उभारले जाणारे मोबाईल टॉवर कसे उभे राहतात, असा सवाल आहे. ‘इंडस्’चे मोबाईल टॉवर हे तीन कंपन्या मिळून उभारले जातात. त्यानंतर ही कंपनी मोबाईल कंपन्यांना भागीदारीत देत असल्याची माहिती आहे. महापालिकेतून काही नोटीस अथवा नागरिकांनी आक्षेप घेतला तर कंपनी ही न्यायालयात जावून ‘तारीख पे तारीख’ ही भूमिका घेत प्रशासनाला न्यायालयात येरझारा मारावयास लावते. ‘इंडस्’ कंपनीला महापालिकेतून बळ कोण देते, हा संशोधनाचा विषय आहे. आतापर्यंत बडनेरा नविवस्ती, अमरावती येथील पॅराडाईज कॉलनी व फ्रेजरपुऱ्यातून हटविलेल्या मोबाईल टॉवरचा समावेश आहे. मात्र टॉवर कंपन्याकडून धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. मोबाईल टॉवर उभारणीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही तर या कंपन्या महापालिकांना मोजणार नाही.सोमवारी फ्रेजरपुऱ्यात हटविले टॉवरफ्रेजरपुरा येथे अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार सोमवारी करण्यात आली. अडीच तास चाललेल्या या कारवाईत नागरिकांनी गर्दी केली होती. ही कारवाई उपअभियंता दीपक खङेकार, घनशाम वाघाडे, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, पोलीस निरीक्षक रामभाऊ खराटे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.नगरसेवक विरुद्ध नागरिक असा संघर्षअनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीवरुन बऱ्याच भागात नगरसेवक विरुद्ध नागरिक असा संघर्ष उभा ठाकल्याचे उदाहरण घडले आहे. रविवारी ‘इंडस’चे मोबाईल टॉवर हटविताना नगरसेविका लुबना तनवीर यांच्या घरावर काही तक्रारकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र हे टॉवर कंपनीने परस्पर उभारले होते. यात नगरसेविकेचा काहीही संबंध नसताना नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर वाद होऊन हे प्रकरण पोलिसात पोहोचले.महानगरात १५३ अनधिकृत मोबाईल टॉवरअमरावती व बडनेरा हे दोन शहर मिळून महानगरात १५३ मोबाईल टॉवरला परवानगी नसल्याची माहिती आहे. महानगरात एकूण १८१ मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून त्यापैकी २८ मोबाईल टॉवरला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. काही मोबाईल कंपन्याना नवीन शासन नियमावलीनुसार परवनागी देण्याचे प्रस्तावित असल्याचे उपअभियंता घनशाम वाघाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.