शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

टॉवर उभारणाऱ्या ‘इंडस’च्या मुसक्या कोण आवळणार?

By admin | Updated: December 1, 2015 01:48 IST

राज्य शासनाने मोबाईल टॉवर उभारणीबाबत धोरण निश्चित केले आहे. मात्र महानगरात इंडस् इन्फ्रास्ट्रक्चर ही

तीन अनधिकृत टॉवर हटविले : अगोदर काम, नंतर परवानगीचा प्रकारअमरावती : राज्य शासनाने मोबाईल टॉवर उभारणीबाबत धोरण निश्चित केले आहे. मात्र महानगरात इंडस् इन्फ्रास्ट्रक्चर ही मोबाईल टॉवर उभारणारी कंपनी परस्पर टॉवर उभारून त्यानंतर परवानगीसाठी अर्ज सादर करते, ही बाब नियमबाह्य असताना प्रशासनाक डून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे ‘इंडस्’च्या मुसक्या कोण आवळणार, असा सवाल महापालिका सदस्य करू लागले आहे. आतापर्यंत ‘इंडस्’चे अनधिकृत तीन मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई करण्यात आली आहे.शहरात मोबाईल टॉवरचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहे. ४ जी सेवेसाठी रिलायन्स कंपनीच्या मोबाईल टॉवरची यात भर पडणार आहे. हे टॉवर रस्त्याच्या दुर्तफा आणि आयलँन्डमध्ये उभारले जात आहे. पहिल्या टप्प्यात रिलायन्सचे आठ मोबाईल टॉवर उभारण्यात आले आहे. मात्र टॉवर उभारणीबाबत मतभिन्नता असून महापौर चरणजितकौर नंदा यांनीच आक्षेप घेतला आहे. दुसरीकडे महापालिका प्रशासन मोबाईल टॉवर उभारणीच्या बाजूने आहेत. मोबाईल टॉवर उभारणीतून प्रशासनाला उत्पन्न तर शहरवासियांना ४ जी सेवा मिळणार आहे. असे असले तरी शहरात अनधिकृतरित्या ‘इंडस्’ कंपनीतर्फे उभारले जाणारे मोबाईल टॉवर कसे उभे राहतात, असा सवाल आहे. ‘इंडस्’चे मोबाईल टॉवर हे तीन कंपन्या मिळून उभारले जातात. त्यानंतर ही कंपनी मोबाईल कंपन्यांना भागीदारीत देत असल्याची माहिती आहे. महापालिकेतून काही नोटीस अथवा नागरिकांनी आक्षेप घेतला तर कंपनी ही न्यायालयात जावून ‘तारीख पे तारीख’ ही भूमिका घेत प्रशासनाला न्यायालयात येरझारा मारावयास लावते. ‘इंडस्’ कंपनीला महापालिकेतून बळ कोण देते, हा संशोधनाचा विषय आहे. आतापर्यंत बडनेरा नविवस्ती, अमरावती येथील पॅराडाईज कॉलनी व फ्रेजरपुऱ्यातून हटविलेल्या मोबाईल टॉवरचा समावेश आहे. मात्र टॉवर कंपन्याकडून धोरणाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. मोबाईल टॉवर उभारणीबाबत प्रशासनाने कठोर भूमिका घेतली नाही तर या कंपन्या महापालिकांना मोजणार नाही.सोमवारी फ्रेजरपुऱ्यात हटविले टॉवरफ्रेजरपुरा येथे अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले इंडस कंपनीचे मोबाईल टॉवर हटविण्याची कारवाई आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांच्या आदेशानुसार सोमवारी करण्यात आली. अडीच तास चाललेल्या या कारवाईत नागरिकांनी गर्दी केली होती. ही कारवाई उपअभियंता दीपक खङेकार, घनशाम वाघाडे, अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश कुत्तरमारे, पोलीस निरीक्षक रामभाऊ खराटे यांच्या मार्गदर्शनात पार पडली.नगरसेवक विरुद्ध नागरिक असा संघर्षअनधिकृत मोबाईल टॉवर उभारणीवरुन बऱ्याच भागात नगरसेवक विरुद्ध नागरिक असा संघर्ष उभा ठाकल्याचे उदाहरण घडले आहे. रविवारी ‘इंडस’चे मोबाईल टॉवर हटविताना नगरसेविका लुबना तनवीर यांच्या घरावर काही तक्रारकर्त्यांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मात्र हे टॉवर कंपनीने परस्पर उभारले होते. यात नगरसेविकेचा काहीही संबंध नसताना नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण झाला. त्यानंतर वाद होऊन हे प्रकरण पोलिसात पोहोचले.महानगरात १५३ अनधिकृत मोबाईल टॉवरअमरावती व बडनेरा हे दोन शहर मिळून महानगरात १५३ मोबाईल टॉवरला परवानगी नसल्याची माहिती आहे. महानगरात एकूण १८१ मोबाईल टॉवर उभारण्यात आले असून त्यापैकी २८ मोबाईल टॉवरला मान्यता प्रदान करण्यात आली आहे. यात काही प्रकरणे न्यायप्रविष्ठ आहेत. काही मोबाईल कंपन्याना नवीन शासन नियमावलीनुसार परवनागी देण्याचे प्रस्तावित असल्याचे उपअभियंता घनशाम वाघाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.