शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

वणवा कुणावर शेकणार ?

By admin | Updated: March 11, 2017 00:15 IST

जंगलात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे भडकत असल्याचे मानले जात असल्याने वन विभागाने कंबर कसली असून...

मानवी हस्तक्षेपाचा अंदाज : संशयितांचा शोध घेण्याचे वनविभागाचे आदेशअमोल कोहळे पोहराबंदीजंगलात पेटणारा वणवा हा मानवी हस्तक्षेपामुळे भडकत असल्याचे मानले जात असल्याने वन विभागाने कंबर कसली असून येणाऱ्या काळात वणव्यापासून जंगलांचे रक्षण करण्याकरिता वनविभागाने पावले उचलली आहेत. विशेष म्हणजे आगीसाठी कारणीभूत असलेल्या संशयितांना ताब्यात घेण्याचे आदेश वनविभागाने वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले आहेत. वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गत पोहरा परिसरात वणवा पेटल्याची घटना नुकतीच उघडकीस आली होती. मागील काही दिवसांत दोन वेळा अशा घटना घडल्यामुळे वनप्रशासनाने यावर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने काम करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी वणवा पेटला आहे त्या ठिकाणी तत्काळ पोहोचण्यासाठी कर्मचाऱ्यांनी तयारी केली आहे. वडाळी बीट मध्ये मागील चार दिवसांत मध्यरात्रीच्या सुमारास वणव्याची घटना समोर आली होती. यावर वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी लगेच पोहचून आगीवर नियंत्रण मिळविले होते. वडाळी वनपरिक्षेत्राचे अधिकारी हरिचंद्र पाडगाव्हकर, चांदूर रेल्वेचे वनपरिक्षेत्र अधिकारी अनंत गावंडे, यांनी दोन्ही रेंजमधील वनकर्मचाऱ्यांना आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. पोहरा बीटमधील वणव्याला वनपाल विनोद कोहळे, चिरोडी वनपाल सदानंद पाचगे, इंदला बीटचे वनरक्षक शेंडे, चिरोडीचे वनरक्षक नाईक, बगळे, पवार, वनमजूर शालिक पवार, मंगल जाधव, विसू पठाण, बाबा पळसकर, चव्हाण यांनी नियंत्रणात आणले होते. यामुळे दोन्ही बीटमध्ये असलेला संवाद चांगला असल्याचे दिसून आले आहे. यासाठी वनविभागाने अग्नीशामन दल व पोलीस विभागाची मदत घेतली आहे.वन्यजीवांची हानी नाहीपोहरा बीटमध्ये पेटलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न यशस्वी झाले असतानाच प्राण्यांची जीवितहानी तर झाली नाही ना, याचादेखील आढावा घेण्यात आला आहे. यात प्राण्याची हानी झालेली नाही, असे आढळून आल्याने वनविभागाने सुटकेचा श्वास घेतला आहे.