शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

आग लागली तर विझवायची कुणी ?

By admin | Updated: February 17, 2015 00:54 IST

महानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे

गणेश वासनिक ल्ल अमरावतीमहानगरातील साडेआठ लाख लोकसंख्येच्या आपातकालीन, संकटाची जबाबदारी सांभाळणाऱ्या महापालिका अग्निशमन (फायर) विभागात मणुष्यबळाची वानवा आहे. यंत्रे आहेत पण संचालक नाहीत, अशी स्थिती असल्याने आग लागली तर विझवायची कुणी, असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. अग्निशमन दलात ७५ टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असून तोंडावरच असलेल्या उन्हाळ्यात ही समस्या जिवघेणीही ठरु शकेल. हल्ली ११ वाहने हाताळण्यासाठी साधारणत: १२६ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची गरज असली तरी उपलब्ध मनुष्यबळ केवळ ३७ आहे.अतिशय महत्त्वाची सेवा म्हणून अग्निशमन विभागाचा समावेश करण्यात आला आहे. या विभागात साहित्य सामग्री, वाहने, यंत्रे खरदी करण्यासाठी शासन विशेष अनुदान सुद्धा देते. मात्र, मागील काही वर्षांपासून कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने संकटकालीन परिस्थिती हाताळताना ‘फायर’ विभागाची दमझाक होते. महापालिका प्रशासनाचा आस्थापना खर्च ५६ टक्क्याच्या वर पोहचला आहे. नवीन भरतीला परवानगी देत नाही. परंतु या विभागाचा कारभार मणुष्याबळ अभावी कसा चालवावा? हा प्रश्न निर्माण झाला आहे. येत्या काही दिवसांत सूर्य आग ओकू लागणार असून महानगर किंवा लगतच्या गावांमध्ये आग लागण्याचा घटना लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करताना मणुष्यबळाची कमतरता ही मुख्य समस्या ‘फायर’ मध्ये निर्माण झाली आहे. अति महत्त्वपूर्ण सेवेचा दर्जा असलेल्या अग्निशमन विभागात विशेष बाब म्हणून चालक, फायरमनही भरती प्रक्रिया राबवावी, असा प्रस्ताव फायर विभाग प्रमुख भारतसिंह चव्हाण यांनी महापालिका सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविला आहे.