शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

हल्ले, हाणामारींना जबाबदार कोण?

By admin | Updated: September 5, 2015 00:17 IST

अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे.

एकोप्यास गालबोट : सांस्कृतिक वारसा धुळीसअमरावती / अचलपूर : अचलपूर हे पौराणिक शहर आहे. या भूमीला भगवान श्रीकृष्णाचा पदस्पर्श झाल्याची आख्यायिका आहे. चक्रधर स्वामींचे येथे काही काळ वास्तव्य असल्याच्या खाणाखूणा आहे. येथे महान योध्दांचा संग्राम झाल्याचीही नोंद इतिहासात आहे. अशा एकोपा दिसणाऱ्या या शहरात १० ते १२ वर्षांपासून संपूर्ण तालुका हादरवणारी एखादी घटना घडते. त्यामुळे सामाजिक एकतेस गालबोट लागते.रेती तस्कर असलेल्या बारुद गँगने मागील महीन्यात ११ आॅगस्ट रोेजी अमित बटाउवाले (वय २१) याची भर दिवसा हत्या करुन त्याचे वडील मोहन बटाउवाले ह्यांना गंभीर जखमी केले. ही घटना तालुक्यात दहशत निर्माण करण्यासाठी घडविण्यात आली. या पूर्वनियोजीत कट होता असे लोक बोलत आहे. वरिष्ठ पातळीवरुन गुप्तचर विभागामार्फत चौकशी झाल्यास हे सत्य समोर येईल. जुळ्या शहरात अजूनही मटका, जुगार सुरु आहे. दोन्ही शहरे मिळून ५ सट्टाकिंग आहेत. चिरंजीवीलाल, घोयल आदींचे मटका सट्ट्यावर अधिराज्य आहे. जुगार शहरालगतच्या शेतांमध्ये खेळला जात असल्याची माहिती आहे. क्रिकेटची मॅच असो कि लोकसभा, विधानसभा निवडणुका असो येथे खुलेआम सट्टा खेळला जातो. यामध्ये काही बादशाह मानले जाणारे पोलीस रेकॉर्डवरही नाहीत. मध्य प्रदेश जवळ असल्याने गांजाची विक्री सनन गोळी ह्यांची विक्री येथे होत असते. अवैधपणे रॉकेलची विक्री होत असते. अनेक चार चाकी वाहने, तीन चाकी आॅटो रॉकेलवर धावत असतात. ट्रकमध्ये रॉकेल टाकताना पोलिसांनी पकडल्याच्या नोंदी आहेत. शहरात जवळपास प्रत्येक पानखोक्यावर, बहूताशी किराणा दुकानात गुटखा मिळतो. उघड्यावर मांस विक्री होताना दिसते पण या अवैध धंद्यावर अजुनही संबंधीत अधिकाऱ्यांचा अंकुश नाही.रेती तस्करीचे खापर मंडल अधिकाऱ्यांवर फोडले त्यांना निलंबित केले. पण ज्या तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांवर महसूल विभाग कारवाई करण्यात का कचरत आहे. त्यांचेवर कारवाई झाली नाही जनतेचा महसूल विभागावरुन विश्वास उठेल तहीसलदारांना एखाद्या तक्रारदाराने भेटल्यास ते त्याची तक्रार धड ऐकतही नव्हते -बाळासाहेब वानखडे, नगरसेवकअमच्यावर रेती तस्करांनी केलेल्या हल्ल्यास तहसीलदार व उपविभागीय अधिकारीसुध्दा जबाबदार आहेत. त्यांनी रेती तस्करी बंद केली असती तर माझ्या मुलाची हत्या झाली नसती. त्यासाठी या दोघांवरही कारवाई करावी.- मोहन बटाउवाले, शेतकरी.