शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

राणा लँड माफिया तर प्रवीण पोटे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:18 IST

राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विजय मिल कृती समिती पदाधिकाऱ्यांचा सवाल

अमरावती : राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.उद्योग राज्यमंत्री पोटे यांनी या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी राहू. मात्र, आतापर्यंत त्यांनी काहीही केलेले नाही. नांदगावच्या भारत डायनामिक्स या कारखान्याविषयीच्या बातम्या आज वाचण्यात आल्यात. विजय मिलच्या जागेत उद्योग उभा राहावा, यासाठी २००७ ते आतापर्यंत कोणी प्रयत्न केलेले नाही; आ. राणा यांनी ते सुरू करताच त्यांना विरोध केला जात असल्याचा निषेध कृती समितीने केला. २०१२ ते २०१८ या काळात सातत्याने पाठपुरावा करीत आलो. वस्त्रोद्योग महामंडळाला प्रत्यक्ष भेटलो. येथे उद्योग उभारणीसाठी निविदा काढा, अशी आम्ही मागणी केली. आता अफवा पसरवून धमकावले जात असल्याचा आरोप समितीने केला.विजय मिलच्या जागेवर गारमेंट झोन उभारणीचा आ. राणा यांचा संकल्प आहे. स्थानिक राजकारणी अन् नगरसेवकांचा विरोध आहे. गोरगरिबांची मुले या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भविष्याशी खेळू नये व या ठिकाणी राजकारण आणू नये, असे आवाहन प्राचार्य गोपाल वैराळे यांनी केले. यावेळी सिद्धार्र्थ बनसोड, अजय जयस्वाल, मनोज गजभिये, रामू कातोरे, नितीन सोळंके, विलास वाडेकर, नाना आमले आदी उपस्थित होते.उद्योग आणून दाखवा; पालकमंत्र्यांना आव्हानविजय मिलबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याचा एक तरी पुरावा दाखवा. आम्ही कामगार कसे जगत आहोत, याची जाण त्यांना आहे का? नांदगावातील उद्योगाच्या भूमिपूजनासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या वाचल्या. उर्वरित सहा महिन्यात मिलच्या जागेवर एक तरी उद्योग आणून दाखवावा, असे आव्हान कृती समितीने दिले.विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावेआजही विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावे आहे. आ. रवि राणा यांच्याकडून जमिनीच्या दुरुपयोगाचा शिवराय कुळकर्णी यांनी केलेला आरोप खोटा आहे. आ. राणांच्या चांगल्या कामाची बदनामी व फुकटात प्रसिद्धीचा डाव खेळण्याऐवजी कुळकर्णी यांनी बडनेरासाठी केलेले काम दाखवावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले.