शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राणा लँड माफिया तर प्रवीण पोटे कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2018 22:18 IST

राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देपत्रपरिषद : विजय मिल कृती समिती पदाधिकाऱ्यांचा सवाल

अमरावती : राज्याचे उद्योग राज्यमंत्री असताना पालकमंत्री प्रवीण पोटे यांनी आतापर्यंत काय प्रयत्न केले, हे त्यांनी दाखवावे; समोर यावे. रवि राणांवर जर लँडमाफियाचा आरोप करीत आहात, तर पालकमंत्री कोण आहेत, असा सवाल विजय मिलच्या कामगार कृती समितीने बुधवारी पत्रपरिषदेत केला.उद्योग राज्यमंत्री पोटे यांनी या ठिकाणी उद्योग सुरू केल्यास आम्ही सर्व जण त्यांच्या पाठीशी राहू. मात्र, आतापर्यंत त्यांनी काहीही केलेले नाही. नांदगावच्या भारत डायनामिक्स या कारखान्याविषयीच्या बातम्या आज वाचण्यात आल्यात. विजय मिलच्या जागेत उद्योग उभा राहावा, यासाठी २००७ ते आतापर्यंत कोणी प्रयत्न केलेले नाही; आ. राणा यांनी ते सुरू करताच त्यांना विरोध केला जात असल्याचा निषेध कृती समितीने केला. २०१२ ते २०१८ या काळात सातत्याने पाठपुरावा करीत आलो. वस्त्रोद्योग महामंडळाला प्रत्यक्ष भेटलो. येथे उद्योग उभारणीसाठी निविदा काढा, अशी आम्ही मागणी केली. आता अफवा पसरवून धमकावले जात असल्याचा आरोप समितीने केला.विजय मिलच्या जागेवर गारमेंट झोन उभारणीचा आ. राणा यांचा संकल्प आहे. स्थानिक राजकारणी अन् नगरसेवकांचा विरोध आहे. गोरगरिबांची मुले या ठिकाणी असलेल्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. त्यांच्या भविष्याशी खेळू नये व या ठिकाणी राजकारण आणू नये, असे आवाहन प्राचार्य गोपाल वैराळे यांनी केले. यावेळी सिद्धार्र्थ बनसोड, अजय जयस्वाल, मनोज गजभिये, रामू कातोरे, नितीन सोळंके, विलास वाडेकर, नाना आमले आदी उपस्थित होते.उद्योग आणून दाखवा; पालकमंत्र्यांना आव्हानविजय मिलबाबत पालकमंत्र्यांनी पाठपुरावा केल्याचा एक तरी पुरावा दाखवा. आम्ही कामगार कसे जगत आहोत, याची जाण त्यांना आहे का? नांदगावातील उद्योगाच्या भूमिपूजनासाठी प्रयत्न करीत असल्याच्या बातम्या वाचल्या. उर्वरित सहा महिन्यात मिलच्या जागेवर एक तरी उद्योग आणून दाखवावा, असे आव्हान कृती समितीने दिले.विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावेआजही विजय मिलचा सात-बारा शासनाच्याच नावे आहे. आ. रवि राणा यांच्याकडून जमिनीच्या दुरुपयोगाचा शिवराय कुळकर्णी यांनी केलेला आरोप खोटा आहे. आ. राणांच्या चांगल्या कामाची बदनामी व फुकटात प्रसिद्धीचा डाव खेळण्याऐवजी कुळकर्णी यांनी बडनेरासाठी केलेले काम दाखवावे, असे आव्हान यावेळी देण्यात आले.