शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी?

By admin | Updated: November 22, 2014 22:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात विस्ताराचे वेध लागले आहे. पुढील आठवड्यात विस्तार करण्याची तयारी फडणवीस यांनी चालविली असली तरी जिल्ह्यातून

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात विस्ताराचे वेध लागले आहे. पुढील आठवड्यात विस्तार करण्याची तयारी फडणवीस यांनी चालविली असली तरी जिल्ह्यातून कोणाची मंत्रीपदी वर्णी लागेल, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. हल्ली जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असून मंत्रिपदासाठी कोणाचेही नाव जोरकसपणे चर्चिले जात नसल्यामुळे कमालीचे संभ्रम निर्माण झाले आहे.सुनील देशमुख, अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर व रमेश बुंदिले असे चार आमदार भाजपचे निवडून आले आहेत. परंतु येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यात मंत्रिपद मिळेल की नाही? याबाबत कोणीही आमदार ठामपणे सांगत नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर वेगळे काहीतरी शिजत असल्याचे स्पष्ट होते. आघाडी शासनाच्या कार्यकाळात काँग्रेसचे चार आमदार असताना अंतर्गत गटबाजीमुळे एकालाही मंत्रिपद मिळविता आले नाही. मात्र भाजपच्या कार्यकाळात तरी जिल्ह्यात मंत्रीपद मिळेल, ही आशा अनेक भाजप कार्यकर्त्यांना होती. परंतु भाजपत ज्या पद्धतीने मंत्रिपदासाठी नाट्यमयरित्या घडामोडी सुरु आहेत, त्या बघता जिल्ह्यात पुन्हा मंत्रिपद नाहीच, असे संकेत मिळत आहेत. निवडून आलेल्या चारही आमदारांमध्ये एकही आमदार थेट संघ परिवाराशी जुळलेला नाही. अशातच शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चमूत जिल्ह्यातील एकही चेहरा मंत्रीपदी राहणार नाही, असे भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले. सुनील देशमुख निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिले जाईल, असे सुरुवातीला बोलल्या गेले. मात्र, त्यानंतर पाणी कुठे मुरले? हे सुनील देशमुखांच्याही लक्षात आले नाही. अचानक त्यांचे नाव भाजपच्या वरच्या स्तरावरुनच गायब करण्यात आल्याने देशमुखसुद्धा चक्रावून गेले आहेत. सुनील देशमुखांना यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा असलेला अनुभव बघता त्यांची मंत्रिमंडळात हमखास वर्णी लागेल, असे ठामपणे बोलल्या गेले. परंतु मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हे आरुढ होताच मंत्रिपदाबाबत देशमुखांच्या नावाची चर्चादेखील केली जात नाही, हे वास्तव आहे. जिल्ह्यात दोन विधानपरिषद तर चार विधानसभा सदस्य आहेत. भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. परंतु होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या सहा आमदारांपैकी एकाचही नाव वरच्या स्तरावर चर्चिल्या जाऊ नये, ही राजकीयदृष्ट्या गंभीर बाब मानली जात आहे. (प्रतिनिधी)