शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात मंत्रिपदी कोणाची वर्णी?

By admin | Updated: November 22, 2014 22:53 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात विस्ताराचे वेध लागले आहे. पुढील आठवड्यात विस्तार करण्याची तयारी फडणवीस यांनी चालविली असली तरी जिल्ह्यातून

अमरावती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या मंत्रिमंडळात विस्ताराचे वेध लागले आहे. पुढील आठवड्यात विस्तार करण्याची तयारी फडणवीस यांनी चालविली असली तरी जिल्ह्यातून कोणाची मंत्रीपदी वर्णी लागेल, हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. हल्ली जिल्ह्यात भाजपचे चार आमदार असून मंत्रिपदासाठी कोणाचेही नाव जोरकसपणे चर्चिले जात नसल्यामुळे कमालीचे संभ्रम निर्माण झाले आहे.सुनील देशमुख, अनिल बोंडे, प्रभुदास भिलावेकर व रमेश बुंदिले असे चार आमदार भाजपचे निवडून आले आहेत. परंतु येत्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात जिल्ह्यात मंत्रिपद मिळेल की नाही? याबाबत कोणीही आमदार ठामपणे सांगत नाही. त्यामुळे भाजपच्या वरिष्ठ पातळीवर वेगळे काहीतरी शिजत असल्याचे स्पष्ट होते. आघाडी शासनाच्या कार्यकाळात काँग्रेसचे चार आमदार असताना अंतर्गत गटबाजीमुळे एकालाही मंत्रिपद मिळविता आले नाही. मात्र भाजपच्या कार्यकाळात तरी जिल्ह्यात मंत्रीपद मिळेल, ही आशा अनेक भाजप कार्यकर्त्यांना होती. परंतु भाजपत ज्या पद्धतीने मंत्रिपदासाठी नाट्यमयरित्या घडामोडी सुरु आहेत, त्या बघता जिल्ह्यात पुन्हा मंत्रिपद नाहीच, असे संकेत मिळत आहेत. निवडून आलेल्या चारही आमदारांमध्ये एकही आमदार थेट संघ परिवाराशी जुळलेला नाही. अशातच शिवसेनेचा एकही आमदार निवडून आला नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या चमूत जिल्ह्यातील एकही चेहरा मंत्रीपदी राहणार नाही, असे भाजपच्या एका नेत्यांनी सांगितले. सुनील देशमुख निवडून आल्यानंतर त्यांना मंत्रिपद दिले जाईल, असे सुरुवातीला बोलल्या गेले. मात्र, त्यानंतर पाणी कुठे मुरले? हे सुनील देशमुखांच्याही लक्षात आले नाही. अचानक त्यांचे नाव भाजपच्या वरच्या स्तरावरुनच गायब करण्यात आल्याने देशमुखसुद्धा चक्रावून गेले आहेत. सुनील देशमुखांना यापूर्वी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपदाचा असलेला अनुभव बघता त्यांची मंत्रिमंडळात हमखास वर्णी लागेल, असे ठामपणे बोलल्या गेले. परंतु मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस हे आरुढ होताच मंत्रिपदाबाबत देशमुखांच्या नावाची चर्चादेखील केली जात नाही, हे वास्तव आहे. जिल्ह्यात दोन विधानपरिषद तर चार विधानसभा सदस्य आहेत. भाजपसाठी ही जमेची बाजू आहे. परंतु होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या विस्तारात भाजपच्या सहा आमदारांपैकी एकाचही नाव वरच्या स्तरावर चर्चिल्या जाऊ नये, ही राजकीयदृष्ट्या गंभीर बाब मानली जात आहे. (प्रतिनिधी)