शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

हे श्रीपाल पाल आहेत तरी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता पाल यांचे पती श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाच्या मुद्यावरून प्रशासनास वेठीस धरले

सीईओ हे काय ? : ‘महिला राज’ला ‘पतीराज’ने फासला हरताळअमरावती : जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता पाल यांचे पती श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाच्या मुद्यावरून प्रशासनास वेठीस धरले आणि आश्चर्य असे की, एका अधिकाऱ्याचे नवे वाहनही त्यांना देण्यात आले. मुद्दा असा उपस्थित होतो की हे श्रीपाल पाल आहेत तरी कोण? जिल्हा परिषदेत ३ एप्रिल रोजी विषय समितीच्या सभपतीपदाच्या निवडणुका पार पडल्यात. या निवडणुकीत काँग्रेसच्या वनिता पाल यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली. ज्या दिवशी त्यांची बहुमताने या पदावर निवड झाली, त्याच दिवसापासून त्यांना पदाधिकारी या नात्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियमानुसार शासकीय सोई सुविधा उपलब्ध करून दिल्यात. यानुसारच आतापर्यंत महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या दिमतीला असलेले शासकीय वाहन (क्रमांक एमएच २७ अ‍ेअ‍े २१) हेदेखील सेवेत रूजू केले; तथपि सभापतींचे पती श्रीपाल पाल यांची नजर प्रशासनाच्या नव्या वाहनावर होती. त्यांनी नवीन वाहनासाठी सामान्य प्रशासनाचे उपकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांच्याकडे मागणी केली. मात्र नियमानुसार जे वाहन सभापतींच्या नावाने आहे तेच मिळेल, दुसरे वाहन देता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाच्या वतीने तट्टे यांनी मांडली. महिला व बालकल्याण समिती सभापतींचा मतदारसंघ आणि गाव मेळघाटात असल्याचे कारण सांगून श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाचा अट्टाहास सोडला नाही. त्यांनी यासाठी सीईओंनाही गळ घातली. परंतु व्यर्थ! त्यानंतर श्रीपाल पाल यांनी वाहनाचा विषय प्रतिष्ठेचा केला. सभापती असलेल्या त्यांच्या पत्नीला बाजूला सारून स्वत:च प्रशासनावर दबाबतंत्राचा वापर सुरू केला. नवे वाहन हवेच, असे सांगून देणार नसाल तर पायदळ जाऊ अशी धमकीच यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिली. अखेर प्रशासन श्रीपाल पाल यांच्यासमोर तुकले. अधिकाऱ्याचे नवे वाहन देत असल्याचे श्रीपाल पाल यांना सांगण्यात आले. ‘महिला राज"ला बळकटी मिळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संसस्थांमध्ये जी ५० टक्के महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्यालाच जिल्हा परिषदेतील "पतीराज"मुळे हरताळ फासला गेला. उत्तम प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी आग्रही असलेल्या मुख्य कर्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी यांनी त्रयस्थ इसमाचा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप खपवून घेतलाच कसा, असा सवाल आता निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)