शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
3
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
4
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
5
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
6
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
7
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
8
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
9
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
10
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
11
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
12
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
13
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
14
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
15
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं
16
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
17
पैसे कुठे खर्च होतात कळत नाही? 'या' ५ ॲप्समुळे खर्च ट्रॅक करणे होईल सोपे, आता तुम्हीही व्हा बजेट एक्सपर्ट!
18
सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; ३ दिवसांत ४ हजारांनी घसरली चांदीची किंमत; पाहा लेटेस्ट रेट
19
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
20
पोरी हुश्शार! एकत्र बालपण अन् आता एकत्र झाल्या IAS; शिक्षकाच्या लेकींनी रचला इतिहास

हे श्रीपाल पाल आहेत तरी कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता पाल यांचे पती श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाच्या मुद्यावरून प्रशासनास वेठीस धरले

सीईओ हे काय ? : ‘महिला राज’ला ‘पतीराज’ने फासला हरताळअमरावती : जिल्हा परिषदेच्या सभापती वनिता पाल यांचे पती श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाच्या मुद्यावरून प्रशासनास वेठीस धरले आणि आश्चर्य असे की, एका अधिकाऱ्याचे नवे वाहनही त्यांना देण्यात आले. मुद्दा असा उपस्थित होतो की हे श्रीपाल पाल आहेत तरी कोण? जिल्हा परिषदेत ३ एप्रिल रोजी विषय समितीच्या सभपतीपदाच्या निवडणुका पार पडल्यात. या निवडणुकीत काँग्रेसच्या वनिता पाल यांची महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी वर्णी लागली. ज्या दिवशी त्यांची बहुमताने या पदावर निवड झाली, त्याच दिवसापासून त्यांना पदाधिकारी या नात्याने जिल्हा परिषद प्रशासनाकडून नियमानुसार शासकीय सोई सुविधा उपलब्ध करून दिल्यात. यानुसारच आतापर्यंत महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या दिमतीला असलेले शासकीय वाहन (क्रमांक एमएच २७ अ‍ेअ‍े २१) हेदेखील सेवेत रूजू केले; तथपि सभापतींचे पती श्रीपाल पाल यांची नजर प्रशासनाच्या नव्या वाहनावर होती. त्यांनी नवीन वाहनासाठी सामान्य प्रशासनाचे उपकार्यकारी अधिकारी प्रकाश तट्टे यांच्याकडे मागणी केली. मात्र नियमानुसार जे वाहन सभापतींच्या नावाने आहे तेच मिळेल, दुसरे वाहन देता येत नाही, अशी स्पष्ट भूमिका प्रशासनाच्या वतीने तट्टे यांनी मांडली. महिला व बालकल्याण समिती सभापतींचा मतदारसंघ आणि गाव मेळघाटात असल्याचे कारण सांगून श्रीपाल पाल यांनी नव्या वाहनाचा अट्टाहास सोडला नाही. त्यांनी यासाठी सीईओंनाही गळ घातली. परंतु व्यर्थ! त्यानंतर श्रीपाल पाल यांनी वाहनाचा विषय प्रतिष्ठेचा केला. सभापती असलेल्या त्यांच्या पत्नीला बाजूला सारून स्वत:च प्रशासनावर दबाबतंत्राचा वापर सुरू केला. नवे वाहन हवेच, असे सांगून देणार नसाल तर पायदळ जाऊ अशी धमकीच यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला दिली. अखेर प्रशासन श्रीपाल पाल यांच्यासमोर तुकले. अधिकाऱ्याचे नवे वाहन देत असल्याचे श्रीपाल पाल यांना सांगण्यात आले. ‘महिला राज"ला बळकटी मिळावी यासाठी स्थानिक स्वराज्य संसस्थांमध्ये जी ५० टक्के महिला आरक्षणाची तरतूद करण्यात आली त्यालाच जिल्हा परिषदेतील "पतीराज"मुळे हरताळ फासला गेला. उत्तम प्रशासकीय कार्यप्रणालीसाठी आग्रही असलेल्या मुख्य कर्यपालन अधिकारी किरण कुलकर्णी यांनी त्रयस्थ इसमाचा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप खपवून घेतलाच कसा, असा सवाल आता निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)