शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

पांढरे सोने @ ९००० पार; शेतकऱ्यांकडे कापूस आहे तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2022 23:54 IST

परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत.  शेतकऱ्यांची  याच पिकांवर मुख्य   मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना  परिसरात  ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते,  पिकांची वाढ खुंटली. कपाशी पिवळी पडली. कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमी आलेली आहे.

किशोर मोकलकरलोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव पूर्णा : सध्या शिवारात  कापूस वेचणीची लगबग सुरू आहे. या पांढऱ्या सोन्याला खेडा खरेदीत सध्या नऊ हजार दोनशे रुपये क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी उतारा घटल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जानेवारीपश्चात भाववाढीची शक्यता असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.         मागच्या हंगामात आतापर्यंतचा सर्वाधिक भाव मिळाला होता. त्यामुळेच  यंदा कपाशीची क्षेत्रवाढ झाली. मात्र,  अतिवृष्टीचा फटका  बसल्याने कापसाच्या उताऱ्यात ५० ते ६० टक्क्यांनी घट येत आहे. उत्पादन घटल्याने ‘कही खुशी, कही गम’ अशी उत्पादकांची अवस्था झाली आहे.       परिसरात कापूस व सोयाबीन ही कॅश क्रॉप आहेत.  शेतकऱ्यांची  याच पिकांवर मुख्य   मदार असते. पिके वाढीच्या अवस्थेत असताना  परिसरात  ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात बहुतांश ठिकाणी अतिवृष्टी झाली. याशिवाय ढगाळ वातावरण, सूर्यप्रकाशाचा अभाव, शेतात पाणी साचले होते,  पिकांची वाढ खुंटली. कपाशी पिवळी पडली. कीड व रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात कमी आलेली आहे.दिवाळीच्या पार्श्वभूमीवर  कापूस वेचणीला सुरुवात झाली, परंतु, कापसाचा उतारा एकरी दोन ते तीन क्विंटल कापूस निघाला. अनेक गावांत पावसाने नुकसान होऊन त्या गावांना शासन मदत मिळाली नाही.

उतारा घटला, आवक वाढेनाजिल्ह्याच्या काही भागात कुठे सीतादई होत आहे. बोंडअळीने बोंड खराब झाले आहे. वेचणी दहा रुपये किलोवर गेली, तरीही मजूर मिळत नाही, काही भागात दोन वेच्यात उलंगवाडी होण्याची शक्यता आहे. दरवाढ होत असतांना शेतकऱ्यांच्या घरात कापूस नाही,  खेडा खरेदीत लूट सुरुच आहे.

शेतकऱ्यांचे बजेट कोलमडले, शासन मदत मिळावीप्रमुख पिकांचे अतिवृष्टीमुळे उत्पादन घटले. बियाणे, लागवड, फवारणी, वेचणीचा खर्च बघता उत्पादन खर्चदेखील निघणार नाही. परिणामी , शेतकऱ्यांचे आर्थिक बजेट यंदा कोलमडले आहे. त्यामुळे पावसाच्या नुकसानीसाठी शासनाने मदत निधी उपलब्ध करावा व सरसकट पीक विम्याचा लाभ मिळावा, असे विरुळ पूर्णा येथील शेतकरी सुमीत बोबडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

या आठवड्यात सीतादई झाली, पावसाने कपाशीचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यात बोंडअळीनेही नुकसान केले. वेचणीही वाढली, खेडा खरेदीत दर वाढले तरीही शेतकऱ्यांकडे कापूस नाही. मोठी विवंचना ठाकली आहे.- रावसाहेब खंडारे, शेतकरी

 

 

टॅग्स :cottonकापूसagricultureशेती