शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
2
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
3
'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं?
4
झरदारींना हटवून असीम मुनीर पाकिस्तानचे राष्ट्रपती होणार? शाहबाज शरीफ स्पष्टच बोलले...
5
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
6
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
7
रिलायन्स, TCS ला कोटींचे नुकसान!! घसरणीतही 'या' २ कंपन्यांनी कमावला नफा, कसं शक्य झालं?
8
Crime: कुराण शिकवण्याच्या नावाखाली घरी नेलं आणि...; सख्ख्या मावशीच्या कृत्यानं उत्तर प्रदेश हादरलं!
9
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
10
"छत्रपती शिवाजी महाराजांची गादी माझीच...", अभिजीत बिचकुलेंच्या वक्तव्याने नवा वाद, काय म्हणाले?
11
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
12
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
13
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
14
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
15
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
16
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
17
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
18
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
19
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
20
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले

कपाशीवर पांढरी माशी घोंगावते

By admin | Updated: September 2, 2015 00:05 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असताना कपाशीवर पांढऱ्या माशीने आक्रमण केल्याने अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे

शेतकऱ्यांची चिंता वाढली : कृषी विभागाकडून उपाययोजनेची अपेक्षा सुनील देशपांडे अचलपूरनिसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी हतबल झाला असताना कपाशीवर पांढऱ्या माशीने आक्रमण केल्याने अचलपूर तालुक्यातील शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. नगदी पीक म्हणून कपाशीकडे बहिघतले जात असल्याने हजारो हेक्टरमध्ये कपाशीची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे. मागील वर्षी निसर्गाने धोका दिल्याने सोयाबीन पिकांवर संक्रांत आली आहे. त्यामुळे यावर्षी बऱ्यापैकी कपाशीचा पेरा झाला आहे. भारनियमनासोबत पाण्याचाही प्रश्न असल्याने पांढऱ्या माशीने परिस्थिती गंभीर होण्याची शक्यता आहे. सुरुवातीला पावसाने दमदार सुरूवात केली असली तरी नंतर एक महिना दडी मारली होती. त्यामुळे अचलपूर तालुक्यातील काही शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली होती. काही भागात अजूनही पिकांची वाढ पुरेशी झालेली नाही. प्रतीक्षेनंतर पावसाचे पुन्हा आगमन झाले असले तरी विहिरींच्या पाण्याची पातळी वाढली नाही. त्यात ग्रामीण भागातील भारनियमन या दोन कारणांमुळे ओलीताचे प्रमाण कमी झाले आहे. पुन्हा पावसाने दडी मारल्याने सूर्याच्या प्रकाशाने जमीन कडक झाली आहे. याकरिता शेतकरी पावसाच्या पाण्याच्या भरवशावर न राहता स्प्रिंकलरसारखे वेगवेगळ्या मार्गाने शेतातील पिकाला पाणी देत आहेत. एकीकडे शेतातील पिके जगवणे व दुसरीकडे कपाशीवर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी प्रयत्न करणे, अशी दुहेरी कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे. सध्या कपाशीला फुले व पात्या धरायला सुरूवात केली आहे. सुरुवातीला कपाशीवर रोग नव्हता. पण ऐन पीक जोमात यायला लागल्यावर पांढऱ्या माशीपासून निर्माण होणाऱ्या अळीला बळी पडावे लागणार असल्यामुळे डबघाईस आलेल्या शेतकऱ्यांत भीती निर्माण झाली आहे. अजून अळी पडली नसली तरी ती पडण्याची चिन्हे दिसत आहेत. काही बियाणे, कंपन्या कपाशीवर रोग पडणार नाही, असा प्रचार करीत असल्या तरी पांढऱ्या माशीचे जोरात आक्रमण झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक झळी सहन करावी लागणार आहे. कृषी विभागाचे सर्वेक्षण नाहीकोणत्याही पिकावर रोग येण्याची लक्षणे दिसू लागताच कृषी विभागाने सर्व्हे करून त्याची अहवाल तत्काळ सरकारकडे द्यायला हवा व त्यावर उपाययोजनाही व्हायला पाहिजे. तशा सूचना शासनाने कृषी विभागाला द्याव्यात. असे मत प्रशांत रेखाते, गुड्डू कपले, अनिल निचत, सुधीर कपले, श्याम पोटे, विकास रेखाते, राव मानकर, गजानन मेहरे, विनय महेरे, जनार्धन पोटे आदी युवा शेतकऱ्यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले. शेतकरी निसर्गाच्या कोपाने त्रस्त असताना पांढऱ्या माशीचे संकट त्याच्या डोक्यावर घोंगावत आहे. ही सुरुवात असली तरी पांढऱ्या माशीचे संकट केव्हाही उग्ररुप धारण करू शकते. कित्येकदा कृषीवरील रोगनाशक औषधेही निकामी ठरतात. हे संकट थांबविण्यासाठी कृषी विभागाने आतापासून कामाला लागावे. - श्रीधर क्षीरसागर, शेतकरी.सरकार शेतकऱ्यांप्रती गंभीर नाही. शेतातील पिकांवर संकटाची चाहूल लागताच त्यावर उपाययोजना केल्यास शेतकरी आर्थिक संकटात सापडत नाही. कृषी विभागाने पांढऱ्या माशीचे संकटावर आतापासून उपाययोजना केल्यास पिके निकोप राहतील व शेतकरी आर्थिक संकटावर मात करण्यास सक्षम बनतील. - अतुल लकडे, पुरस्कारप्राप्त शेतकरी.कपाशी पिकावर येणाऱ्या पांढऱ्या माशीची चाहूल लागली आहेत. काही भागांत सुरुवात झाली आहे. कृषी विभागाने त्यावर आताच उपाययोजना केल्यास पांढऱ्या माशीचे संकट येणार नाही. शेतकरी अगोदरच खचला आहे. याची जाण कृषी विभागाने ठेवावी.-बाळासाहेब गणगणे, शेतकरी.