शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
2
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
3
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
4
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
5
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
6
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
7
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
8
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
9
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
10
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
11
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
12
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
13
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
14
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
15
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
16
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
17
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
18
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
19
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
20
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा संकुल ठरतेय पांढरा हत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2017 00:17 IST

तालुक्यातील एकमेव क्रीडा संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.

सुविधांचा अभाव : नगरसेवकांचा आंदोलनाचा इशारा, उपाययोजनेची नगरसेवकांची मागणीसुमित हरकुट चांदूरबाजारतालुक्यातील एकमेव क्रीडा संकुलाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे. या क्रीडा संकुलात सुविधांचा आभाव असल्यामुळे परिसरातील क्रीडाप्रेमींना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. या असुविधेविरुद्ध पालिकेच्या नगरसेवकांनी त्वरित उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरासह ग्रामीण भागातही खेळाडू तयार व्हावे, त्यांना ही सर्व सोयी, सुविधा उपलब्ध व्हाव्यात या हेतुने शासनातर्फे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येते. याकरिता तालुकास्तरावर क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली. मात्र अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षत कारभारामुळे ग्रामीण भागातील खेळाडूंना सुविधांपासून मुकावे लागत आहे. या क्रीडा संकुलात दररोज शेकडो खेळाडू क्रिकेट, बॅटमिंटन, धावपट्टी, कबड्डी, लांब उडी, उंच उडी अशा अनेक खेळांचा सरावाकरिता क्रिडा संकुलमध्ये येतात. मात्र क्रीडा संकुलात प्रकाशाची, पिण्याच्या पाण्याची सोय नसल्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या क्रीडा संकुलाची संकल्पना तत्कालीन राज्यमंत्री वसुधा देशमुख यांनी मांडली होती. पुढे आमदार बच्चू कडू यांनी आपल्या निधीतून या क्रीडा संकुलाला मोठा निधी उपलब्ध करून दिला. आता या संकुलाकडे दुर्लक्ष होत असल्याची व्यथा क्रीडाप्रेमींतर्फे व्यक्त केली जात आहे. खेळाचे साहित्य आजवर या क्रीडाप्रेमींना बघायला सुद्धा मिळालेले नाही. जसे गोळाफेक, थाळीफेक, फुटबॉल, व्हॉलबॉल, भाला फेक या खेळाकरिता कोणतेच साहित्य उपलब्ध नसल्याने या खेळापासून क्रीडाप्रेमींना मुकावे लागत आहे. सध्या पोलीस भरती प्रक्रियेकरिता ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक वर्ग सरावाकरिता मैदानावर येतात. मात्र या मैदानावर दारूच्या बॉटली, काटेरी झुडुपे, पिण्याचा पाण्याचा अभाव, प्रशिक्षकाची उणीव, विद्युत रोषणाईसारख्या असुविधेमुळे नागरिकांची कोंडी होत असल्याने प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. त्यामुळे तालुक्यातील क्रीडाप्रेमींना या सुविधा त्वरित पुरविण्यात यावा, अशी मागणी नगरपालिकेचे शिक्षण सभापती गोपाल तिरमारे, बांधकाम सभापती आनंद ऊर्फ टिकू अहीर, नगरसेवक अतुल रघुवंशी यांनी तहसीलदार व जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केले आहे. अन्यथा आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला.ग्रामीण भागात खेळाडूंसाठी विशेष सुविधा उपलब्ध होणे गरजेचेयावर्षी तालुक्यातील आॅरेंजलाईन स्कूल, जगदंब स्कूल, जिजामाता स्कूलसारख्या अनेक शाळांनी फुटबॉल, कबड्डीसारख्या खेळांमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत मजल मारली. मात्र यांना आणखी सुविधा उपलब्ध झाल्यास ग्रामीण भागातील खेळाडू देशपातळीवरील स्पर्धेतसुद्धा बाजी मारू शकतील, अशी त्यांच्यात क्षमता आहे. त्यामुळे या ठिकाणी खेळाडूंच्या सुविधेसाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे.