शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

१८ वर्षांनंतर ही मुले जातात कुठे? विचारांनीच सुटतो थरकाप!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 05:01 IST

गजानन मोहोड । लोकमत न्यूज नेटवर्क अमरावती : ज्यांचे या जगात कुणीही नाही, अशी ही मुले वयाच्या अठराव्या वर्षांनंतर ...

ठळक मुद्देशंकरबाबा पापळकर यांची तळमळ१२३ अनाथांचे झाले वडील

गजानन मोहोड ।लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ज्यांचे या जगात कुणीही नाही, अशी ही मुले वयाच्या अठराव्या वर्षांनंतर कुठे जात असतील, या विचारांनी थरकाप सुटतो. आपल्या हयातीत यासाठी कायदा व्हावा, अशी शासनाकडून माफक अपेक्षा. बंधने नकोत, यामुळे आपण शासनाचे अनुदान व कुठला पुरस्कार स्वीकारला नसल्याचे स्पष्ट अन् परखड मत १२३ अनाथ, मतिमंद, मूकबधिर, अंध अन् बहुविकलांगांचा बापमाणूस शंकरबाबा पापळकर यांनी व्यक्त केले.राज्याच्या विविध भागांतील अनाथ मुलांना स्वत:चे नाव देऊन, स्वावलंबी करून शंकरबाबांनी त्यांना जगण्याचा नवा मंत्र दिला. शंकरबाबांच्या अशा २१ मुलींची लग्न झालीत. त्यांना २५ नातू आहेत. या सर्व कन्या संसारात सुखी आहेत. बाबांनी या सर्वांचे जनधन योजनेत खाते काढले. आधार कार्डमध्ये पिता म्हणून स्वत:चे नाव दिले. १०० मुलांना आता मताधिकार मिळाला. सर्वांचे रहिवासी दाखले वझ्झर येथील आहेत. त्यांचा विदूर नागपूर विद्यापीठात संगीतात एमए करतोय. गांधारीने संगीताच्या पाच परीक्षा दिल्यात. माला एमपीएससीची तयारी करते. अंध व मूकबधिरांना साक्षर व स्वावलंबी केले. त्यांचा समाजाशी संबंध फारसा येत नाही; पण सर्व जण एक कुटुंब म्हणून राहतात. वझ्झर आश्रमाच्या २५ एकरात या सर्वांनी १५ हजार झाडे लावलीत. यातील पाच हजार कडुनिबांची आहेत. प्रभाकरराव वैद्य यांच्याकडून किराणा मिळतो. विजेचे बिल, कपडे, औषधी व प्रवासाचा खर्च संत गजानन महाराज संस्थानद्वारे शिवशंकरभाऊ पाटील देतात. इर्विनची टीम दरमहा सर्वांची आरोग्य तपासणी करते. जिल्हाधिकारी, सीएस, एसडीओ अन् तहसीलदार यांचे नेहमी सहकार्य मिळत असल्याचे बाबांनी सांगितले. कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी आश्रमात २० किलो कडुनिंब पाल्याचा सकाळ व सायंकाळी धूर केला जातो. याशिवाय १० किलो पाल्याचा एक लिटर पाण्यात अर्क काढला जातो. हेच मुलांचे सॅनिटायझर असल्याचे बाबा म्हणाले.-जगातल्या तमाम वडिलांना विनंती आहे, कुठेही बहुविकलांग दिसला की, त्याला प्रेम द्या. त्याच्या पाठीवर प्रे्रमाचा हात फिरवा. त्याला सहकार्य करा. शासनाने या अनाथ मुलांना १८ वर्षांनंतरही आश्रमात राहता यावे, यासाठी कायदा करावा. दरवर्षी अशा एक लाखांवर मुलाचा मृत्यू होतो.- शंकरबाबा पापळकरवझ्झर, ता. अचलपूर२५ वर्षांपासून कुटुंबापासून दूरशंकरबाबांच्या पत्नीचे निधन झाले आहे. त्यांना मुलगा व मुलगी आहे. मात्र, या अनाथ मुलांकडे दुर्लक्ष होऊ नये, यासाठी २५ वर्षांपासून त्यांनी स्वत:ची मुले, भाऊ, बहीण आदींची भेट घेतलेली नाही. मुलगी अमरावतीला, तर मुलगा यवतमाळला असल्याचे बाबा म्हणाले.रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण ज्यांना रक्ताच्या नात्यातील कोणीच नाही वा नात्यातील कोणी सांभाळ करीत नाही, अशा अनाथ मुलांचे काय? या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!

टॅग्स :Father's Dayजागतिक पितृदिन