शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

महेंद्री संवर्धन राखीव क्षेत्राचे घोडे अडले कोठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:13 IST

तीन महिन्यानंतर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश : अभयारण्याचा प्रस्ताव बारगळला वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा ...

तीन महिन्यानंतर प्रस्ताव सादर करण्याचे आदेश : अभयारण्याचा प्रस्ताव बारगळला

वरूड : तालुक्यातील सातपुड्याच्या कुशीत असलेल्या महेंद्री जंगलाला अभयारण्याचा दर्जा न देता ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करण्यात आले. तसा निर्णयही मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र, त्या निर्णयाला तीन महिने होत असताना प्रत्यक्षात कुठल्याही कामास सुरुवात झालेली नाही. मंत्रिमंडळ निर्णयानुसार आता कुठे प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला मिळाल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची नागपूर येथे ऑगस्ट २०२० मध्ये झालेल्या बैठकीत महेंद्री अभयारण्य जाहीर करून त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे आदेश वनविभागाला दिले होते. यामुळे वरूड तालुक्याच्या वैभवात भर पडून पर्यटक वाढतील, असा उद्देश होता. परंतु, राजकीय आणि ग्रामस्थांचा दबाव वाढत असल्याने अभयारण्याऐवजी महेंद्री जंगल ‘संवर्धन राखीव क्षेत्र’ घोषित करून तसा प्रस्ताव पाठविण्याचे आदेश वनविभागाला देण्यात आले होते. परंतु, तीन महिन्यांचा कालावधी लोटूनसुद्धा प्रत्यक्ष कामाला सुरुवात नसल्याने महेंद्री संरक्षित जंगलाचे घोडे कुठे अडले, हे गुलदस्त्यात आहे. महेंद्री अभयारण्याला ग्रामस्थांसोबतच राजकीय विरोधाची बाधा नडल्याची वस्तुस्थिती कुणीही नाकारणार नाही. मात्र, संरक्षित जंगल क्षेत्र म्हणजे नेमके काय, ते केल्याने महेंद्री जंगलातील वन्यजिवांचे संवर्धन होईल का, असा प्रश्न परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

बॉक्स

नागपूरला बैठक

महेंद्री अभयारण्याला विरोध झाल्याने शासनाने हे समृद्ध जंगल संरक्षित वन घोषित केले. याबाबत शासनाने प्रस्ताव मागविला होता. याबाबत १३ फेब्रुवारी रोजी नागपूर येथे बैठक होती. यामध्ये संरक्षित वनाबाबतच्या तरतुदी, अटी-शर्तीनुसार प्रस्ताव सादर करण्यात येईल, असे वरूड परिक्षेत्राचे वनाधिकारी प्रशांत लांबाडे यांनी सांगितले.