शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
Video - एक, दोन नव्हे तर चोरांची अख्खी गँगच; काही सेकंदात खिशातून लंपास केला फोन अन्...
5
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
6
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
7
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
8
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
9
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
10
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
11
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
12
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
13
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
14
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
15
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
16
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
17
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
18
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
19
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
20
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  

ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांची निधी गेला कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST

कॅप्शन : ग्रामपंचायत धारणमहू अंतर्गत येणाऱ्या ढाकरमल या गावातील सिमेंट रस्त्याची दुरवस्था पंचायतीला आर्थिक अधिकार देण्याचा निर्णय : ...

कॅप्शन : ग्रामपंचायत धारणमहू अंतर्गत येणाऱ्या ढाकरमल या गावातील सिमेंट रस्त्याची दुरवस्था

पंचायतीला आर्थिक अधिकार देण्याचा निर्णय : तपासाची आवश्यकता

श्यामकांत पाण्डेय

धारणी : केंद्र शासनाने सात-आठ वर्षांपासून पंचायत राज योजना अंमलात आणली. ग्रामपातळीवर खर्च केला जात असलेल्या निधीचा योग्य वापर व्हावा आणि गावातील गरजांची पूर्तता व्हावी, यासाठी आर्थिक अधिकार पूर्णपणे ग्रामपंचायत स्तरावर वळते करण्यात आले. भ्रष्टाचारावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. आजच्या परिस्थितीत मेळघाटातील ग्रामपंचायतींची अवस्था बघितल्यास ‘पंचायत राज’चा निर्णय कुठे तरी चुकला की काय, असा सवाल उपस्थित होतो.

गावस्तरावर दरवर्षी लाखो रुपयांची निधीची खिरापत वाटली जात असताना आणि तो निधी कागदोपत्री योग्य प्रकारे खर्च झाल्याचे दाखवण्यात आल्यानंतरसुद्धा ग्रामपातळीवर विकास बेपत्ता असल्याचे गावात फेरफटका मारल्यानंतर निदर्शनास आले आहे. मेळघाटातील धारणी व चिखलदरा या दोन आदिवासीबहुल तालुक्यात सन १९९३ मध्ये कुपोषणाचा उद्रेक झाला. तेव्हापासून राज्य व केंद्राची नजर मेळघाटातील कुपोषण दूर करण्याकडे स्थिरावली होती. कुपोषणच्या मुळात न जाता, केवळ पैशांचा पाऊस पाडण्यात आला. याचा सर्वांत जास्त फायदा गैरशासकीय संघटनांनी घेतला, हे सर्वविदित आहे. तरीसुद्धा कुपोषण व बालमृत्यू कमी होत नसल्याचे लक्षात आल्यावर विकासाची कामे थेट ग्रामपंचायत स्तरावर देण्याचा निर्णय ‘पंचायत राज’च्या नावाखाली घेण्यात आला. गावातील सरपंच आणि निवडून आलेले सदस्यांनी ग्रामस्तरावर असलेल्या समस्यांच्या निराकरणासाठी निधी खर्च करावा, असा त्यामागील उद्देश होता. मात्र, यातही राजकारण आले आणि राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायतला हाताशी धरून विकासनिधीचा पुरता चुराडा करून टाकला.

अशी आहे परिस्थिती

मेळघाटातील गावात फेरफटका मारल्यास सर्वाधिक निधी हे सिमेंट काँक्रीट रस्ते आणि काँक्रीट नाल्या निर्माण करण्यातच वापरल्याचे दिसून येते. या रस्त्यांची आणि नाल्यांची थातूरमातूर कामे ग्रामपंचायत पातळीवर करण्यात आली. त्यामुळे आज गावात व गल्लीत फिरायला गेल्यास जीर्णावस्थेत आलेले सिमेंट रस्ते पायी चालण्यासह योग्य नसल्याचे दिसून येते. सिमेंट काँक्रीटची नाली जमीनदोस्त झाल्याचेसुद्धा पाहावयास मिळते. याव्यतिरिक्त विविध योजनेंतर्गत हाय मास्ट लाईट खरेदी, आरओ प्लांट, पाणीपुरवठा योजना, अंगणवाडी केंद्राकरिता साहित्य खरेदी करणे, शालेय साहित्याची खरेदी यांच्या माध्यमाने लाखो रुपयांची निधी पाण्यात गेल्याचे चौकशीअंती बाहेर येऊ शकते. त्यामुळे मेळघाटातील ग्रामपंचायत स्तरावर गेल्या सात-आठ वर्षांपासून देण्यात आलेल्या विविध योजनेंतर्गत खर्च करण्यात आलेल्या निधीची चौकशी करणे आवश्यक झाले आहे.