शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
3
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
4
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
5
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
6
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
7
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
8
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
9
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
10
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
11
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
12
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
13
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
14
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
15
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
16
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
17
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
18
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
19
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
20
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
Daily Top 2Weekly Top 5

चांदुरात कुठे आहे कोरोना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तुफान गर्दी : संचारबंदीचे उल्लंघन, प्रशासन घायकुतीस

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला उपविभागीय अधिकारी यांनी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. या शिथिलतेचा गैरफायदा घेत शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याने संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मात्र, याकडे पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार सर्रास दुकाने उघडून फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करता व्यवसाय करीत आहते, तर ग्राहकसुद्धा विनामास्कने सर्रास वावरत असून, संचारबंदीचा सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.जिल्ह्यासह राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसला तरी शहरातील बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी पाहता पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. नागरिकसुद्धा बेजबाबदार झाल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतेपर्यंत बाजारात तुफान गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे संचारबंदी संपुष्टात आली काय, असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करीत आहे. काही व्यवसायिकांना अटी व शर्तीच्या अधीन राहून ६ मे पासून व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गल्ली बोळीतील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत अनेक दुकाने उघडली.संचारबंदीत अतिक्रमणहीया दुकानांवर होणाºया गर्दीमुळे संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात भरणाºया भाजीपाला दुकाने व फळाच्या गाड्या मनात येईल तेथे उभ्या करून दुकाने थाटली जात आहे. यामुळे बाजारात सगळीकडे गर्दीच गर्दी झाली असून, कोरोनाचा शिरकाव दबक्या पायाने तालुक्यात तर होणार नाही ना? अशी शंका स्थानिक नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे. काही दुकानदारांनी कमाईच्या लालसेपोटी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग कुठेही दिसून येत नाही. पोरांना विषाणूचा संसर्ग अद्यापही टळलेला नाही. असे असतानाही शहरात होत असलेली गर्दी या जीवघेण्या विषाणूला आमंत्रण देणारी ठरत आहे. संचारबंदीचे होत असलेले उल्लंघन पाहून खरेच शासनाने सवलत देऊन चूक तर केली नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असले तरी गर्दी आटोक्यात आणणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार