शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

चांदुरात कुठे आहे कोरोना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तुफान गर्दी : संचारबंदीचे उल्लंघन, प्रशासन घायकुतीस

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला उपविभागीय अधिकारी यांनी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. या शिथिलतेचा गैरफायदा घेत शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याने संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मात्र, याकडे पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार सर्रास दुकाने उघडून फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करता व्यवसाय करीत आहते, तर ग्राहकसुद्धा विनामास्कने सर्रास वावरत असून, संचारबंदीचा सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.जिल्ह्यासह राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसला तरी शहरातील बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी पाहता पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. नागरिकसुद्धा बेजबाबदार झाल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतेपर्यंत बाजारात तुफान गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे संचारबंदी संपुष्टात आली काय, असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करीत आहे. काही व्यवसायिकांना अटी व शर्तीच्या अधीन राहून ६ मे पासून व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गल्ली बोळीतील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत अनेक दुकाने उघडली.संचारबंदीत अतिक्रमणहीया दुकानांवर होणाºया गर्दीमुळे संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात भरणाºया भाजीपाला दुकाने व फळाच्या गाड्या मनात येईल तेथे उभ्या करून दुकाने थाटली जात आहे. यामुळे बाजारात सगळीकडे गर्दीच गर्दी झाली असून, कोरोनाचा शिरकाव दबक्या पायाने तालुक्यात तर होणार नाही ना? अशी शंका स्थानिक नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे. काही दुकानदारांनी कमाईच्या लालसेपोटी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग कुठेही दिसून येत नाही. पोरांना विषाणूचा संसर्ग अद्यापही टळलेला नाही. असे असतानाही शहरात होत असलेली गर्दी या जीवघेण्या विषाणूला आमंत्रण देणारी ठरत आहे. संचारबंदीचे होत असलेले उल्लंघन पाहून खरेच शासनाने सवलत देऊन चूक तर केली नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असले तरी गर्दी आटोक्यात आणणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार