शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

चांदुरात कुठे आहे कोरोना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 05:00 IST

आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे.

ठळक मुद्देनागरिकांची तुफान गर्दी : संचारबंदीचे उल्लंघन, प्रशासन घायकुतीस

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : कोरोना विषाणूचा संसर्ग थांबविण्यासाठी देशात २३ मार्चपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या संचारबंदीला उपविभागीय अधिकारी यांनी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. या शिथिलतेचा गैरफायदा घेत शेकडो नागरिकांनी रस्त्यावर गर्दी केल्याने संचारबंदीचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. मात्र, याकडे पालिका व पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांतर्फे केला जात आहे.आज दीड महिना उलटूनही राज्यात कोरोना विषाणूंचा कहर थांबता थांबेना, अशी परिस्थिती पहावयास मिळत आहे. परंतु आजघडीला एकही कोरोना बाधित रुग्ण तालुक्यात नसल्याने चांदूरबाजार तालुक्याला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने काही प्रमाणात प्रतिष्ठाने सुरू करण्याच्या संदर्भात मुभा दिली आहे. यात तालुक्यात मुभा देण्यात आलेले व्यवसाय सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतापर्यंत सुरू ठेवण्याचे जाहीर करण्यात आले आहे. याचा गैरफायदा घेत अनेक दुकानदार सर्रास दुकाने उघडून फिजिकल डिस्टसिंगचे पालन न करता व्यवसाय करीत आहते, तर ग्राहकसुद्धा विनामास्कने सर्रास वावरत असून, संचारबंदीचा सर्रास उल्लंघन होताना दिसत आहे.जिल्ह्यासह राज्यातून कोरोनाचा प्रादुर्भाव संपला नसला तरी शहरातील बाजारपेठेत वाढत असलेली गर्दी पाहता पालिका प्रशासनातर्फे कुठलीच कारवाई केली जात नाही. नागरिकसुद्धा बेजबाबदार झाल्याचे चित्र दिसत आहे. बाजारपेठेत सकाळी ८ ते दुपारी ३ वाजतेपर्यंत बाजारात तुफान गर्दी पहावयास मिळत आहे. यामुळे संचारबंदी संपुष्टात आली काय, असा सवाल अनेक नागरिक उपस्थित करीत आहे. काही व्यवसायिकांना अटी व शर्तीच्या अधीन राहून ६ मे पासून व्यवसाय करण्यास परवानगी मिळाली. यात उपविभागीय अधिकाऱ्यांच्या आदेशान्वये गल्ली बोळीतील दुकाने उघडण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र, मुख्य बाजारपेठेत अनेक दुकाने उघडली.संचारबंदीत अतिक्रमणहीया दुकानांवर होणाºया गर्दीमुळे संचारबंदीचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शहरात भरणाºया भाजीपाला दुकाने व फळाच्या गाड्या मनात येईल तेथे उभ्या करून दुकाने थाटली जात आहे. यामुळे बाजारात सगळीकडे गर्दीच गर्दी झाली असून, कोरोनाचा शिरकाव दबक्या पायाने तालुक्यात तर होणार नाही ना? अशी शंका स्थानिक नागरिकांतर्फे व्यक्त केली जात आहे. काही दुकानदारांनी कमाईच्या लालसेपोटी संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे दिसून येत आहे. यात फिजिकल डिस्टन्सिंग कुठेही दिसून येत नाही. पोरांना विषाणूचा संसर्ग अद्यापही टळलेला नाही. असे असतानाही शहरात होत असलेली गर्दी या जीवघेण्या विषाणूला आमंत्रण देणारी ठरत आहे. संचारबंदीचे होत असलेले उल्लंघन पाहून खरेच शासनाने सवलत देऊन चूक तर केली नाही ना, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. असे असले तरी गर्दी आटोक्यात आणणे सध्या तरी गरजेचे झाले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजार