शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील तहसीलदारांना कधी मिळणार न्याय

By admin | Updated: July 22, 2014 23:47 IST

सर्वाधीक महसूल देणाऱ्या महसूल विभागाचा केंद्र बिंदू असणाऱ्या तहसीलदारावर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढला असून आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल राज्यातील तहसीलदार यांनी केला आहे़

मोहन राऊत - अमरावतीसर्वाधीक महसूल देणाऱ्या महसूल विभागाचा केंद्र बिंदू असणाऱ्या तहसीलदारावर दिवसेंदिवस कामाचा बोझा वाढला असून आम्हाला न्याय कधी मिळणार असा सवाल राज्यातील तहसीलदार यांनी केला आहे़अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ८४ तहसीलदार कार्यरत आहेत़ राज्य शासनात असलेल्या विभागापैकी सर्वाधीक महसूल हा महसूल विभाग देतो़ तालुक्यातील सर्व गावांतील कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी ही तहसीलदारावर असते़ मागील वीस वर्षा पूर्वी केवळ महसूल मधील शेती संदर्भातील सातबारा, पेरे पत्रक महसूल दप्तर व अभीलेख, अपडेट ठेवण्याची महसूली कामे होती़ आता तब्बल साडेतीनशे कामाचा बोझा वाढला आहे़ तहसीलदारांच्या वाढत्या कामाकडे शासनाचे पुर्णत: दुर्लक्ष होत असल्याचा आरोप तहसीलदार- नायब तहसीलदार संघटनेने केला आहे़आज पूर्ण दिवस जातीचे प्रमाणपत्र, नॉनक्रिमीलीअर, उत्पन्नाचा दाखले, अधिवास प्रमाणपत्र यावर स्वाक्षरी करण्यात जातो़ जिल्ह्याच्या ठिकाणी पुरवठा विभागाकरीता स्वतंत्र तहसीलदार म्हणून आहेत़ परंतू तालुकास्थळी पुरवठा विभागाची जबाबदारी तहसीदारावर आहे़ या विभागात कोणताही अपहार झाला तर तहसीलदाराला जबाबदार धरण्यात येते़ करमणुक कर, अतीवृष्टी धारकांना मदतीचे वाटप, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ अर्थसहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांना अनुदान वाटप व महसुल मधून येणारी शासकीय वसुली तसेच विविध विभागातून येणाऱ्या करांच्या हिशोबांचा लेखाजोखा तहसील कार्यालयातील लिपीकावर असतेक़ोट्यावधी रूपयांचा महसूल गोळा करणाऱ्या या कार्यालयाकरीता लेखापाल नसल्यामुळे कोणतीही चुक झाली तर तहसीलदाराला दोषी ठरविण्यात येते़ महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजना ही राज्यात तहसील कार्यालयाच्या देखभालीत सुरू आहे़ कामाची मागणी केल्या नतर पंधरा दिवसात संबधीत मजूराला कामे उपलब्ध करून न दिल्यास भत्ता द्यावा लागते या रोहयो साठी स्वतंत्र अधिकारी नेमावा ही मागणी तहसीलदार संघटनेची धुळखात शासन दरबारी पडली आहे़ तहसील कार्यालयात कामे करतांना अनेकवेळा पक्षकार तहसीलदारांच्या अंगावर धावून येतात़ यावेळी वेळेवर पोलीस सरंक्षण मिळत नसल्याची खंत तहसीलदारांनी व्यक्त केली आहे़ मृत्यू पूर्व जबानी घेण्याची जबाबदारी तहसीलदारांवर आहे़ ही जबानी घेतल्या नंतर न्यायालयात चालणाऱ्या प्रकरणावेळी तहसीलदाराला वारंवार चकरा मारण्याचे काम करावे लागते़ लोकसभा निवडणूकीपासून तर ग्रामपंचायती निवडणूकी पर्यंत कामाचा व्याप तहसीलदारावर असते़ निवडणूकी प्रक्रीयेत योग्य निर्णय दिल्या नंतर ही एखाद्या राजकीय पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला तर तहसीलदारावर वचपा काढण्याचे प्रकार विभागात घडले आहे ़मुरूम ,रेती, गिट्टी, अवैद्य गौण खनिज चोरणाऱ्यांना आळा घालतांना तहसीलदारावर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले आहेत क़ामाच्या वाढत्या व्यापामुळे तहसीलदारावर मानसिक ताण वाढला आहे़ मानसिकताण कमी करण्याकरीता एक अतिरीक्त तहसीलदार नेमण्यात यावे, अशी मागणी तहसीलदार संघटनेने केली आहे़