शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
4
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
5
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
6
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
7
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
8
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
9
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
10
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
11
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
12
एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
13
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
14
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
15
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
16
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं
17
Rajnath Singh : "पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारुन मारलं, आम्ही त्यांचं कर्म पाहून त्यांना अद्दल घडवली"
18
दिल्ली कॅपिटल्सनं ६ कोटींचा डाव लावला त्यानं दुबईचं फ्लाइट पकडलं! PSL कनेक्शनमुळे तो IPL ला मुकणार?
19
५० हजार पगार, घराचे स्वप्न पूर्ण होईल का? की भाड्यानेच राहणे परवडेल...; असं आहे सोपं गणित
20
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं

पुरवठादार, कंत्राटदारांची ‘ईएमडी’ केव्हा मिळणार परत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:22 IST

अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे बंद आहेत. मात्र, गत तीन वर्षापासून पुरवठादार, कंत्राटदारांचे ...

अमरावती : कोरोना संसर्गामुळे मार्च २०२० पासून शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, वसतिगृहे बंद आहेत. मात्र, गत तीन वर्षापासून पुरवठादार, कंत्राटदारांचे निविदापोटी बयाणा रक्कम (ईएमडी) जमा असताना सातत्याने मागणी करुनही परत मिळत नाही. समाजकल्याण, आदिवासी विकास विभागात बयाणा रक्कम मोठ्या प्रमाणात असून, ती परत करावी, अशी मागणी पुरवठादार, कंत्राटदारांनी केली आहे.

वस्तू, साहित्यासाठी ई-निविदेच्यावेळी निविदा शुल्क ऑनलाईन जमा केले जाते. मात्र, कोरोनामुळे काही निविदाची प्रक्रिया पूर्णत्वास आली नाही. तर, काही निविदांना शासनस्तरावरून मान्यता मिळाली नाही. अशा निविदांचे शुल्कदेखील परत देण्यात आले नाही. पुरवठादार, कंत्राटदारांकडून त्याकरिता सतत पाठपुरावा केला जात आहे. आदिवासी विकास विभागाच्या धारणी एकात्मिक प्रकल्प कार्यालयातील मालपुरे नामक लिपिकांचा प्रचंड त्रास आहे. नियमानुसार ईएमडी परत मिळावी, असे अपेक्षित आहे. वरिष्ठांकडे वारंवार पत्रव्यवहार करण्यात येत असताना ई-निविदा राबविल्यानंतरही बयाणा रक्कम देण्यात येत नाही.

‘ट्रायबल’मध्ये १४ महिन्यांपूर्वी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली असताना अद्यापही बयाणा रक्कम देण्यात आले नाही. सन २०१७ मध्ये निविदेची बयाणा रक्कम ऑनलाईन भरण्यात आले तरीही आदिवासी विकास विभागात ते जमा झाले नाही, असे टोलवाटोलवी केली जात आहे. ऑनलाईन बयाणा रक्कम भरल्यानंतरही ती कुठे गेली याचा शोध धारणी प्रकल्प कार्यालयात अधिकारी, कर्मचारी लावू शकत नाही, याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लेखा विभागातील कर्मचाऱ्यांना अकाऊंट मॅपींग करता येत नाही, याचा फटका पुरवठादार, कंत्राटदारांना बसत आहे.

---------------------

मान्यता नसताना निविदा शुल्क अडविले

सन २०२०-२०२१ या वर्षात अन्नधान्य, किराणा, मसाले पुरवठा करण्यासाठी ई-निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र, कोरोनामुळे आश्रमशाळा बंद करण्यात आल्यात. आता या निविदेचा कालावधी संपुष्टात आला असतानाही बयाणा रक्कम २० लाख आणि निविदा शुल्क १.७५ लाख परत करण्यात आले नाही. या निविदेला शासनाकडून अद्यापही मान्यता प्रदान करण्यात आली नाही. असा कारभार समाजकल्याण, आदिवासी विकास विभागाचा सुरू आहे.

--------

दोन पुरवठादारांचे ईएमडी असल्याची बाब बुधवारी समोर आली. त्या पुरवठादारांना प्रमाणपत्र आणण्याचे कळविले आहे. ही पूर्तता होताच त्यांची बयाणा रक्कम परत केली जाईल. बयाणा रक्कम अडविण्याचे काहीही कारण नाही.

- मिताली सेठी, प्रकल्प अधिकारी, धारणी