शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

सार्वजनिक नळांना कधी लावणार तोट्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:16 IST

पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

लोकमत विशेष

अमरावती : पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्याच नसल्यामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातील हे पाणी ५५ ते ६० किलोमीटरच्या प्रवास करून अमरावतीपर्यंत पोहोचविले जाते. दरम्यान पाण्याची ३५ टक्के गळती होत आहे. दर दिवसाला साधारणात शहरवासियांना ११५ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तोसुध्दा मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रत्येक व्यक्तीला दरदिवसाला १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये जीवन प्राधिकरणाकडून प्रती व्यक्ती ११० लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. जीवन प्राधीकरणाचे शहरात ८५ हजार नळजोडणी आहेत. त्यापैकी आतापर्यंत १२०० सार्वजनिक नळ सुरु होते. मात्र, मध्यंतरी काही नळजोडणी पाण्याच्या अपव्ययामुळे बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ९५० सार्वजनिक नळ सुरु आहेत. या नळांपैकी बहुतांश नळांना तोट्याच नाहीत. त्यामुळे हजारो लिटर पाणी नालीत वाहून जात आहे. हे नळ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या सोयीचे आहेत. मात्र, नळांना तोट्याच नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या सार्वजनिक नळांच्या बिलांचा भरणा महापालिकेकडून केला जातो. मात्र, महापालिकेकडे तब्बल ८४ कोटींचे पाणी बिल थकीत आहे. एकीकडे पाण्याचा अपव्यय तर दुसरीकडे बिलाची थकबाकी. असा सावळा गोंधळ महापालिकेकडून सुरु आहे. नळांना तोट्या बसविण्यात याव्यात किंवा सार्वजनिक नळ बंद करावे, याबाबत जीवन प्राधिकरणने कळवून देखील पाण्याच्या अपव्ययाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. लोकमतने जलमित्र अभियानाला सुरूवात केली असून यातून अनेकांना पाणी वाचविण्याबाबत प्रेरणासुध्दा मिळाली आहे. आता अमरावतीकरांनीसुध्दा पाणी बचतीचा ध्यास धरणे काळाची गरज बनली आहे.