शहरं
Join us  
Trending Stories
1
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
2
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
3
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
4
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
5
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
6
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
7
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
8
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
9
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
10
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
11
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
12
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
13
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
14
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र
15
"मंत्र्यांच्या दौऱ्यामुळे सरकारचे पंचनाम्याऐवजी राजशिष्टाचाराकडे लक्ष"; शरद पवारांनी शासनाला दिला सल्ला
16
VIDEO: पाकिस्तानच्या मंत्र्यांची 'आंतरराष्ट्रीय' फजिती, AI वर भाषण देताना अनेक उच्चार चुकले
17
“ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहोत, विजय मिळवणार”: छगन भुजबळ
18
PM मोदींशी १ तास नेमकी काय चर्चा झाली? CM फडणवीसांनी दिली सगळी माहिती; म्हणाले, “कर्जमाफी...”
19
“CM फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी दिल्लीतून भरीव पॅकेज घेऊनच यावे, अन्यथा तेथेच थांबावे”: सपकाळ
20
PPF, SSY आणि SCSS च्या व्याजदरांमध्ये वाढ होणार? कोट्यवधी अल्पबचतधारकांना उत्सुकता

सार्वजनिक नळांना कधी लावणार तोट्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:16 IST

पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

लोकमत विशेष

अमरावती : पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्याच नसल्यामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातील हे पाणी ५५ ते ६० किलोमीटरच्या प्रवास करून अमरावतीपर्यंत पोहोचविले जाते. दरम्यान पाण्याची ३५ टक्के गळती होत आहे. दर दिवसाला साधारणात शहरवासियांना ११५ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तोसुध्दा मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रत्येक व्यक्तीला दरदिवसाला १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये जीवन प्राधिकरणाकडून प्रती व्यक्ती ११० लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. जीवन प्राधीकरणाचे शहरात ८५ हजार नळजोडणी आहेत. त्यापैकी आतापर्यंत १२०० सार्वजनिक नळ सुरु होते. मात्र, मध्यंतरी काही नळजोडणी पाण्याच्या अपव्ययामुळे बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ९५० सार्वजनिक नळ सुरु आहेत. या नळांपैकी बहुतांश नळांना तोट्याच नाहीत. त्यामुळे हजारो लिटर पाणी नालीत वाहून जात आहे. हे नळ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या सोयीचे आहेत. मात्र, नळांना तोट्याच नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या सार्वजनिक नळांच्या बिलांचा भरणा महापालिकेकडून केला जातो. मात्र, महापालिकेकडे तब्बल ८४ कोटींचे पाणी बिल थकीत आहे. एकीकडे पाण्याचा अपव्यय तर दुसरीकडे बिलाची थकबाकी. असा सावळा गोंधळ महापालिकेकडून सुरु आहे. नळांना तोट्या बसविण्यात याव्यात किंवा सार्वजनिक नळ बंद करावे, याबाबत जीवन प्राधिकरणने कळवून देखील पाण्याच्या अपव्ययाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. लोकमतने जलमित्र अभियानाला सुरूवात केली असून यातून अनेकांना पाणी वाचविण्याबाबत प्रेरणासुध्दा मिळाली आहे. आता अमरावतीकरांनीसुध्दा पाणी बचतीचा ध्यास धरणे काळाची गरज बनली आहे.