शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक नळांना कधी लावणार तोट्या ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2016 00:16 IST

पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे.

हजारो लिटर पाण्याचा अपव्यय : महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष 

लोकमत विशेष

अमरावती : पाणी मानवी जीवनासाठी आवश्यक असतानाही अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होत आहे. बहुतांश सार्वजनिक नळांना तोट्याच नसल्यामुळे हजारो लिटर पाणी दररोज वाया जात आहे. ही जबाबदारी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाची आहे. मात्र, त्यांचे याकडे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. अमरावती शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. सिंभोरा येथील अप्पर वर्धा धरणातील हे पाणी ५५ ते ६० किलोमीटरच्या प्रवास करून अमरावतीपर्यंत पोहोचविले जाते. दरम्यान पाण्याची ३५ टक्के गळती होत आहे. दर दिवसाला साधारणात शहरवासियांना ११५ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जात आहे. तोसुध्दा मर्यादेपेक्षा अधिक आहे. प्रत्येक व्यक्तीला दरदिवसाला १३५ लिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामध्ये जीवन प्राधिकरणाकडून प्रती व्यक्ती ११० लिटर पाणीपुरवठा केला जात आहे. जीवन प्राधीकरणाचे शहरात ८५ हजार नळजोडणी आहेत. त्यापैकी आतापर्यंत १२०० सार्वजनिक नळ सुरु होते. मात्र, मध्यंतरी काही नळजोडणी पाण्याच्या अपव्ययामुळे बंद करण्यात आले असून सद्यस्थितीत ९५० सार्वजनिक नळ सुरु आहेत. या नळांपैकी बहुतांश नळांना तोट्याच नाहीत. त्यामुळे हजारो लिटर पाणी नालीत वाहून जात आहे. हे नळ दारिद्र्यरेषेखालील नागरिकांच्या सोयीचे आहेत. मात्र, नळांना तोट्याच नसल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. या सार्वजनिक नळांच्या बिलांचा भरणा महापालिकेकडून केला जातो. मात्र, महापालिकेकडे तब्बल ८४ कोटींचे पाणी बिल थकीत आहे. एकीकडे पाण्याचा अपव्यय तर दुसरीकडे बिलाची थकबाकी. असा सावळा गोंधळ महापालिकेकडून सुरु आहे. नळांना तोट्या बसविण्यात याव्यात किंवा सार्वजनिक नळ बंद करावे, याबाबत जीवन प्राधिकरणने कळवून देखील पाण्याच्या अपव्ययाकडे महापालिका दुर्लक्ष करीत आहे. लोकमतने जलमित्र अभियानाला सुरूवात केली असून यातून अनेकांना पाणी वाचविण्याबाबत प्रेरणासुध्दा मिळाली आहे. आता अमरावतीकरांनीसुध्दा पाणी बचतीचा ध्यास धरणे काळाची गरज बनली आहे.