शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने ...

अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने या विहिरीत पडून वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत. अशाप्रकारच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यात नियमितपणे घडत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसवून वनविभागाने वन्यजीवांचे अपघाती मृत्यू थांबवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

येथील वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून वन्यजीवांचे अपघाती मृत्यूची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. हल्ली वनक्षेत्रात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी मिळत नाही. त्यामुळे वाघ, बिबट, हरिण, नीलगाय, जंगली डुक्कर आदी वन्यजीव तृष्णातृप्तीसाठी भटकंती करतात. दरम्यान विहिरीत पाणी दिसून येताच वन्यजीव ते पिण्यासाठी विहिरीत उड्या मारतात. मात्र, विहिरीतून बाहेर निघणे कठीण होते. त्यामुळे आतापर्यंत विहिरीत बुडून अनेक वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद वन विभागाकडे आहे. त्यामुळे वनविभागाने वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविल्यास वन्यजीवांचे अपघाती मृत्यू रोखता येईल, अशी आर्त हाक नीलेश कंचनपुरे दिली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण आदींकडे निवेदन सादर करण्यात आले. विदर्भातील वनक्षेत्रालगतच्या विहिरींमध्ये वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.