शहरं
Join us  
Trending Stories
1
महसूल मंत्र्यांचा दुय्यम निबंधक कार्यालयातच छापा; अधिकाऱ्यांच्या ड्रॉवरमध्ये आढळले पैसे
2
आजचे राशीभविष्य- ७ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस शुभ फलदायी, 'या' राशींची होणार भरभराट!
3
सरन्यायाधीशांवर वकिलाकडून बूट फेकण्याचा प्रयत्न ; ‘सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही’ अशा घोषणा देत कोर्ट सुरू असतानाच केला हल्ला 
4
कोणत्या नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी कोणते आरक्षण; सोडत निकाल वाचा एका क्लिकवर... 
5
वांगचूक यांना अटक; केंद्र सरकार, लडाखला नोटीस; तत्काळ सुटका करण्याची सर्वोच्च न्यायालयात मागणी 
6
बिहार विधानसभेचा बिगुल अखेर वाजला; दोन टप्प्यांत मतदान, तर १४ नोव्हेंबरला निकाल   
7
मुंबई महापालिकेची अंतिम प्रभागरचना मंजूर; निवडणूक प्रक्रियेला वेग, मतदार याद्यांची प्रतीक्षा 
8
२४७ नगरपरिषदांमध्ये १२५ नगराध्यक्षपदे महिलांसाठी; तर १४७ नगरपंचायतींमध्ये ७३ महिलांसाठी राखीव 
9
ब्रुनको, रॅम्सडेल व साकागुची यांना मेडिसिनचे नोबेल; टी-पेशींचा शोध, कर्करोग आणि मधुमेहावर उपयुक्त
10
७ कोटींच्या घरांना ग्राहक मिळाले नाहीत, तर म्हाडा घरे भाड्याने देणार
11
लादेनच्या डोक्यात अमेरिकी नेव्ही सीलनेच गोळी झाडली होती, हे इतिहास विसरणार नाही : ट्रम्प
12
तरुणाई ठरवणार बिहारचा मुख्यमंत्री?
13
विशेष न्यायालयाचा दोघांची सुटका करण्यास नकार; बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण, सरकारी वकिलांची माहिती  
14
अपहरण केले, पण चांगले खायला दिले; दिलीप खेडकरचा असाही बचावात्मक पवित्रा
15
परप्लेक्सिटीचा तांत्रिक बिघाड सोडवला, १ कोटीची नोकरी मिळाली; पालघर जिल्ह्यातल्या जितेंद्रची झाली निवड
16
पालकांचा सांभाळ मुलांनी केलाच पाहिजे; बक्षिसपत्राविषयी उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
17
अतिवृष्टीचे निकष बदलून शेतकऱ्यांना करणार मदत; बुजलेल्या विहिरींनाही मदतीचा प्रस्ताव
18
“भाजपाने तारखा दिल्या, ज्ञानेश कुमारांनी वाचून दाखवल्या”; बिहार निवडणुकीवरून विरोधकांची टीका
19
बिहारसह ‘या’ ७ ठिकाणी होणार पोटनिवडणुका, निवडणूक आयोगाकडून मतदान, निकालाची तारीख जाहीर
20
VIDEO: पिल्लासाठी काहीपण... 'बेबी जिराफ'ची आई सिंहिणीला भिडली, जवळ येताच लाथ मारली अन्...

वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने ...

अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने या विहिरीत पडून वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत. अशाप्रकारच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यात नियमितपणे घडत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसवून वनविभागाने वन्यजीवांचे अपघाती मृत्यू थांबवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

येथील वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून वन्यजीवांचे अपघाती मृत्यूची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. हल्ली वनक्षेत्रात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी मिळत नाही. त्यामुळे वाघ, बिबट, हरिण, नीलगाय, जंगली डुक्कर आदी वन्यजीव तृष्णातृप्तीसाठी भटकंती करतात. दरम्यान विहिरीत पाणी दिसून येताच वन्यजीव ते पिण्यासाठी विहिरीत उड्या मारतात. मात्र, विहिरीतून बाहेर निघणे कठीण होते. त्यामुळे आतापर्यंत विहिरीत बुडून अनेक वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद वन विभागाकडे आहे. त्यामुळे वनविभागाने वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविल्यास वन्यजीवांचे अपघाती मृत्यू रोखता येईल, अशी आर्त हाक नीलेश कंचनपुरे दिली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण आदींकडे निवेदन सादर करण्यात आले. विदर्भातील वनक्षेत्रालगतच्या विहिरींमध्ये वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.