शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:13 IST

अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने ...

अमरावती : मे महिन्यात वन्यजीव पाण्याच्या शोधात वनक्षेत्राबाहेर पडत आहेत. मात्र, वनक्षेत्रालगतच्या बहुतांश विहिरींवर संरक्षण जाळी बसविण्यात आली नसल्याने या विहिरीत पडून वन्यजीवांचे अपघाती मृत्यू होत आहेत. अशाप्रकारच्या घटना राज्याच्या कानाकोपऱ्यात नियमितपणे घडत आहे. त्यामुळे वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसवून वनविभागाने वन्यजीवांचे अपघाती मृत्यू थांबवावे, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

येथील वाईल्ड लाईफ अवेअरनेस रिसर्च ॲन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष नीलेश कंचनपुरे यांनी शासनाला पाठविलेल्या निवेदनातून वन्यजीवांचे अपघाती मृत्यूची कारणमीमांसा स्पष्ट केली आहे. हल्ली वनक्षेत्रात नैसर्गिक, कृत्रिम पाणवठ्यांवर पाणी मिळत नाही. त्यामुळे वाघ, बिबट, हरिण, नीलगाय, जंगली डुक्कर आदी वन्यजीव तृष्णातृप्तीसाठी भटकंती करतात. दरम्यान विहिरीत पाणी दिसून येताच वन्यजीव ते पिण्यासाठी विहिरीत उड्या मारतात. मात्र, विहिरीतून बाहेर निघणे कठीण होते. त्यामुळे आतापर्यंत विहिरीत बुडून अनेक वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाल्याच्या घटनांची नोंद वन विभागाकडे आहे. त्यामुळे वनविभागाने वनक्षेत्रालगतच्या विहिरींवर संरक्षण जाळी बसविल्यास वन्यजीवांचे अपघाती मृत्यू रोखता येईल, अशी आर्त हाक नीलेश कंचनपुरे दिली. राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक पी. साईप्रसाद, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकाेडकर, मुख्य वनसंरक्षक प्रवीण चव्हाण आदींकडे निवेदन सादर करण्यात आले. विदर्भातील वनक्षेत्रालगतच्या विहिरींमध्ये वन्यजीवांचे अपघाती मृत्यू झाले आहेत.