शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

परराज्यात जाणााऱ्या रातराणी बस कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या राज्य अंतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी अद्याप सुरू ...

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या राज्य अंतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी अद्याप सुरू झालेले नाही. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी अद्यापही प्रवाशांचा महामंडळाच्या रातराणीला बसना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अमरावतीतून परराज्यात जाणाऱ्या हैद्राबाद, भोपाळ, खंडवा व अन्य सर्वच रातराणी बस सध्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बस गाड्या बदलत प्रवास करावा लागत आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने ७ जून पासून सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात अनलॉकमधील काही निर्बध वगळता सर्व प्रकारच्या बाजारपेठ व उद्योग व्यवसाय आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याची गर्दी वाढली आहे. मात्र, एसटीची परराज्यात जाणारी रातराणी अद्याप बंदच आहे.

बॉक्स

परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंदच

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ८ आगार आहेत. त्यात अमरावती, बडनेरा, दर्यापूर, वरूड, परतवाडा, चांदुर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांचा समावेश आहे. यापैकी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून तेलगंणातील हैद्राबाद,मध्यप्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, पांढुर्णा, मुलताई आदी बस परराज्यात दिवसा व रातराणी बस सुरू होत्या. आता गेल्या दीड वर्षापासून ही परराज्यात एसटी बस बंद ठेवण्याचे आदेश तेथील प्रशासनाकडून दिले आहेत. त्यामुळे या बस बंद आहेत.

कोट

अमरावती आगारातून केवळ हैदराबाद ही परराज्यात जाणारी बस होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बस बंद करण्यात आली आहे. राज्य अंतर्गत मात्र नागपूर यवतमाळ अकोला या ठिकाणच्या रात्रंदिवस सुरू आहेत. परंतु त्या सुद्धा परिस्थिती पाहून सोडावी लागते. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या आर्थिक नुकसान होत आहेत.

- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

बॉक्स

सीमेवरील गावापर्यंतच्या प्रवासही अडचणीचा

कोट

जिल्ह्यात परराज्यात जाणारी एकही रातराणी किंवा इतर बस सुरू नाहीत. पूर्वी अमरावती अन्य आगारातून मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी बस सुरू होती. आता ही बस बंद असून या मार्गावर सीमेपर्यंतचा प्रवाससुद्धा बस गाड्या बद्दल करावा लागतो. किमान परराज्यासाठी एक तरी बस जिल्ह्यातून सुरू करावी.

चंद्रभान घोंगडे, प्रवासी

कोट

जिल्ह्यातून भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर आदी ठिकाणी एसटी बसेस यापूर्वी जात होत्या. मात्र, कोरोनापासून या सर्व एसटी बसेस बंद असल्यामुळे मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी इतर वाहने बदलावीत गाव शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे या बस सुरू होणे गरजेचे आहे.

- दिलीप मिश्रा, प्रवासी