शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

परराज्यात जाणााऱ्या रातराणी बस कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या राज्य अंतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी अद्याप सुरू ...

अमरावती : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर एसटीच्या राज्य अंतर्गत रातराणी सुरू झाल्या असल्या तरी परराज्यात जाणाऱ्या रातराणी अद्याप सुरू झालेले नाही. तिसऱ्या लाटेच्या भीतीपोटी अद्यापही प्रवाशांचा महामंडळाच्या रातराणीला बसना प्रतिसाद मिळत नसल्यामुळे अमरावतीतून परराज्यात जाणाऱ्या हैद्राबाद, भोपाळ, खंडवा व अन्य सर्वच रातराणी बस सध्या सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यामुळे प्रवाशांना बस गाड्या बदलत प्रवास करावा लागत आहे.

मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाने ७ जून पासून सर्वत्र अनलॉकची प्रक्रिया सुरू केली. जिल्ह्यात अनलॉकमधील काही निर्बध वगळता सर्व प्रकारच्या बाजारपेठ व उद्योग व्यवसाय आठवड्यातील पाच दिवस सायंकाळी ४ पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्याची गर्दी वाढली आहे. मात्र, एसटीची परराज्यात जाणारी रातराणी अद्याप बंदच आहे.

बॉक्स

परराज्यात जाणाऱ्या रातराणी बंदच

जिल्ह्यात एसटी महामंडळाचे ८ आगार आहेत. त्यात अमरावती, बडनेरा, दर्यापूर, वरूड, परतवाडा, चांदुर रेल्वे, मोर्शी, चांदूर बाजार या आगारांचा समावेश आहे. यापैकी अमरावती मध्यवर्ती बसस्थानकातून तेलगंणातील हैद्राबाद,मध्यप्रदेशातील भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर, पांढुर्णा, मुलताई आदी बस परराज्यात दिवसा व रातराणी बस सुरू होत्या. आता गेल्या दीड वर्षापासून ही परराज्यात एसटी बस बंद ठेवण्याचे आदेश तेथील प्रशासनाकडून दिले आहेत. त्यामुळे या बस बंद आहेत.

कोट

अमरावती आगारातून केवळ हैदराबाद ही परराज्यात जाणारी बस होती. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बस बंद करण्यात आली आहे. राज्य अंतर्गत मात्र नागपूर यवतमाळ अकोला या ठिकाणच्या रात्रंदिवस सुरू आहेत. परंतु त्या सुद्धा परिस्थिती पाहून सोडावी लागते. प्रवाशांच्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या आर्थिक नुकसान होत आहेत.

- श्रीकांत गभने, विभाग नियंत्रक

बॉक्स

सीमेवरील गावापर्यंतच्या प्रवासही अडचणीचा

कोट

जिल्ह्यात परराज्यात जाणारी एकही रातराणी किंवा इतर बस सुरू नाहीत. पूर्वी अमरावती अन्य आगारातून मध्यप्रदेश मध्ये जाण्यासाठी बस सुरू होती. आता ही बस बंद असून या मार्गावर सीमेपर्यंतचा प्रवाससुद्धा बस गाड्या बद्दल करावा लागतो. किमान परराज्यासाठी एक तरी बस जिल्ह्यातून सुरू करावी.

चंद्रभान घोंगडे, प्रवासी

कोट

जिल्ह्यातून भोपाळ, खंडवा, बऱ्हाणपूर आदी ठिकाणी एसटी बसेस यापूर्वी जात होत्या. मात्र, कोरोनापासून या सर्व एसटी बसेस बंद असल्यामुळे मध्यप्रदेशमध्ये जाण्यासाठी इतर वाहने बदलावीत गाव शहर गाठावे लागत आहे. त्यामुळे या बस सुरू होणे गरजेचे आहे.

- दिलीप मिश्रा, प्रवासी