शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

बडनेरयातील उड्डाणपुलाचे रुंदीकरण केव्हा करणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:12 IST

फोटो - बडनेरा १६ एस अपघात वाढले, वाहनचालक त्रस्त, भुयारी मार्गाची मागणी बड़नेरा : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे ...

फोटो - बडनेरा १६ एस

अपघात वाढले, वाहनचालक त्रस्त, भुयारी मार्गाची मागणी

बड़नेरा : शहरातून जाणाऱ्या महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचे रुंदीकरण केव्हा करणार, असा प्रश्न या मार्गावरील वाढत्या वाहनांच्या वर्दळीमुळे व सततच्या अपघाताने समोर आला आहे. शासन, प्रशासनाने याची प्राधान्याने दखल घेणे गरजेचे झाले आहे.

गांधी विद्यालयापुढील महामार्गावर तब्बल २५ वर्षांपूर्वी उड्डाणपूल उभारण्यात आला. यादरम्यान लोकसंख्या व वाहने अनेकपटींनी वाढली. वाहनेदेखील प्रचंड वाढली. बडनेऱ्यात रेल्वे जंक्शन आहे. येथून रेल्वे गाड्या मिळविण्यासाठी प्रवाशांना हाच अरुंद उड्डाणपूल ओलांडून रेल्वे स्थानकावर यावे लागते. बडनेरा शहरातून नियमित अमरावतीकडे धावणाऱ्या वाहनांचीदेखील मोठी रेलचेल असते. याच उड्डाणपुलावरून एसटी बस, ऑटोरिक्षा, मिनीडोअर, सध्या बंद असलेल्या शहर बस यांचीदेखील वाहतूक असते. वाहनांच्या संख्येनुरूप हा उड्डाणपूल अरुंद झाला आहे. यामुळे बरेच अपघात होत असतात. रात्रीच्या वेळेत वाहनचालकांना जीव मुठीत घेऊनच पूल ओलांडावा लागतो. वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असणाऱ्या या पुलाचे रुंदीकरण करणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

अंडरपासची मागणी

पाचबंगला परिसरातून शाळकरी विद्यार्थी, काटआमला मार्गाने शेतकरी यांना दररोज हा वर्दळीचा उड्डाणपूल ओलांडून अनुक्रमे गांधी विद्यालय व नवी-जुनी वस्ती गाठावी लागते. त्यांच्या सुरक्षिततेसाठी उड्डाणपुलालगत अंडरपास करावा, अशी मागणी नागरिक कृती समितीचे अरुण साकोरे, संजय यादव, अनिल बनसोड, अजय यादव, बंटी वाहने, संतोष भटकर, सुनील शेरेवार, रंजना साकोरे, प्रतिभा नकाते आदींनी सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाकडे केली आहे.

पुलाची धोकादायक अवस्था

उड्डाणपुलाच्या मध्यभागी व दोन्हीकडील उतारांवर खड्डे पडले आहेत. फूटपाथ धोक्याचे झाले आहे. पुलाच्या दोन्ही बाजूच्या संरक्षक कठड्यांची मोड़तोड झाली आहे. एकूणच या उड्डाणपुलाची अवस्था धोकादायक झाली आहे.