शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
7
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
8
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
9
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
10
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
11
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
12
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
13
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
14
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
15
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
16
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
17
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
18
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
19
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
20
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?

शाळेची पहिली घंटा वाजणार केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:10 IST

अमरावती : जून महिना इजाळला आणि मान्सूनचे वेध लागले तसेच शाळकरी मुलांना नव्या कोऱ्या पुस्तक व शाळेच्या ...

अमरावती : जून महिना इजाळला आणि मान्सूनचे वेध लागले तसेच शाळकरी मुलांना नव्या कोऱ्या पुस्तक व शाळेच्या नव्या गणवेशाचा वेध लागतो. त्यामुळे शाळेची पहिली घंटना वाजणार केव्हा, असा प्रश्न मुले उपस्थित करीत आहेत.

दरवर्षी २६ जूनला सुरू होणाऱ्या शाळा यावर्षी मात्र सुरू होण्याबाबत अद्याप कोणत्याही शासन निर्णय नाही. गतवर्षभर घरात राहून ऑनलाइन शिक्षण घेतलेली मुले आता कंटाळलेली आहेत. त्यांना आपल्या वर्ग खोल्या, ब्रेच, शाळेतील मित्र-मैत्रिणी यांच्यासोबत आपल्या शिक्षकांकडून वर्गात शिक्षण घेण्याची तीव्र उत्कंठा आहे. त्यामुळे शासन काय निर्णय घेते आणि शाळेची पहिली घंटा कधी वाजते याकडे शाळकरी मुले आणि पालकांचे तसेच शिक्षकांची लक्ष लागले आहे.

कोरोनाच्या संकटामुळे जिल्ह्यासह राज्यातील माध्यमिक आणि प्राथमिक शाळा गत वर्षभरापासून ऑनलाइन पद्धतीने घेण्यात आल्यात. पहिली ते सातवी व आठवी ते दहावी आणि अकरावी ते बारावी नंतरचे सर्व वर्ग ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम घेण्यात आले. त्यावर सराव परीक्षा सुद्धा घेण्यात आल्यात. अनेक वेळा नेटवर कनेक्टिव्हिटीच्या अडसरामुळे मुलांचा शाळेत प्रत्यक्ष होणारा अभ्यासक्रम आणि प्रत्यक्ष नेट कनेक्टिव्हिटीतील अभ्यासक्रम यात बरीच तफावत आहे. त्याचे आता मूल्यमापन होत आहे. पहिली ते आठवीपर्यंत वर्षभरात झालेल्या शैक्षणिक वर्षात सर्वांनाच पास करावे, असा शासनाने आदेश काढला. कोरोना साथीमुळे धास्तावलेल्या शिक्षण विभागाने दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द केली आहे. नववी आणि दहावीच्या गुणांकनानुसार पास करावे, असे निर्देश दिले आहेत. त्यानंतर शासनाने गेल्या दोन दिवसांपूर्वी बारावी बोर्डाची परीक्षा घेण्याचा शासनाने निर्णय घेतला. यंदाच्या २०२१-२२ च्या शैक्षणिक वर्षात जून महिना सुरू झाला तरी शाळा कधी सुरू होणार याबाबत कोणताही धोरणात्मक निर्णय शासनाकडून आलेला नाही. काही दिवसापूर्वी येत्या काही दिवस आता नवीन पद्धतीने शाळा सुरू होणार अशा प्रकारची चर्चा सुरू आहे. परंतु याबाबत कुठलाही निर्णय सध्यातरी घेण्यात आला नसल्याचे शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. शाळा ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सुरू होणार याबाबत सस्पेन्स आहे.

बॉक्स

निर्णयाकडे लक्ष

कोरोनाच्या साथीमुळे गेले संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन पद्धतीने शिक्षण घेण्यात गेले गुणांकनानुसार पद्धतीमुळे काही अंशी हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. याबाबत काही पालकांनी न्यायालयात धाव घेतली. दरम्यान दहावी-बारावीच्या परीक्षा रद्द झाल्या शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याने आता नवीन वर्षात कशा पद्धतीने शाळा सुरू होतात, याची सर्वांनाच उत्सुकता लागलेली आहे.