शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा तिढा कधी सुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:13 IST

पथ्रोट : सन २०१४ पासून दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना माफ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ...

पथ्रोट : सन २०१४ पासून दीड लाख रुपयांपर्यंतचे कर्ज शेतकऱ्यांना माफ करण्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र, त्याकरिता जाचक अटी लावल्यामुळे काही शेतकऱ्यांचे कर्ज माफ झाले, तर काहींच्या कर्जाची परिस्थिती जैसे थे राहिली. त्यांचे कर्जावरील व्याजाचा आकडा फुगत असल्यामुळे ते शेतकरी हवालदिल झाले आहेत.

महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाला माफी देण्याची घोषणा केली. १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१८ या कालावधीत २ लाखांपेक्षा कमी कर्ज असणाऱ्यांना ती कर्जमाफी मिळाली. परंतु ज्या शेतकऱ्यांवर दोन लाखांच्या वर कर्ज आहे. त्यांनी दोन लाखांच्या वरची उर्वरित रक्कम भरल्यास त्यांना कर्जमाफीचा फायदा होऊ शकतो, असे त्यात नमूद होते. त्या अनुषंगाने अनेक शेतकऱ्यांनी दोन लाखांच्या वरच्या उर्वरित रकमेचा भरणा केल्यानंतरही त्यांना कर्जमाफी मिळाली नाही. सहकारी बँक, सहकारी सोसायट्यांकडे शेतकऱ्यांनी चकरा मारून अधिकाऱ्यांना विचारणा केली असता आम्हाला शासनातर्फे आदेश प्राप्त झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जाचा तिढा कायम आहे. बँका, सहकारी सोसायट्या व शेतकरी संभ्रमात असून व्याजदराचा आकडा फुगत चाललेला आहे.

कोट

आसमानी संकटामुळे शेतकरी हैराण झाला आहे. बँक कर्ज निल करण्याकरिता शेतकऱ्यांकडे पैसाच नाही. त्यामुळे शासनाने २०१४ पासूनची कर्जमाफीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.

- जयंत हरणे, शेतकरी पथ्रोट

कोट

दोन लाखांवरील कर्जाची उर्वरित रक्कम शेतकरी भरत आहेत. भरल्यावरही कर्जमाफीबाबत अध्यादेश प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जुन्या खातेदार शेतकऱ्यांचे व्यवहार ठप्प आहेत.

- गजानन बोडखे, सचिव, पथ्रोट

---------