शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

१.८५ लाख शेतकऱ्यांना पिकविम्याची भरपाई केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:13 IST

गजानन मोहोड अमरावती : खरीप २०२० करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १,८५,३३२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यासाठी १५.६२ ...

गजानन मोहोड

अमरावती : खरीप २०२० करिता प्रधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्ह्यातील १,८५,३३२ शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला होता. यासाठी १५.६२ कोटी रुपये शेतकऱ्यांनी कंपनीकडे जमा केला. याशिवाय केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ४७.७९ कोटींचा प्रिमियम आहे. आता यंदाचा खरीप लागणार असताना कंपनीद्वारा विम्याची भरपाई जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया आहेत.

यापूर्वीचा आढावा घेता सधारणपणे मार्च महिन्यात पीक विम्याची भरपाई कंपनीस्तरावर जाहीर करण्यात येत असते. यंदा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत ५० पैशांच्या आत पैसेवारी व दुष्काळी स्थिती असताना कंपनीद्वारा विमा भरपाईसाठी दिरंगाई केली जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. गतवर्षीच्या हंगामापासून या योजनेची अंमलबजावणी यंत्रणा म्हणून विमा कंपनीची तीन वर्षांकरिता निवड केली जाते. नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानीच्या कठीण परिस्थितीत शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे व उत्पादनाच्या जोखमेपासून शेतकऱ्यांना संरक्षण देणे हे योजनेचे उद्दिष्टे आहेत. मात्र, यंदा या विपरीत स्थिती असल्याचे दिसून येत आहे.

यावर्षी पीक विमा योजना प्रथमच कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक, स्वरुपाची आहे व योजनेत जोखीमस्तर ७० टक्के निश्चित करण्यात आलेला आहे. जिल्ह्यातील १.८५ लाख शेतकऱ्यांनी जून २०२० मध्ये या योजनेत सहभाग नोंदविला असताना अद्याप भरपाई देण्यात आली नाही. त्यामुळे भरपाई केव्हा, असा शेतकऱ्यांचा सवाल आहे.

बॉक्स

सोयाबीनचे काढणीपश्चात नुकसान

विमा योजनेमध्ये नमुद स्थानिक नैसर्गिक आपत्तीमूळे काढणीपश्चात होणारे पिकांचे नुकसान या बाबीचा समावेश आहे. यंदा परतीच्या पावसामूळे सोयाबीन उद्वस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. याशिवाय सततच्या पावसामुळे कपाशीची बोंडसड होवूण मोठ्या प्रमाणात बोंडगळ झालेली आहे. त्यामुळे पीक विमा भरपाईची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे.

बॅाक्स

योजनेत शेतकऱ्यांचा तालुकानिहाय सहभाग

या पीक विमा योजनेत अचलपूर तालुक्यातील ८३८९, अमरावती १०,६१०, अंजनगाव सुर्जी २०,०१७, भातकुली १८,४५८, चांदूर रेल्वे ८,२१९, चांदूरबाजार ८,६३७, चिखलदरा ७६०, दर्यापूर ३७,७९३, धामणगाव ५,६२३, धारणी ३,९११, मोर्शी ९,५४३,

नांदगाव खंडेश्वर ४४,४३०, तिवसा ६,३११ व वरुड तालुक्यातील २६३१ शेतकऱ्यांचा सहभाग आहे.

पाईटर

* पीक विमा योजनेत एकूण सहभाग : १,८५,३३२

* शेतकऱ्यांनी भरलेला प्रिमियम : १५,६२ कोटी

* शासन व शेतकऱ्यांचा प्रिमियम : १०९.२० कोटी

* संरक्षित क्षेत्र : १,७६,२८४ हेक्टर

* संरक्षित विमा : ६३६,२१ कोटी