शहरं
Join us  
Trending Stories
1
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
4
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
5
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
6
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
7
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
8
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
9
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
10
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
11
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
12
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
13
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
14
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
15
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
16
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
17
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
18
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
19
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
20
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट

अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना या आजाराची लागण झाल्यास नागरिकांच्या काही प्रमाणात होत असलेल्या कामांचाही खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअप-डाऊनमध्ये दोन्हीकडे वाढतोय धोका : ग्रामीण भागात झपाट्याने संसर्ग

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तालुकास्तरावरील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्याची कोरोनासंबंधी चाचणी होणे महत्त्वाचे आहे. अपडाऊन करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्यासह दिवसभर संपर्कात येणारे सहकर्मी व कुटुंबीयांना कोरोनाचा धोका वाढला आहे.जिल्ह्यात चाचणीचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही मोठी झाली आहे. कोरोना संक्रमितांचा आकडा ११ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात २२८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड चाचणी लवकर झाली, तर उपचाराचे प्रमाण वाढत जाणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना या आजाराची लागण झाल्यास नागरिकांच्या काही प्रमाणात होत असलेल्या कामांचाही खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुळात इतर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश वरिष्ठाकडून दिले जावेत, ही मागणी वारंवार केली जात असते. मात्र, कोरोनाच्या शिरकावाला अर्धे वर्ष होत आले तरी मागणीबाबत वरिष्ठांकडून कार्यवाही झाली नाही.तालुकास्तरावर हवीत शिबिरेतालुक्यात तहसील, पंचायत समिती, भूमिअभिलेख, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अप्पर वर्धा प्रकल्प, दुय्यम निबंधक, तलाठी , नगर परिषद, पोलीस ठाणे, बाजार समिती, जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षक आणि अनेक कार्यालयीन कर्मचारी येतात. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तालुकास्तरावर आरटी-पीसीआर चाचणी तपासण्याची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयाने आदेश काढून आपल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेतली तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या जिवाला धोका राहणार नाही व कुटुंबीयही सुरक्षित राहतील याशिवाय कार्यालयीन कामकाजादरम्यान संपर्कात येणाऱ्या इतरांनाही कोणता धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ही शिबिरे होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तुटण्यातही मोठी मदत होणार असल्याचे मत आरोग्य यंत्रणेने व्यक्त केले आहे.सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेण्यासाठी कार्यालयप्रमुख व आरोग्य यंत्रणेला पत्र देऊन पुढील आठवड्यात त्यांची चाचणी करून घेण्यात येणार आहे. धामणगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच व्यापारी, दुकानदार यांनी कोरोनासंबंधी चाचण्या करून घ्याव्यात.-भगवान कांबळेतहसीलदार धामणगाव रेल्वेप्रत्येक ग्रामीण रुग्णालयात अँटिजन तपासणी सुरू आहे. जिल्ह्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक ९६० जणांची तपासणी झाली. दररोज साडेबारा वाजता ही तपासणी केवळ अर्ध्या तासात करता येते. कोरोनाची लागण झाले की नाही, हे लगेच कळते. सर्वांनी तपासणी करून घ्यावी.-डॉ. महेश साबळे, अधीक्षकग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वेदोन्ही संपर्कातील व्यक्ती होतात बाधितआपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये व शासकीय कामकाज नेटाने पार पाडता यावे, यासाठी दररोज जिल्हास्तरावरून अनेक अधिकारी-कर्मचारी ज्या ठिकाणी सेवा बजावायची आहे, त्या ठिकाणी अप-डाऊन करतात. हे कर्मचारी आपल्या कुटुंबानंतर दररोज कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला जर कोरोनाची लागण झाली असेल, तर सदर कर्मचारी हा कोरोना संक्रमित होतो व त्याचा प्रसार हा कुटुंबातील व्यक्तींमध्ये होऊ शकतो. त्यामुळे असे अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही ठिकाणी कोरोनाचे माध्यम ठरू शकतात. आपल्या कुटुंबाला धोका होऊ नये व स्वत: सुरक्षित असल्याची खात्री असावी, याकरिता त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या