शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोविड तपासणी केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 05:00 IST

जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना या आजाराची लागण झाल्यास नागरिकांच्या काही प्रमाणात होत असलेल्या कामांचाही खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअप-डाऊनमध्ये दोन्हीकडे वाढतोय धोका : ग्रामीण भागात झपाट्याने संसर्ग

मोहन राऊत।लोकमत न्यूज नेटवर्कधामणगाव रेल्वे : जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, तालुकास्तरावरील प्रत्येक शासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्याची कोरोनासंबंधी चाचणी होणे महत्त्वाचे आहे. अपडाऊन करणाºया अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे त्यांच्यासह दिवसभर संपर्कात येणारे सहकर्मी व कुटुंबीयांना कोरोनाचा धोका वाढला आहे.जिल्ह्यात चाचणीचा वेग वाढला आहे. त्यामुळे कोरोना पॉझिटिव्ह येणाऱ्यांची संख्याही मोठी झाली आहे. कोरोना संक्रमितांचा आकडा ११ हजारांच्या जवळपास पोहोचला आहे. आजपर्यंत जिल्ह्यात २२८ रुग्णांचा मृत्यू झाला. कोविड चाचणी लवकर झाली, तर उपचाराचे प्रमाण वाढत जाणार आहे.जिल्ह्यात आतापर्यंत तब्बल ८ हजार ९६ जण कोरोना मुक्त झाले आहेत. एखादा रुग्ण किंवा कुटुंबातील कर्ता पुरुष कोरोना संक्रमित झाला, तर त्याच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी घेण्यात येते. तालुक्याचा प्रशासकीय डोलारा ज्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर आहे, त्यांना या आजाराची लागण झाल्यास नागरिकांच्या काही प्रमाणात होत असलेल्या कामांचाही खोळंबा होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुळात इतर ठिकाणांहून ये-जा करणाऱ्या अधिकाऱ्यांना मुख्यालयी राहण्याचे आदेश वरिष्ठाकडून दिले जावेत, ही मागणी वारंवार केली जात असते. मात्र, कोरोनाच्या शिरकावाला अर्धे वर्ष होत आले तरी मागणीबाबत वरिष्ठांकडून कार्यवाही झाली नाही.तालुकास्तरावर हवीत शिबिरेतालुक्यात तहसील, पंचायत समिती, भूमिअभिलेख, कृषी, सार्वजनिक बांधकाम, आरोग्य, अप्पर वर्धा प्रकल्प, दुय्यम निबंधक, तलाठी , नगर परिषद, पोलीस ठाणे, बाजार समिती, जिल्हा परिषद व खाजगी शाळेतील शिक्षक आणि अनेक कार्यालयीन कर्मचारी येतात. कोरोनाची लक्षणे आढळल्यास तालुकास्तरावर आरटी-पीसीआर चाचणी तपासण्याची सुविधा करण्यात आली आहे. प्रत्येक कार्यालयाने आदेश काढून आपल्या कर्मचाऱ्यांची तपासणी करून घेतली तर अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या जिवाला धोका राहणार नाही व कुटुंबीयही सुरक्षित राहतील याशिवाय कार्यालयीन कामकाजादरम्यान संपर्कात येणाऱ्या इतरांनाही कोणता धोका निर्माण होणार नाही. त्यासाठी प्रत्येक तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात ही शिबिरे होणे गरजेचे आहे. त्यामुळे कोरोना संक्रमणाची साखळी तुटण्यातही मोठी मदत होणार असल्याचे मत आरोग्य यंत्रणेने व्यक्त केले आहे.सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तपासणी करून घेण्यासाठी कार्यालयप्रमुख व आरोग्य यंत्रणेला पत्र देऊन पुढील आठवड्यात त्यांची चाचणी करून घेण्यात येणार आहे. धामणगाव तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच व्यापारी, दुकानदार यांनी कोरोनासंबंधी चाचण्या करून घ्याव्यात.-भगवान कांबळेतहसीलदार धामणगाव रेल्वेप्रत्येक ग्रामीण रुग्णालयात अँटिजन तपासणी सुरू आहे. जिल्ह्यात धामणगाव ग्रामीण रुग्णालयात आतापर्यंत सर्वाधिक ९६० जणांची तपासणी झाली. दररोज साडेबारा वाजता ही तपासणी केवळ अर्ध्या तासात करता येते. कोरोनाची लागण झाले की नाही, हे लगेच कळते. सर्वांनी तपासणी करून घ्यावी.-डॉ. महेश साबळे, अधीक्षकग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वेदोन्ही संपर्कातील व्यक्ती होतात बाधितआपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष होऊ नये व शासकीय कामकाज नेटाने पार पाडता यावे, यासाठी दररोज जिल्हास्तरावरून अनेक अधिकारी-कर्मचारी ज्या ठिकाणी सेवा बजावायची आहे, त्या ठिकाणी अप-डाऊन करतात. हे कर्मचारी आपल्या कुटुंबानंतर दररोज कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या अनेक व्यक्तींच्या संपर्कात येतात. संपर्कात येणाऱ्या व्यक्तीला जर कोरोनाची लागण झाली असेल, तर सदर कर्मचारी हा कोरोना संक्रमित होतो व त्याचा प्रसार हा कुटुंबातील व्यक्तींमध्ये होऊ शकतो. त्यामुळे असे अधिकारी आणि कर्मचारी दोन्ही ठिकाणी कोरोनाचे माध्यम ठरू शकतात. आपल्या कुटुंबाला धोका होऊ नये व स्वत: सुरक्षित असल्याची खात्री असावी, याकरिता त्यांनी आरटी-पीसीआर चाचणी करणे गरजेचे आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या