शहरं
Join us  
Trending Stories
1
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
2
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
3
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
4
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
5
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
6
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक
7
आईचे दुसऱ्या महिलेशी समलैंगिक संबंध, प्रेमासाठी चिमुकल्याची हत्या; पतीच्या हाती लागला व्हिडिओ अन् मग...
8
कधीकाळी चालवायचे रिक्षा, आता मुलाच्या वाढदिवशी लग्झरी कार दिली भेट; VIP नंबरसाठी मोजले ३१ लाख
9
भारतात राहणारे सर्वच हिंदू; मुस्लीम आणि ख्रिश्चन आपल्याच पूर्वजांचे वंशज, काय म्हणाले सरसंघचालक मोहन भागवत
10
तुमच्या कारमधील परफ्यूम दरवळतोय पण ठरतोय 'सायलेंट किलर'! श्वास आणि मायग्रेनचा गंभीर धोका
11
Nuclear warfare: भविष्य स्फोटक आहे...
12
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
13
अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले
14
"तुमच्यातले शारीरिक संबंध कसे आहेत?", आंतरधर्मीय लग्न करताना मराठी गायिकेला आईने विचारलेला बोल्ड प्रश्न
15
सोनं की रिअल इस्टेट? गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय ठरेल जास्त फायदेशीर? तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
16
मराठी अभिनेत्रीला डेट करतोय सुनील शेट्टीचा लेक अहान; कोण आहे ती सुंदरा?
17
जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा
18
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
प्रदूषणकारी रसायनांचे उत्पादन करणारा कारखाना रत्नागिरीच्या लोटे वसाहतीत
20
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

केव्हा राबविणार बळीराजा चेतना अभियान ?

By admin | Updated: May 9, 2017 00:11 IST

गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात.

गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रशासनाचा प्रस्ताव शासनाकडेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जानेवारीत शासनाकडे पाठविला होता. मात्र अद्यापही शासनाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. सलग दुष्काळ, नापिकी, वाढते कर्ज यामुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. नैराश्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण असल्याने शासनाने २५ जून २०१५ मध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व पथदर्शी स्वरुपात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली. मात्र, २०१६ मध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. जिल्ह्यातील ३४० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्युला कवटाळले. या मृत्यूच्या गर्तेतून जिल्ह्यातील शेतकरी बाहेर यावा यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ जिल्ह्यात राबविण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जानेवारी २०१७ मध्ये पाठविला. मात्र या प्रस्तावाला शासनस्तरावर अद्यापही हिरवी झेंडी मिळालेली नाही. या अभियानाद्वारे ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार होती व शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचविण्यासाठी विविध योजना व समुपदेशन करण्यात येणार होते. मात्र, शासन याबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्याचा हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. ही आहेत अभियानाची वैशिष्ट्येक्षेत्रिय कार्यक्रमात बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजना करणे व शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे.सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्ती आदीबाबत भजन, कीर्तन आदींबाबत पथनाट्याद्वारे सर्व गावांमध्ये उपक्रम राबविणे शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व गावांना माहिती देणे, आधुनिक पद्धतीने शेती करून कमी पैशात व अल्प पाण्याद्वारे अधिक उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण देणे.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व सोयीसवलतींबाबत शेतकऱ्यांना अवगत करणे सणासुदीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रम राबविणे, यामध्ये शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक समस्यांविषयी प्रबोधन करणे.