शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

केव्हा राबविणार बळीराजा चेतना अभियान ?

By admin | Updated: May 9, 2017 00:11 IST

गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात.

गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रशासनाचा प्रस्ताव शासनाकडेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जानेवारीत शासनाकडे पाठविला होता. मात्र अद्यापही शासनाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. सलग दुष्काळ, नापिकी, वाढते कर्ज यामुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. नैराश्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण असल्याने शासनाने २५ जून २०१५ मध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व पथदर्शी स्वरुपात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली. मात्र, २०१६ मध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. जिल्ह्यातील ३४० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्युला कवटाळले. या मृत्यूच्या गर्तेतून जिल्ह्यातील शेतकरी बाहेर यावा यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ जिल्ह्यात राबविण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जानेवारी २०१७ मध्ये पाठविला. मात्र या प्रस्तावाला शासनस्तरावर अद्यापही हिरवी झेंडी मिळालेली नाही. या अभियानाद्वारे ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार होती व शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचविण्यासाठी विविध योजना व समुपदेशन करण्यात येणार होते. मात्र, शासन याबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्याचा हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. ही आहेत अभियानाची वैशिष्ट्येक्षेत्रिय कार्यक्रमात बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजना करणे व शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे.सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्ती आदीबाबत भजन, कीर्तन आदींबाबत पथनाट्याद्वारे सर्व गावांमध्ये उपक्रम राबविणे शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व गावांना माहिती देणे, आधुनिक पद्धतीने शेती करून कमी पैशात व अल्प पाण्याद्वारे अधिक उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण देणे.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व सोयीसवलतींबाबत शेतकऱ्यांना अवगत करणे सणासुदीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रम राबविणे, यामध्ये शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक समस्यांविषयी प्रबोधन करणे.