शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
2
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
3
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
4
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
5
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
6
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
7
भटक्या कुत्र्यांचा सर्वाधिक 'चावा' महाराष्ट्राला; सहा वर्षांत तब्बल ३० लाख लोकांचे तोडले लचके
8
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
9
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
10
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
11
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
12
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
13
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
14
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
15
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
16
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
17
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
18
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
19
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
20
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)

केव्हा राबविणार बळीराजा चेतना अभियान ?

By admin | Updated: May 9, 2017 00:11 IST

गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात.

गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रशासनाचा प्रस्ताव शासनाकडेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जानेवारीत शासनाकडे पाठविला होता. मात्र अद्यापही शासनाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. सलग दुष्काळ, नापिकी, वाढते कर्ज यामुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. नैराश्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण असल्याने शासनाने २५ जून २०१५ मध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व पथदर्शी स्वरुपात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली. मात्र, २०१६ मध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. जिल्ह्यातील ३४० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्युला कवटाळले. या मृत्यूच्या गर्तेतून जिल्ह्यातील शेतकरी बाहेर यावा यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ जिल्ह्यात राबविण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जानेवारी २०१७ मध्ये पाठविला. मात्र या प्रस्तावाला शासनस्तरावर अद्यापही हिरवी झेंडी मिळालेली नाही. या अभियानाद्वारे ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार होती व शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचविण्यासाठी विविध योजना व समुपदेशन करण्यात येणार होते. मात्र, शासन याबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्याचा हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. ही आहेत अभियानाची वैशिष्ट्येक्षेत्रिय कार्यक्रमात बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजना करणे व शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे.सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्ती आदीबाबत भजन, कीर्तन आदींबाबत पथनाट्याद्वारे सर्व गावांमध्ये उपक्रम राबविणे शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व गावांना माहिती देणे, आधुनिक पद्धतीने शेती करून कमी पैशात व अल्प पाण्याद्वारे अधिक उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण देणे.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व सोयीसवलतींबाबत शेतकऱ्यांना अवगत करणे सणासुदीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रम राबविणे, यामध्ये शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक समस्यांविषयी प्रबोधन करणे.