शहरं
Join us  
Trending Stories
1
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
2
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
3
वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर पुणे पोलिसांत हजर; मनाने आलेली नाही, सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप 
4
Waves Summit 2025: "भारतात पुरेसे सिनेसमागृहच नाहीत..." आमिर खानने व्यक्त केली खंत
5
केवळ १००० रुपयांनी गुंतवणूक करून तुमच्या मुलांना बनवू शकता कोट्यधीश; कोणती आहे ही स्कीम?
6
पाकिस्तानने भारताची भीती घेतली! पीओकेमधील हॉटेल्स अन् गेस्ट हाऊसमध्ये सैन्य; मदरसे बंद
7
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
8
प्रेक्षकांचा सूरज चव्हाणला 'गोलीगत धोका', 'झापुक झुपूक'ने पहिल्या आठवड्यात केली फक्त इतकी कमाई
9
श्रीराम दर्शनाची ओढ लागली, ३०० वर्षे जुनी परंपरा मोडली; हनुमानगढीचे महंत मंदिराबाहेर पडले!
10
हवाई दलाचं जबरदस्त शक्तिप्रदर्शन, हायवेवर उतरवली मिराज, राफेलसह ही लढाऊ विमानं
11
सिद्धार्थ-मितालीच्या घरी आला छोटा पाहुणा, फोटो शेअर करत दिली गुड न्यूज
12
WhatsApp वेबवर व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर लाँच; आता तुम्ही थेट करू शकता कॉल
13
बजाज चेतकला एप्रिल फूल बनविले; टीव्हीएस पहिल्यांदाच नंबर १, विक्रीत ओला कुठे...
14
पाकिस्तानी हवाई क्षेत्र बंद; एअर इंडियाला 5000 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज...
15
दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
16
पंकजा मुंडेंना कॉल अन् पाठवला अश्लील मेसेज, पुण्यातील तरुणाला पोलिसांनी केली अटक
17
CEOs चा १ तासाचा पगार सामान्य कर्मचाऱ्याच्या वर्षाच्या पगाराइतका, एका रिपोर्टमध्ये झाले अनेक आश्चर्यकारक खुलासे
18
अन्न पुन्हा गरम करणं आरोग्यासाठी ठरतंय घातक; 'या' ५ गोष्टी टाळाल तरच ठणठणीत राहाल
19
 संतापजनक! मासिक पाळीत स्वयंपाक करणं महिलेच्या जीवावर बेतलं,नणंद आणि सासूने खून केल्याचा आरोप, दोन मुलं अनाथ
20
नवी मुंबईत ठाकरे गटाला खिंडार! माजी नगरसेवकांचे उद्धवसेनेला जय महाराष्ट्र, शिंदेसेनेत प्रवेश

केव्हा राबविणार बळीराजा चेतना अभियान ?

By admin | Updated: May 9, 2017 00:11 IST

गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात.

गतवर्षी सर्वाधिक शेतकरी आत्महत्या : प्रशासनाचा प्रस्ताव शासनाकडेलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गतवर्षी राज्याच्या तुलनेत जिल्ह्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. या पार्श्वभूमिवर शेतकऱ्यांचे मनोबल वाढावे म्हणून जिल्ह्यात ‘बळीराजा चेतना अभियान’ राबविण्यात यावे, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी जानेवारीत शासनाकडे पाठविला होता. मात्र अद्यापही शासनाने जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्या गांभीर्याने घेतल्या नाहीत, त्यामुळे या प्रस्तावाला हिरवी झेंडी मिळाली नाही. सलग दुष्काळ, नापिकी, वाढते कर्ज यामुळे व उत्पादन खर्चाच्या तुलनेत उत्पन्न कमी या विरोधाभासामुळे जिल्ह्यात राज्याच्या तुलनेत सर्वाधिक शेतकरी आत्महत्या झाल्यात. नैराश्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील १४ जिल्ह्यांत शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण असल्याने शासनाने २५ जून २०१५ मध्ये बळीराजा चेतना अभियान राबविण्याचा निर्णय घेतला व पथदर्शी स्वरुपात यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा सकारात्मक परिणाम दिसून आला. या दोन्ही जिल्ह्यांतील शेतकरी आत्महत्यांच्या प्रमाणात ३५ ते ४० टक्क्यांनी घट झाली. मात्र, २०१६ मध्ये कर्जबाजारी शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या अमरावती जिल्ह्यात झाल्यात. जिल्ह्यातील ३४० शेतकऱ्यांनी नैराश्य येऊन मृत्युला कवटाळले. या मृत्यूच्या गर्तेतून जिल्ह्यातील शेतकरी बाहेर यावा यासाठी ‘बळीराजा चेतना अभियान’ जिल्ह्यात राबविण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जानेवारी २०१७ मध्ये पाठविला. मात्र या प्रस्तावाला शासनस्तरावर अद्यापही हिरवी झेंडी मिळालेली नाही. या अभियानाद्वारे ग्रामस्तरीय समितीमार्फत सर्वेक्षण करून शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार होती व शेतकऱ्यांना आर्थिक स्तर उंचविण्यासाठी विविध योजना व समुपदेशन करण्यात येणार होते. मात्र, शासन याबाबत गंभीर नसल्याने जिल्ह्याचा हा प्रस्ताव धूळखात पडला आहे. ही आहेत अभियानाची वैशिष्ट्येक्षेत्रिय कार्यक्रमात बदल करून कुटुंबनिहाय उपाययोजना करणे व शेतकऱ्यांना नैराश्यातून बाहेर काढणे.सामूहिक विवाहाचे महत्त्व, व्यसनमुक्ती आदीबाबत भजन, कीर्तन आदींबाबत पथनाट्याद्वारे सर्व गावांमध्ये उपक्रम राबविणे शासकीय योजना, कमी खर्चाच्या कोरडवाहू शेतीबाबत सर्व गावांना माहिती देणे, आधुनिक पद्धतीने शेती करून कमी पैशात व अल्प पाण्याद्वारे अधिक उत्पन्न घेण्याचे प्रशिक्षण देणे.केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती व सोयीसवलतींबाबत शेतकऱ्यांना अवगत करणे सणासुदीच्या काळात करमणुकीचे कार्यक्रम राबविणे, यामध्ये शेतकऱ्यांना सामाजिक व आर्थिक समस्यांविषयी प्रबोधन करणे.